शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

इंजिनिअरिंगला जाताय? - पण कशासाठी?

By admin | Updated: April 6, 2017 19:32 IST

काही विचार केलाय? मुंबई, ओंकार करंबेळकर ‘चांगली नोकरी मिळवायचीय? मग जा इंजिनिअरिंगकडे!

काही विचार केलाय? मुंबई, ओंकार करंबेळकर ‘चांगली नोकरी मिळवायचीय? मग जा इंजिनिअरिंगकडे!’ - गेल्या दशकभरामध्ये नोकरी मिळवण्यासाठी सोपा मार्ग किंवा खात्रीशीर मार्ग म्हणूनच इंजिनिअरिंगकडे पाहिले जात होते. साहजिकच मेडिकल शाखेपाठोपाठ या शाखेला विज्ञान शाखेचे विद्यार्थीही पसंती देत होते. मात्र त्यामागे आपल्या आवडीनिवडीचा कोणताही विचार विद्यार्थी करत नसल्याचे आताच्या स्थितीवरुन स्पष्ट होत आहे. मेडिकलला प्रवेश मिळाला नाही म्हणून इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा हे काही तरुणांचे मुख्य कारण होते तर काही तरुण आपले सर्व मित्र या शाखेत शिकणार आहेत म्हणून आपणही तिकडे जायचं असा सरळ, सरधोपट निर्णय घेत होते. वास्तविक दहावी-बारावीनंतर काय शिकायचं हा निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा ठरवत असतो, पण आपल्या विचारांचा, आवडीचा कल लक्षात न घेता बेधडक निर्णय घेऊन बरीचशी मुले अयोग्य निर्णय घेतात.याबरोबरच बहुतांश मुले आणि त्यांचे पालक केवळ मार्कांच्या आधारावर शिक्षणाचा निर्णय घेतात. अमूक इतके मार्क्स पडले की मेडिकलला जायचं, त्यापेक्षा थोडे कमी पडले तर अभियांत्रिकी, त्यातही जमलं नाही तर मग दुसरं काहितरी करायचं असा सरळसोट विचार केला जातो. अशाप्रकारे घेतले जाणारे निर्णयच मुलांसाठी धोकादायक ठरतात. पहिल्या वर्षातच बारावी पास झाल्याचा आणि सुटीचा आनंद विरून जातो. बहुतांश मुलांना आपला निर्णय चुकल्याची जाणीव होते मात्र ते अशा स्थितीत काहीच करु शकत नसतात. इतका खर्च करुन प्रवेश मिळवायचा, फी भरायची, काही वेळेस डोनेशनही द्यावे लागलेले असते, मग हा कोर्स कसा सोडायचा असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येऊ लागतो. घरच्या लोकांच्या अपेक्षा, परीक्षेचा ताण, न आवडणारा अभ्यासक्रम आणि नापास होण्याची भीती अशी अनेकांगी चिंता सतत सतावू लागते, पण आता हे स्वीकारलंय म्हटल्यावर मागे फिरता येणार नाही असा विचार करत मुलं सेमिस्टर ढकलत राहतात. मग सुरु होते ‘केटी’चे चक्र. केटी साचून मग ‘इयर डाऊन’ होते. इंजिनियरिंगच्या मुलांच्याच भाषेत सांगायचे तर ‘वायडी’चे ग्रहण लागते. या चक्रात दुर्देवाने मुले सापडतात आणि त्यांच्या आयुष्यातील शिक्षणाचा महत्वाचा कालावधी वाया जातो. हे सगळं टाळण्यासाठी दहावी, बारावीचे शिक्षण सुरु असतानाच आपला कल नक्की कोणत्या दिशेला आहे याचा विचार सुरु करायला हवा किंवा बुद्धयांक चाचणीचीही मदत घ्यायला हवी. डॉक्टर्स, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट्स आणि शिक्षकांची यामध्ये मदत होऊ शकते. इंजिनिअरिंग किंवा कोणताही अभ्यासक्रम शिकण्यापूर्वी त्यामध्ये नक्की काय आहे, आपण तो पुरा करू शकू का, त्यामध्ये आपल्याला खरंच गती आहे का याचा विचार करायला हवा. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाही मार्क अपेक्षेप्रमाणे पडले नाहीत तर खचून न जाता, न लाजता दुसऱ्यांची मदत घेतली पाहिजे. आपल्या वर्गातील विद्यार्थी, सीनिअर्स, शिक्षक, पालक, समुदेशक यांच्याकडे अडचणी मांडायला हव्यात. विशेषत: ग्रामीण भागातील मुलांनी याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. एखादा अभ्यासक्रम निवडण्यात आपला निर्णय चुकला याचा अर्थ आपण कोणतेच काम करु शकत नाही असा होत नाही.