शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

खात्री वाटली, सोडवले तर सुटतीलही प्रश्न

By admin | Updated: July 23, 2015 18:14 IST

‘झुंज दुष्काळाशी’ या मोहिमेचा मी समन्वयक. या कामाच्या निमित्ताने पाणीप्रश्नावर काम करणा:या संस्थांसोबत काम करायचं ठरवलं.

- आकाश भोर
 
‘झुंज दुष्काळाशी’ या मोहिमेचा मी समन्वयक. या कामाच्या निमित्ताने पाणीप्रश्नावर काम करणा:या संस्थांसोबत काम करायचं ठरवलं.  
मी पी. साईनाथ यांची नीरोज गेस्ट्स ही डॉक्युमेण्टरी पाहिली आणि खूपच अस्वस्थ झालो. माङया आजूबाजूला एवढं सगळं सुरू आहे आणि मला याची काहीच माहिती नाही, याचं वाईट वाटलं. त्यामुळे जेव्हा ‘झुंज दुष्काळाशी’ या उपक्रमाबद्दल समजलं, तेव्हा त्याच्या कामात लगेच सहभागी झालो.
दुष्काळ हा इतर नैसर्गिक आपत्तींपेक्षा निराळा आहे. भूकंप, त्सुनामी यामुळे कमी काळात प्रचंड नुकसान होतं. मोठय़ा प्रमाणात जीवितहानीही होते आणि आर्थिक नुकसानही होते. दुष्काळाचं मात्र असं नाही. प्रत्यक्ष जीवितहानी कमी असली, तरी शेती-गुरे यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे स्थलांतर होतं. आर्थिक घडी विस्कटते. आरोग्य-शिक्षण यावरदेखील परिणाम होतो. त्यातून निर्माण होणा:या सामाजिक-कौटुंबिक समस्यादेखील तितक्याच भयानक आहेत हे मला याच प्रवासात समजलं.
सध्याचा दुष्काळ 1972 च्या दुष्काळापेक्षा वेगळा आहे. तेव्हा 2-3 वर्षे पाऊसच कमी पडला होता. यावेळी मात्र तसे नाही. पाऊस पडलाय, पण आपण पाण्याचं  व्यवस्थित नियोजन न केल्याने ही वेळ आली आहे. हा दुष्काळ मानवनिर्मित आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये 23क्क् मिमी पाऊस पडूनही आयाबायांना पाण्यासाठी रोज पायपीट करावी लागते. दुष्काळ निवारणासाठी, सिंचनासाठी मोठी धरणो, बंधारे, कालवे बांधले गेले. पण महाराष्ट्रातील फक्त 18 टक्के शेती याद्वारे केली जाते. बाकीच्या शेतीसाठी पावसाचं पाणी आणि भूजलाचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांत भूजलाचा प्रचंड उपसा झालाय. सरकारने बोअरसाठी 2क्क् फूट ही मर्यादा घालून दिली आहे. पण ती कोणी पाळताना दिसत नाही. काही ठिकाणी भूजल पातळी एक हजार फूट एवढी खोल गेली आहे. 
वाहून जाणारे पावसाचे पाणी मातीपण वाहून नेते. एक इंच मातीचा थर तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. भूजल पातळी उंचावण्यासाठी तसेच मृद्संधारण आणि पाणलोट विकासासाठी माथा ते पायथा करायच्या उपचारांची माहिती मला या कामात मिळाली. कडवंची पाणलोट क्षेत्रला भेट दिली. तिथल्या शेतक:यांशी गप्पा मारल्या. 8क्क्-1क्क्क् मिमी पाऊस पडणा:या कडवंचीत पाणलोटच्या कामामुळे झालेला बदल थक्क करणारा होता. या पाणलोट क्षेत्रचं नियोजन कसं करावं याविषयी जालन्याच्या कृषिविज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतलं.
नाशिकची प्रगती अभियान ही संस्था दुष्काळाच्या या प्रश्नावर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम करते. जेणोकरून लोकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे स्थलांतर थांबेल, तसेच यातून होणारी वैयक्तिक व सामुदायिक लाभाची 8क् टक्के कामे ही पाणलोटाची असतात. तिथे झालेल्या प्रशिक्षणामध्ये रोहयोसोबतच पंचायत राज व्यवस्था, जलयुक्त शिवार योजना, दुष्काळ आणि मीडिया तसेच संविधान आणि आपण या विषयांबद्दल अधिक जाणून घेता आलं. लोकांची रोजगार हमीबद्दलची  अपुरी आणि चुकीची माहिती, प्रशासनाची अनास्था, भ्रष्टाचार हे सारं या काळात फार जवळून अनुभवता आलं. एक नवीनच जग दिसलं. आणि आपण एरवी समजतो त्यापेक्षा स्थानिक प्रश्न निराळेच असतात हे लक्षात आलं. 
माङया कामाचा मुख्य उद्देश जरी दुष्काळ हा असला, तरी त्या निमित्ताने गावाची, गावातील इतर समस्यांशी झालेली ओळख झाली. शेतीबद्दल अधिक जाणून घेता  आलं. श्रमदान करणं हा फारच छान अनुभव होता. श्रमदानातून मन्याळी येथे आम्ही दोन अनघड दगडी बांध बांधले. या दोन महिन्यांत ब:याच ठिकाणी फिरणं झालं, अनेक लोकांशी ओळखी झाल्या. दुष्काळाचा प्रश्न अधिक व्यापकतेने समजला. 
प्रश्न पाहून उदास वाटलं, काळजी वाटली, अस्वस्थही झालो; पण  योग्य पद्धतीने लोकसहभागातून काम केलं तर भविष्यात येणारी संकटं टाळता येऊ शकतील, असा विश्वासदेखील मनाला वाटला.