शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

खात्री वाटली, सोडवले तर सुटतीलही प्रश्न

By admin | Updated: July 23, 2015 18:14 IST

‘झुंज दुष्काळाशी’ या मोहिमेचा मी समन्वयक. या कामाच्या निमित्ताने पाणीप्रश्नावर काम करणा:या संस्थांसोबत काम करायचं ठरवलं.

- आकाश भोर
 
‘झुंज दुष्काळाशी’ या मोहिमेचा मी समन्वयक. या कामाच्या निमित्ताने पाणीप्रश्नावर काम करणा:या संस्थांसोबत काम करायचं ठरवलं.  
मी पी. साईनाथ यांची नीरोज गेस्ट्स ही डॉक्युमेण्टरी पाहिली आणि खूपच अस्वस्थ झालो. माङया आजूबाजूला एवढं सगळं सुरू आहे आणि मला याची काहीच माहिती नाही, याचं वाईट वाटलं. त्यामुळे जेव्हा ‘झुंज दुष्काळाशी’ या उपक्रमाबद्दल समजलं, तेव्हा त्याच्या कामात लगेच सहभागी झालो.
दुष्काळ हा इतर नैसर्गिक आपत्तींपेक्षा निराळा आहे. भूकंप, त्सुनामी यामुळे कमी काळात प्रचंड नुकसान होतं. मोठय़ा प्रमाणात जीवितहानीही होते आणि आर्थिक नुकसानही होते. दुष्काळाचं मात्र असं नाही. प्रत्यक्ष जीवितहानी कमी असली, तरी शेती-गुरे यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे स्थलांतर होतं. आर्थिक घडी विस्कटते. आरोग्य-शिक्षण यावरदेखील परिणाम होतो. त्यातून निर्माण होणा:या सामाजिक-कौटुंबिक समस्यादेखील तितक्याच भयानक आहेत हे मला याच प्रवासात समजलं.
सध्याचा दुष्काळ 1972 च्या दुष्काळापेक्षा वेगळा आहे. तेव्हा 2-3 वर्षे पाऊसच कमी पडला होता. यावेळी मात्र तसे नाही. पाऊस पडलाय, पण आपण पाण्याचं  व्यवस्थित नियोजन न केल्याने ही वेळ आली आहे. हा दुष्काळ मानवनिर्मित आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये 23क्क् मिमी पाऊस पडूनही आयाबायांना पाण्यासाठी रोज पायपीट करावी लागते. दुष्काळ निवारणासाठी, सिंचनासाठी मोठी धरणो, बंधारे, कालवे बांधले गेले. पण महाराष्ट्रातील फक्त 18 टक्के शेती याद्वारे केली जाते. बाकीच्या शेतीसाठी पावसाचं पाणी आणि भूजलाचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांत भूजलाचा प्रचंड उपसा झालाय. सरकारने बोअरसाठी 2क्क् फूट ही मर्यादा घालून दिली आहे. पण ती कोणी पाळताना दिसत नाही. काही ठिकाणी भूजल पातळी एक हजार फूट एवढी खोल गेली आहे. 
वाहून जाणारे पावसाचे पाणी मातीपण वाहून नेते. एक इंच मातीचा थर तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. भूजल पातळी उंचावण्यासाठी तसेच मृद्संधारण आणि पाणलोट विकासासाठी माथा ते पायथा करायच्या उपचारांची माहिती मला या कामात मिळाली. कडवंची पाणलोट क्षेत्रला भेट दिली. तिथल्या शेतक:यांशी गप्पा मारल्या. 8क्क्-1क्क्क् मिमी पाऊस पडणा:या कडवंचीत पाणलोटच्या कामामुळे झालेला बदल थक्क करणारा होता. या पाणलोट क्षेत्रचं नियोजन कसं करावं याविषयी जालन्याच्या कृषिविज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतलं.
नाशिकची प्रगती अभियान ही संस्था दुष्काळाच्या या प्रश्नावर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम करते. जेणोकरून लोकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे स्थलांतर थांबेल, तसेच यातून होणारी वैयक्तिक व सामुदायिक लाभाची 8क् टक्के कामे ही पाणलोटाची असतात. तिथे झालेल्या प्रशिक्षणामध्ये रोहयोसोबतच पंचायत राज व्यवस्था, जलयुक्त शिवार योजना, दुष्काळ आणि मीडिया तसेच संविधान आणि आपण या विषयांबद्दल अधिक जाणून घेता आलं. लोकांची रोजगार हमीबद्दलची  अपुरी आणि चुकीची माहिती, प्रशासनाची अनास्था, भ्रष्टाचार हे सारं या काळात फार जवळून अनुभवता आलं. एक नवीनच जग दिसलं. आणि आपण एरवी समजतो त्यापेक्षा स्थानिक प्रश्न निराळेच असतात हे लक्षात आलं. 
माङया कामाचा मुख्य उद्देश जरी दुष्काळ हा असला, तरी त्या निमित्ताने गावाची, गावातील इतर समस्यांशी झालेली ओळख झाली. शेतीबद्दल अधिक जाणून घेता  आलं. श्रमदान करणं हा फारच छान अनुभव होता. श्रमदानातून मन्याळी येथे आम्ही दोन अनघड दगडी बांध बांधले. या दोन महिन्यांत ब:याच ठिकाणी फिरणं झालं, अनेक लोकांशी ओळखी झाल्या. दुष्काळाचा प्रश्न अधिक व्यापकतेने समजला. 
प्रश्न पाहून उदास वाटलं, काळजी वाटली, अस्वस्थही झालो; पण  योग्य पद्धतीने लोकसहभागातून काम केलं तर भविष्यात येणारी संकटं टाळता येऊ शकतील, असा विश्वासदेखील मनाला वाटला.