शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

फक्त विचारा, मी काय मदत करु?

By admin | Updated: April 30, 2015 17:09 IST

आपण समाजासाठी काहीतरी करावं; असं वाटतं ? पण करायचं काय, कसं हे शिकायला हवं ! आणि त्यासाठी ही मोठी सुटी काही गोष्टी फुकट शिकवू शकते !

- सोशल वर्क करायचं; स्किल आहे तुमच्याकडे ?
 
खूप मुलांना वाटतं, सुटीत काहीतरी समाजोपयोगी काम करावं ! पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण कुणीतरी काम दिलं पाहिजे. एखाद्या एनजीओत जाऊन आपण काहीतरी मदत करायला पाहिजे. फळ वाटप, वस्तू वाटप यापलीकडे जाऊन काहीतरी करायला पाहिजे !
हे ‘वाटतं’ याचंच खरंतर खूप कौतुक करायला पाहिजे! आपण माथेरान-महाबळेश्वरला न जाता, मित्रंबरोबर टाइमपास न करता असं काहीतरी करायला पाहिजे असं वाटण्याला किंमत आहेच !
पण असं नुस्तं वाटून उपयोग नसतो, तसं काम करून त्यातून आपली समज वाढवता आली पाहिजे !
खरंतर या कामाकडे आपला समाज समजून घेण्यासाठी वापरलेला वेळ असं म्हणून पहायला पाहिजे !
एखाद्या समाजसेवी संस्थेत जाऊन आपण समाजसेवा करू, त्याबदल्यात आपल्याला काही पैसे आणि मिळालंच तर एखादं ‘सर्टिफिकेट’ मिळेल असा त्रोटक विचार असेल तर यावाटेला खरंतर न गेलेलंच बरं !
आणि जायचंच असेल तर समाजसेवी संस्थाच कशाला पाहिजे ! म्हणजे मिळालीच एखादी चांगली संस्था, तिथं जाऊन काही शिकता आलं, मदत करता आली तर फारच छान !
पण सगळ्या छोटय़ा गावात, खेडय़ात, तालुक्यात अशी संस्था कुठून मिळणार ?
मग तिथल्या मुलांनी काय करायचं ?  
मुळात हेच मनातून काढून टाका की, सुटीत आपल्याला कुणीतरी काम देईन आणि आपण ते करू.
त्यापेक्षा आपण आपल्यापद्धतीनं काही काम करून पाहू.
असे बरेच उद्योग मी माङया सुटीत केले आहेत,
त्यातले काही सांगतो.
करून पहा. ‘समज’ वाढवायला यासा:या खटाटोपाचा फार उपयोग होतो !
- अमृत बंग
कार्यकर्ता, निर्माण
 
1) तहसीलदार कार्यालयाच्या आवारात 
फक्त जाऊन बसा.
 
हे असं काम कुणी करतं का सुटीत? असं वाटेलही. पण खरंच चारपाच दिवस जाऊन तर बसा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात. तिथलं काम कसं चालतं, यंत्रणा कशी चालते, कोण कुणाचा साहेब, कुठला विभाग काय काम करतो, हे सारं समजून घ्या. बोला, भेटा लोकांना. काही लोक बोलतील, काही नाही. पण अनुभव तर मिळेल. त्यात आपलं काम करून घेण्यासाठी त्या कार्यालयात आलेली खेडय़ापाडय़ातली माणसं भेटतील. त्यांना विचारा अडचण काय आहे, काम कुठं अडलं? अनेकांना लिहिण्यावाचण्याचा सराव नसतो, बोलण्याचा आत्मविश्वास नसतो, एक साधं पत्र नाही, चार ओळीचा अर्ज लिहून आणा असं म्हणत माणसं परत जातात. त्यांच्याशी बोला. शक्य असेल तर तो अर्ज लिहून द्या. त्यांचं काम ज्या साहेबाकडे त्याच्याशी जाऊन बोला, अनेकदा खमकेपणो उत्तरं मागितली जात नाहीत म्हणून काम होत नाही. त्यांच्या वतीनं तुम्ही बोला !
हे सारं समजलं, करता आलं तर एका अत्यंत गुंतागुंतीच्या व्यवस्थेशी तुमचा परिचय होईल. आपल्या समाजातल्या माणसांचे खरे प्रश्न कळतील. अस्वस्थही वाटेल, पण कळेल तरी की, आपल्याला वाटतात त्यापेक्षा किती वेगळे आहेत, माणसांचे प्रश्न.
 
2) एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्या.
 
आपल्या देशातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था समजून घ्यायची तर जवळच्या एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जा, ग्रामीण रुग्णालयात जा, सिव्हिलमध्ये जा ! 
तिथे येणा:या रुग्णांचे प्रश्न कळतील, नुस्ते आजारच नाही तर बाकीचेही आरोग्याचे, जगण्याचे प्रश्न कळतील.  त्यातून त्यांना काही मदत लागली तर (म्हणजे आर्थिकच असं नव्हे) जाऊन भेटा संबंधित डॉक्टरला. अडचण सांगा, उपचार योग्य होत आहेत का ते विचारा, मदत मागा. आपला काही संबंध नसताना आपण वाईटपणा घेतला तर त्याचा उपयोग होतो. 
 
3) समाजसेवी संस्थेत जाऊन काय विचाराल ?
अनेकांना वाटतं की, असं गावभर फिरून काय होणार? आपण एखाद्या सोशल वर्क करणा:या संस्थेबरोबर काम करू. करायला हरकत नाही. चांगली, मनापासून काम करणारी संस्था पाहून नक्की काम करा; मात्र त्या संस्थेत पाय ठेवताच त्या लोकांची मुलाखत घ्यायला लागू नका. तुम्ही काम काय करता, कसं करता, मग बाकीचे प्रश्न सोडून हाच प्रश्न का निवडला, असं करता त्याऐवजी असं करून पाहिलं तर असे फुकट सल्ले देऊ नका.
त्यापेक्षा एकच प्रश्न विचारा,  मी तुमच्या कामात काय मदत करू शकतो ? मला काही काम सांगाल का?
माहिती मागणारे प्रश्न जरूर विचारा, विषय समजून घ्या. 
हे या दृष्टीनं काम सुरू केलं, तर कदाचित तुम्हाला स्वयंसेवी संस्थेतही काही शिकायला मिळेल !
 
त्याग करताय, असं कुणासाठी ?
हे चांगलंच आहे की, तुम्ही काहीतरी करून पहायचं म्हणून समाजसेवी संस्थेत जाता, पण तिथं गेल्यावर पडेल ते काम करायची तयारी ठेवा. आपण समाजसेवा करायला आलो आणि हे काय आपल्याला डाटा एण्ट्री करायला सांगतात, असं म्हणू नका. फायलिंग करण्यापासून ते श्रमदानार्पयत जे पडेल ते काम करण्याला काही पर्यायच नसतो.
आपण मनापासून काम करायला आलो ना, मग जे मिळेल ते काम करायचं. मनापासून करायचं !
अनेकदा होतं काय की, अनेकांना एक्सपोजर हवं असतं, जबाबदारी नको असते !
ती जबाबदारी घ्या.
मग तुम्हाला कळेल की, आपल्याला नक्की काय काम करायचं आहे.
 
एमएसडब्ल्यू करण्यापूर्वी..
अनेक मुलं बीए झाले की, थेट एमएसडब्ल्यू करायला जातात. त्याआधी सामाजिक कामाचा काही अनुभवच नसतो. आता तर अनेकांना एमबीए करतानाही पुढच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे धडे गिरवतात. इंजिनिअरिंग करणा:यांनाही कम्युनिकेशन शिकावंच लागतं!
त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत घरीच बसण्यापेक्षा जर तुमचा कल असेल संवाद आणि समाजकल्याण विषयाकडे, तर काही गोष्टी समर जॉब्ज म्हणून करून पाहता येतील.
1) आपल्या आसपासच्या सामाजिक संस्थेत जा, तिथं काही काम आहे का विचारा, अनेकांना व्हॉलेण्टिअर हवे असतात. तिथं काम करून  पहा.
2) पैसे मिळणार नाहीत पण आपल्या गावात घरटी किती माणसांकडे रोजगार हमी कार्ड आहे. आरोग्य कार्ड आहे हे शोधा. असा अभ्यास तुम्हाला खूप काही शिकवेन !
3) सामाजिक संस्थांचे सव्र्हे, त्याचं डेटा कलेक्शन, सॅम्पलिंग हे कामं तुम्ही करू शकता.
4) सगळ्यात महत्त्वाचं, हे काम आपण समाजाचं भलं करण्यासाठी तर स्वत: काहीतरी शिकायचं म्हणून करतो हे लक्षात ठेवा!