शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

भारतीय टेनिसचा ‘आखाडा’

By admin | Updated: April 8, 2017 18:46 IST

लिएंडर पेस आणि महेश भूपती या दोन महान खेळाडूंनी टेनिसला नुसता सुवर्णकाळच मिळवून दिला नाही, तर देशाची पताका सातासमुद्रापार फडकवताना देशाचंही नाव रोशन केलं.

लिएंडर पेस आणि महेश भूपती या दोन महान खेळाडूंनी टेनिसला नुसता सुवर्णकाळच मिळवून दिला नाही, तर देशाची पताका सातासमुद्रापार फडकवताना देशाचंही नाव रोशन केलं. या दोघांच्या जोडीनं अनेक अंतरराष्ट्रीय स्पर्धांत, ग्रॅँड स्लॅम स्पर्धांत विजेतेपद मिळवून टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण केला.कालांतरानं दोघांमध्ये मतभेद झाले. दोघंही वेगळे झाले, तेव्हापासून टेनिसच्या क्षीतिजावरचा भारतीय सूर्यही आपलं तेजोवलय गमावून बसला. जोपर्यंत हे दोघं एकत्रित खेळत होते, त्यांच्यातला समन्वय कायम होता, तोपर्यंत ते मैदानावर खेळत असताना त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा कायम केली जायची, पण हे एक आता स्वप्नच राहिलं आहे.हे दोघं खेळाडू नुसते विभक्तच झाले नाहीत, तर आपापला आपापला अहंकार कायम ठेवून दुसऱ्याला कायम खाली पाहायला लावण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. त्याचंच एक मूर्तिमंत रुप म्हणजे आताच्या डेव्हिस कपदरम्यान पेस आणि भूपती यांच्यात पुन्हा नव्यानं उफाळून आलेला वाद.उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी न खेळणारा भारतीय कर्णधार महेश भूपतीनं लिएंडर पेसला संघातून डच्चू दिल्यानंतर आणखी एका नव्याला वादाला फोडणी मिळाली आहे आणि त्यांच्यातली खडाजंगी पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाली आहे. डेव्हिस चषकात गेल्या सलग २७ वर्षांपासून पेस खेळत आहे. हा एक विक्रम आहे. या विक्रमाला पहिल्यांदाच ब्रेक लागला.खरं तर या दोघाही खेळाडूंनी भारतीय टेनिसला केवळ एका नव्या उंचीवरच नेऊन पोहोचवलं नाही, तर अनेक नव्या खेळाडूंसमोर आदर्श ठेवताना त्यांना टेनिस कोर्टवर आणण्यासाठी प्रेरितही केलं, पण दिवसेंदिवस ‘शाळकरी’ होत जाणाऱ्या त्यांच्यातील वादालाही आता ब्रेक लागायला हवा.या दोघांनी एकत्र यावं, एकत्रितपणे खेळावं यासाठी गेल्या काही वर्षांत खूप प्रयत्न झाले. बऱ्याच मनधरणीनंतर ्रकाही वेळा ते यशस्वीही झाले, पण दुभंगलेल्या मनांनी खेळताना मैदानावरची त्यांची कामगिरी फारशी उंचावली नाही हेही खरं.आतापर्यंत दोन्हीही खेळाडूंनी एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली आहे, पण हे करीत असताना आपण आपल्या देशाचंही नाव बदनाम करीत आहोत, नव्या खेळाडूंसमोर चुकीचा पायंडा पाडत आहोत, याचंही भान त्यांना राहिलं नाही. दोघांनीही वारंवार अश्लाघ्य भाषेत एकमेकांवर वार करताना एकमेकांना पाण्यात पाहण्याचाच प्रकार केला. हे कधी थांबणार?हे दोन्हीही खेळाडू अजूनही मैदानावर खेळत असले तरी, त्यांचं वय पाहता त्यांचा सुवर्णकाळ आता संपलेला आहे यात काहीच शंका नाही. यात कोण बरोबर, कोण चूक.. याच्या मुळात जाऊ नये आणि तसा प्रयत्न करण्यातही आता काही अर्थ नाही, पण ज्या खेळाडूंनी भारतीय टेनिसला सुवर्णयुग दाखवलं, तेच आज आपापल्या अहंकारापायी स्वत:ची उंची कमी करताहेत. आपल्या वागणुकीतून एक नकारात्मक उदाहरण तरुणांसमोर ठेवताहेत. यातून खेळाचीही प्रतिमा मलीन होत आहे, निदान याची तरी काळजी या दिग्गजांनी घ्यावी आणि रस्त्यावरचं घोडामैदान आता तरी बंद करायला हवं.तेवढी सूज्ञता ते आता तरी दाखवतील का?- प्रश्नच आहे..- प्रतिनिधी