शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

माहिती द्या, प्रश्न मुलीच सोडवतील!

By admin | Updated: December 18, 2015 15:30 IST

वयात येणा:या ग्रामीण भागातील मुलींना अजून शरीरविज्ञानही नीट शिकवलं जात नाही, तिथं स्वच्छता, अंधश्रद्धा आणि त्यासाठीचा संघर्ष या फार पुढच्या टप्प्यातल्या गोष्टी आहेत!

आमची युवा मित्र ही सामाजिक संस्था नाशिक जिल्ह्यात काम करते. वयात येणा:या या वयात त्यांना योग्य मार्गदर्शन, सल्ला, माहिती मिळाल्यास त्याचा सर्वागीण विकास होऊ शकतो, याच उद्देशाने युवा मित्रने मागील तीन वर्षापासून किशोरवयीन मुलींच्या विकासासाठी, सुकन्या-किशोरींसाठी जीवन कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम राबवत असताना मुलींना त्यांच्यात होणारे शारीरिक व मानसिक बदल, स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांच्या शरीराबद्दलचे चुकीचे समज, मासिक पाळी याबद्दल शास्त्रीय माहिती देणारे उपक्रम आम्ही करतो.
पण ते करताना आजच्या खेडय़ापाडय़ातल्याच नाही, तर शहरी मुलींचेही अनेक प्रश्न आमच्यासमोर आले. मासिक पाळी हा शब्द उच्चारला तरी मुलींना घाण, किळस वाटते. आजही या विषयासंदर्भात ग्रामीण भागात मुलींच्या मनात अतिशय अंधश्रद्धा आहे. त्या काळात स्वयंपाक करायचा नाही, पाणी भरायचे नाही,  पापड, लोणच्याला हात लावायचा नाही, पापड लाटायचे नाहीत. एकीकडे या समजुती, तर दुसरीकडे भीतीही असतेच मनात.  आमच्या असं लक्षात आलंय की, अगदी घरात देवाची छोटी पूजा, सण, लग्न असलं की अगदी लहान वयाच्या मुलीसुद्धा पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेतात. विवाहित तरुणींच्या बाबतीत विचारायलाच नको. या गोळ्यांचे आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम होतात हेसुद्धा अनेकींना माहिती नाही. 
मासिक पाळी ज्या गर्भाशयातून येते, ती ही गर्भापिशवी आपल्या पोटात नक्की कुठे आहे, तिचा आकार किती मोठा आहे हे शालेय शरीरविज्ञानसुद्धा मुलींना माहिती नसतं. मूल होण्यासाठी मासिक पाळी यावी लागते एवढंच अनेकजणी सांगतात.
मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता या विषयावर तर कुणी बोलतही नाही. खरंतर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ग्रामीण भागात सतत पाण्याचा दुष्काळ असतो. त्यामुळे कपडय़ांच्या घडय़ा मुलींना बदलायच्या म्हणजे मोठा प्रश्न पडतो. पाणी कुठून आणायचं? एवढी स्वच्छता बाळगायची, काळजी घ्यायची ह्यासाठी घरात स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था नसते. त्यामुळे अतिशय कुचंबणा होत असते. कपडे वाळवायला जागा नसते त्यामुळे बहुतेक ठिकाणी हे कपडे अडगळीच्या जागी, गोठय़ात, जिथे कुणाचीही नजर पडणार नाही अशा ठिकाणी वाळत घातले जातात. पावसाळ्यात तर कपडे वाळतच नाही तरी ओलसर कपडे वापरतात. ह्या कपडय़ांवर अडगळीत वाळत घातल्याने जीवजंतू बसतात, त्यांना कुबट वास येतो. त्यामुळे या मुलींना/महिलांना किती प्रकारच्या संसर्गाना तोंड द्यावे लागत असेल ह्याची कल्पनाही न  केलेली बरी. पुन्हा ह्याबद्दल कोणीशी बोलायची पंचाईत. पाळीच्या काळात वापरले जाणारे कपडे अनेक घरात सगळ्या बायकांचे एकच असतात. त्यामुळेही लैंगिक आजार वाढतात.
सॅनिटरी नॅपकिनचा विषय तर बराच दूर आहे. कारण एकतर महाग असतात. ते वापरायचे म्हणजे गावात मिळत नाही. तालुक्याच्या ठिकाणून कोण आणून देणार? त्याचबरोबर आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची विल्हेवाट कशी लावायची? शाळेत कधी-कधी काही कंपन्या जाहिरातीसाठी मुलींना 1-2 नॅपकिनचे पॅकेट देतात. पण ते कसे वापरायचे हेसुद्धा मुलींना माहिती नसतं. अनेक शाळांमध्ये आजही स्वच्छतागृह नाहीत. जिथं आहेत तिथं  मुलींच्या टॉयलेटची परिस्थिती अतिशय घाणोरडी आहे. तिथे कधीच पाणी, डस्टबीन नसतं. पण इलाज नसल्यानं मुलींना तिथंच जावं लागतं. त्यातूनही अनेक जंतुसंसर्ग होतात. 
अशासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने व कोणतीच शास्त्रीय माहिती नसल्याने मुली मासिक पाळीविषयी सकारात्मक दृष्टीने कसा विचार करतील? इयत्ता नववी-दहावीच्या विज्ञान  पुनरुत्पादक संस्था हा स्वतंत्र धडा आहे. पण सहसा हा धडा अनेक शिक्षक मुला-मुलींना एकत्र शिकवत नाहीत. कारण कसं शिकवायचं नी काय सांगायचं हा प्रश्न अनेक शिक्षकांनाही सतावतो.  
शालेय शिक्षणात जर या विषयांचा समावेश केला, शास्त्रीय माहिती दिली, मुलामुलींना योग्य ज्ञान वयात येतानाच मिळालं तर अनेक गैरसमजुती दूर होतील आणि नको ते अवाजवी कुतूहलही कमी होऊन चुकीची माहितीही मुलंमुली शोधणार नाहीत.
ग्रामीण भागात तर अशी माहिती पोहचण्याची मोठी गरज आहे.
 
- मनीषा मालपाठक-पोटे
(मनीषा युवा मित्र या संस्थेबरोबर काम करताना ग्रामीण भागातील वयात येणा:या मुलामुलींसाठी जाणीव-जागृतीचे उपक्रम करतात.)