शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

तुमच्या त्वचेला प्रेमळ साथ

By admin | Updated: December 25, 2014 19:32 IST

एक अगदी सहज साधा प्रश्न. तुम्ही रोज मॉयश्चरायझर लावता का? अंघोळ झाल्यावर आणि रात्री झोपताना हातापायाला मॉयश्चरायझर लावायला हवं

मोहिनी घारपुरे

 
एक अगदी सहज साधा प्रश्न. तुम्ही रोज मॉयश्चरायझर लावता का? अंघोळ झाल्यावर आणि रात्री झोपताना हातापायाला मॉयश्चरायझर लावायला हवं, हे अनेकींना माहितीही नसतं. 
आणि ज्यांना माहिती असतं, त्यातल्या अनेकींना आपण शेवटचं कधी हाताला मॉयश्चरायझर लावलं हे आठवतदेखील नाही.
वेळच मिळत नाही, असं एक कारण आपण सरकसकट पुढं करतो पण ते खरं नाही हे आपलं आपल्यालाही माहिती असतंच.
त्यामुळे स्वत:ची काळजी घेत, स्वत:च्या त्वचेचं भरणपोषण करत, तिला तजेला आणि ओलावा देत आपण त्वचेला अधिकाधिक काळ तरुण ठेवू शकतो.
त्यासाठी मात्र आपल्याला माहितीच हवं की मॉयश्चरायझर कधी आणि कुठं लावायचं!
थंडीत कोरडी होत जाणारी त्वचा, तिचा रखरखाट, त्यातून दिसणारा भकास रंग हे सारं टाळायचं असेल तर तुमच्या त्वचेवरुन हवाच मॉयश्चरायझरचा ओलावा, संरक्षण देणारा तुमचाच मायेचा हात फिरायलाच हवा.
 
 
सुंदर पाऊलखुणांसाठी.
आपल्या पायांची आपण कितीशी काळजी घेतो, त्यातही पाऊलांची!
म्हणायला लक्ष्मीची पाऊलं वगैरे अशा उपमा दिल्या जातात बायकांच्या पावलांना!
पण एरव्ही ती पाऊलं बिचारी नुस्ती धावत राहतात. त्या पाऊलांना मॉयश्चरायझर नियमित लावायला हवं. विशेषत: घोटय़ाजवळ, तिथल्या हाडाजवळ त्वचा कोरडी होते. काळी-हिरवट अगदी रखरखीत होते. थंडीत तर अनेकजणींना वाताचाही त्रस होतो.
अशावेळी पाय/पाऊलं कोमट पाण्यात घालून ठेवावेत. आणि कोरडे करुन त्यांना मॉयश्चरायझर लावावं. पाऊलं कोमल सुंदर दिसायला त्यानं मदत होते.
 
अंघोळीनंतर मॉयश्चरायझर 
सकाळची घाई, त्यात गडबडीत कसंबसं अंगावर पाणी घ्यायचं हाच अनेकींचा दिनक्रम. ब:याच जणी तर थंडी खूप वाजते म्हणून खूप कढत पाणी अंगावर घेतात. तसं करू नये, फार गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं त्वचेला अपाय होतो. त्यापेक्षा कोमट पाण्यानं आंघोळ करुन लगेच आपल्या त्वचेला साजेसं मॉयश्चरायझर संपूर्ण शरीराला लावलं तर त्वचेला मदत होते. त्वचेचा पोत सुधारतो.
 
 मॉयश्चरायझर कुठं लावावं?
अनेकजणी चेह:यालाच क्रीम चोपडतात. मात्र थंडीत तरी तसं करू नये. हात-पाय, घोटे, ढोपरं, गुडघे, कोपरं, मान, पाठ या सा:या ठिकाणी त्वचा जास्त ड्राय होण्याची शक्यता असते. त्यामुळे या भागांना आवजरून मॉयश्चरायझर नियमित लावायलाच हवं.