शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय टेनिसचा ‘आखाडा’

By admin | Updated: April 8, 2017 18:46 IST

लिएंडर पेस आणि महेश भूपती या दोन महान खेळाडूंनी टेनिसला नुसता सुवर्णकाळच मिळवून दिला नाही, तर देशाची पताका सातासमुद्रापार फडकवताना देशाचंही नाव रोशन केलं.

लिएंडर पेस आणि महेश भूपती या दोन महान खेळाडूंनी टेनिसला नुसता सुवर्णकाळच मिळवून दिला नाही, तर देशाची पताका सातासमुद्रापार फडकवताना देशाचंही नाव रोशन केलं. या दोघांच्या जोडीनं अनेक अंतरराष्ट्रीय स्पर्धांत, ग्रॅँड स्लॅम स्पर्धांत विजेतेपद मिळवून टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण केला.कालांतरानं दोघांमध्ये मतभेद झाले. दोघंही वेगळे झाले, तेव्हापासून टेनिसच्या क्षीतिजावरचा भारतीय सूर्यही आपलं तेजोवलय गमावून बसला. जोपर्यंत हे दोघं एकत्रित खेळत होते, त्यांच्यातला समन्वय कायम होता, तोपर्यंत ते मैदानावर खेळत असताना त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा कायम केली जायची, पण हे एक आता स्वप्नच राहिलं आहे.हे दोघं खेळाडू नुसते विभक्तच झाले नाहीत, तर आपापला आपापला अहंकार कायम ठेवून दुसऱ्याला कायम खाली पाहायला लावण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. त्याचंच एक मूर्तिमंत रुप म्हणजे आताच्या डेव्हिस कपदरम्यान पेस आणि भूपती यांच्यात पुन्हा नव्यानं उफाळून आलेला वाद.उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी न खेळणारा भारतीय कर्णधार महेश भूपतीनं लिएंडर पेसला संघातून डच्चू दिल्यानंतर आणखी एका नव्याला वादाला फोडणी मिळाली आहे आणि त्यांच्यातली खडाजंगी पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाली आहे. डेव्हिस चषकात गेल्या सलग २७ वर्षांपासून पेस खेळत आहे. हा एक विक्रम आहे. या विक्रमाला पहिल्यांदाच ब्रेक लागला.खरं तर या दोघाही खेळाडूंनी भारतीय टेनिसला केवळ एका नव्या उंचीवरच नेऊन पोहोचवलं नाही, तर अनेक नव्या खेळाडूंसमोर आदर्श ठेवताना त्यांना टेनिस कोर्टवर आणण्यासाठी प्रेरितही केलं, पण दिवसेंदिवस ‘शाळकरी’ होत जाणाऱ्या त्यांच्यातील वादालाही आता ब्रेक लागायला हवा.या दोघांनी एकत्र यावं, एकत्रितपणे खेळावं यासाठी गेल्या काही वर्षांत खूप प्रयत्न झाले. बऱ्याच मनधरणीनंतर ्रकाही वेळा ते यशस्वीही झाले, पण दुभंगलेल्या मनांनी खेळताना मैदानावरची त्यांची कामगिरी फारशी उंचावली नाही हेही खरं.आतापर्यंत दोन्हीही खेळाडूंनी एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली आहे, पण हे करीत असताना आपण आपल्या देशाचंही नाव बदनाम करीत आहोत, नव्या खेळाडूंसमोर चुकीचा पायंडा पाडत आहोत, याचंही भान त्यांना राहिलं नाही. दोघांनीही वारंवार अश्लाघ्य भाषेत एकमेकांवर वार करताना एकमेकांना पाण्यात पाहण्याचाच प्रकार केला. हे कधी थांबणार?हे दोन्हीही खेळाडू अजूनही मैदानावर खेळत असले तरी, त्यांचं वय पाहता त्यांचा सुवर्णकाळ आता संपलेला आहे यात काहीच शंका नाही. यात कोण बरोबर, कोण चूक.. याच्या मुळात जाऊ नये आणि तसा प्रयत्न करण्यातही आता काही अर्थ नाही, पण ज्या खेळाडूंनी भारतीय टेनिसला सुवर्णयुग दाखवलं, तेच आज आपापल्या अहंकारापायी स्वत:ची उंची कमी करताहेत. आपल्या वागणुकीतून एक नकारात्मक उदाहरण तरुणांसमोर ठेवताहेत. यातून खेळाचीही प्रतिमा मलीन होत आहे, निदान याची तरी काळजी या दिग्गजांनी घ्यावी आणि रस्त्यावरचं घोडामैदान आता तरी बंद करायला हवं.तेवढी सूज्ञता ते आता तरी दाखवतील का?- प्रश्नच आहे..- प्रतिनिधी