शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

तुरुंगात जगण्याची किंमत कळतेय.

By admin | Updated: October 8, 2015 20:51 IST

मी सातवीला असतानाच कर्जाचा भार आमच्यावर होता. माङो वडील कष्ट करता करता दिवस-रात्र एक करायचे. मी पण शाळा सोडून छोटी-छोटी कामं करायला सुरुवात केली

 माङया आयुष्याची सुरुवातच दु:खात झाली. 

मी सातवीला असतानाच कर्जाचा भार आमच्यावर होता. माङो वडील कष्ट करता करता दिवस-रात्र एक करायचे. मी पण शाळा सोडून छोटी-छोटी कामं करायला सुरुवात केली. मला त्यावेळी हवा होता फक्त पैसा. त्यावेळी मी अज्ञानी होतो. मला माझं भवितव्य काय तेव्हा कळलंच नाही. कारण मी शाळेत खूप हुशार होतो, स्कॉलरशिपमध्ये प्रथम नंबर यायचा. हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम यायचो. पण पैशापुढे हे सगळं दिसायचं नाही. 
मी कामासाठी खेडेगावात जायचो. त्या गावाची गावठी भाषा, तिथल्या डोंगरासारख्या टेकडय़ा, जुने मंदिर, हिरवीगार शेती बघून मी रमून जायचो. मला त्यावेळी काही काळापुरता आनंद वाटायचा. पण मी नेहमी चुकत गेलो. मी भविष्यकाळाचा विचारच केला नाही. 
म्हणूनच मी आज या रत्नागिरी विशेष कारागृहामध्ये आहे. 
मला नेहमी पैसा हवा होता. मग तो ब्लॅक असो किंवा व्हाइट, मी फक्त पैशाच्याच मागे लागलो. मला पैशाची हावच लागली. म्हणून मी काही चुकीची कामे केली. विचार केला नाही की पैसा मला कुठे घेऊन जाईल. पण नेहमी एकच विचार करत असायचो की, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. म्हणून आज एका वर्षापासून कारागृहात जेवढा अनुभव मिळतो तो मन:पूर्वक घेतो. कारण मला माहीत आहे की, हा अनुभव मला नक्की चांगल्या मार्गावर घेऊन जाईल, जेणोकरून मी माङया कुटुंबाला सुखात ठेवू शकतो. त्या मार्गाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. 
म्हणतात ना, आपले जीवन कबड्डीच्या खेळासारखे असते. जेव्हा-जेव्हा आपण जिंकण्यास पुढे जातो, तेव्हा तेव्हा आपल्याला हरवण्यासाठी आपले पाय खेचले जातात. मी नेहमीच हरत गेलो. मला जिंकण्याची संधी कधी मिळालीच नाही. माङया आई-बाबांनी मला नेहमी यशाकडे ढकलले. मी मात्र नेहमी अपयश व दु:खाचा मार्ग निवडला. पण आता त्या मार्गाचा शेवट आला आहे. कारण मी एक अनुभव घेतलेला आहे. तुरुंगात राहून मला जगण्याची किंमत कळते आहे. 
पोटाची भूक भागवण्यासाठी भाकरी करताना जसे तव्याचे चटके सोसावे लागतात तसेच मी या वाईट वाटेतून काटे, चटके सोसत चांगल्या मार्गाला लागेल, याची मला आता खात्री आहे. 
- राहुल  चव्हाण