शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जी ले जरा!

By admin | Updated: June 19, 2014 21:07 IST

आपल्याला आपली लाइफस्टाइल बदलायला हवी हे आधी मान्यच करून टाका. आपलं चुकतंय, आपण जगणं सोडून आभासात गुरफटतो आहोत हे मान्य केलं तरच पुढची वाट सोपी होईल.

अँडिक्शनच्या चक्रव्यूहातून सुटायचं कसं?
 
आपल्याला आपली लाइफस्टाइल बदलायला हवी हे आधी मान्यच करून टाका. 
आपलं चुकतंय, आपण जगणं सोडून आभासात गुरफटतो आहोत हे मान्य केलं 
तरच पुढची वाट सोपी होईल. पण उपाय म्हणून तातडीनं सगळी गॅजेट्स बंद करून 
टाकू नका. जरा स्लो डाउन करा.
**
तुम्हाला रिकामा वेळ केव्हा असतो, केव्हा नेटवर टाइमपास करण्याची उबळ 
जास्त असते हे तुमचं तुम्हीच ठरवा, त्यावेळेत करण्याचं तुमच्या आवडीचं काम 
प्लॅन करा. काहीच नाही तर सरळ मित्रांशी गप्पा मारत टपरीवर चहा प्यायल्7ा जा.
**
तुम्ही मित्रांबरोबर जेवायला जाता, गप्पा मारायला जाता, तेव्हा सतत मोबाइलला 
चिकटायचं नाही. सगळ्यांनी मोबाइल टेबलावर जमा करायचे. जो पहिल्यांदा 
मोबाइलला हात लावेल त्यानं सगळ्यांचं बिल द्यायचं, असा नियम करून टाका.
**
तुमच्या फोनचा जरा स्मार्ट वापरा करा, घरचे-गर्लफ्रेण्ड-बॉस यांच्या 
कॉलसाठी खास रिंगटोन ठेवा. तो वाजला तर फोन उचला. 
दुसरे फोन आपल्याला नको तेव्हा उचलायचे नाहीत.
**
व्हॉट्स अँपचे ग्रुप रोज काही तासांसाठी तरी म्यूट करून ठेवा. 
(कमीत कमी ग्रुप जॉइन करा.) जेव्हा फुरसत असेल तेव्हा नोटिफिकेशन्स पाहा.
**
फोनवर अलार्म लावा, अर्धा तास ऑनलाइन टाइमपास. 
अलार्म वाजला की साईन आउट करायचं म्हणजे करायचं. 
हे एवढं जरी जमलं तरी तुमचा कण्ट्रोल नक्की वाढेल.
**
विकएण्डला फोन-व्हॉट्स अँप-फेसबुकला सुट्टी 
देऊन टाका. नाही वापरायचं म्हणजे नाही वापरायचं. 
एक दिवस जरी हे जमलं तरी आपल्याला ‘जमतं’ ही 
भावना पुढची वाट सोपी करेल.
**
तुमच्या मनगटावर एखादं मस्त घड्याळ रोज 
बांधाच. म्हणजे मग वेळ पाहायची म्हणून 
सारखा मोबाइल चाचपून पाहायला नको.
**
तुमच्या आवडीचं एक काम रोज करा. काय वाट्टेल ते, 
कितीही फालतू वाटलं तरी करा, अगदी झाडांना पाणी 
घालण्यापासून टीव्ही सिरियल पाहण्यापर्यंत काहीही. 
फक्त फोन आणि कॉम्प्युटरपासून लांब रहायचं.
**
आपल्या जवळच्या माणसांशी बोला, भांडा, पण प्रत्यक्ष. 
‘मी फोन करतो, मग बोलू.’ हे वाक्यच तुमच्या आयुष्यातून डिलीट मारा.
**