शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

परीक्षांच्या  घोळात  विद्यार्थी चक्रव्यूहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 20:00 IST

बीए-बीकॉम-बीएस्सीवाल्यांच्या परीक्षा रद्द, वाटलं तर ऐच्छिक म्हणून परीक्षा द्या, व्यावसायिकवाल्यांच्या परीक्षा तर रद्द; पण पदवीचं काय याचा निर्णय त्यांच्या मातृसंस्था घेणार, या घोळात तरुणांना कळतच नाही, की आपलं नक्की काय होणार?

ठळक मुद्देपरीक्षांचा चिवडा

- सीमा महांगडे

यंदा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले सारे विद्यार्थी जणू अभिमन्यू झाले आहेत.ज्यांना परीक्षांच्या चक्र व्यूहातून बाहेर कसं पडायचं हेच आता त्यांना समजेनासं झालं आहे.यंदा पदवी घेऊ, मग पुढच्या आयुष्याची नवी वाट शोधू, दणदणीत रिझल्ट लागेल वगैर मनात असणा:यांना आता ‘सरासरी’ मार्क  घेऊनच परीक्षेला नाही म्हणता येणं शक्य आहे.मात्र परीक्षाच न देता असं ‘पास’ होणं, सरासरी मार्काचं मार्कशिट घेणं हे मुलांच्या मनालाही अस्वस्थ करतं आहेच.शिक्षणाची इतकी वर्षे पास-नापासच्या कसोटीवर काढलेली असताना, परीक्षा म्हणजे महादिव्य ही भावना असताना नेमकं पदवीच्या शेवटच्या टप्प्यात सरासरीच्या गुणांच्या कुबडय़ा घेऊन डिग्रीचा कागद घ्यावा लागेल. आणि त्या निकालासाठीही विद्याथ्र्यानाच हे लिहून द्यावं लागेल की, सरासरीनुसार मी निकाल घ्यायला तयार आहे.जे हा पर्याय नाकारतील आणि परीक्षाच देणार म्हणतील त्यांची परीक्षा कधी घ्यायची विद्यापीठ संपूर्ण स्थितीचा अभ्यास करून घेईल. म्हणजे नक्की कधी हे आज तरी स्पष्ट नसल्याने या मुलांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहील.ज्यांना परीक्षाच न देता सरासरी निकाल हवा, त्यांना मात्र तो मिळू शकेल. अर्थात ते करताना ही धास्तीही आहे की हा डिग्रीचा कागद उद्या नोकरीतील कौशल्यांच्या कसोटीवर कितपत खरा उतरेल.आता सरासरी मार्काची पदवी घ्यायची की परीक्षा देऊन आपली गुणवत्ता खणखणीत वाजवायची हा निर्णय ज्या त्या विद्याथ्र्याने करायचा आहे.आणि तो कशाच्या बळावर करायचा हे मात्र अनेक मुलांना कळत नाहीये. अनेक तरुण मुलांशी बोललं तर त्यांचा हाच संभ्रम आहे की, नेमका आपण काय निर्णय घ्यायचा? आपल्या पुढच्या शिक्षणाचं आणि नोकरीचं काय होईल?या सगळ्यात अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे आधी परीक्षा आणि मग पदवीच्या अंतिम परीक्षा आणि आता व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या.बीए-बीकॉम-बीएस्सीवाल्यांच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या असल्या तरी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असणा:या तरुण मुलांचे प्रश्न तर जास्तच गंभीर आहेत.वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला असणारे काही तरुण सांगतात की, परीक्षा झालीच नाही तर सरासरीच्या जिवावर पदवी मिळेलही; पण असा सरासरी शिक्का असलेल्या डॉक्टरच्या हातात कोण आपला जीव सोपवेल? अभियंते, लॉच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थीही धास्तीत आहेत. त्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्यांच्या मातृसंस्थांचा निर्णयही त्यासंदर्भात होणं अजून बाकी आहे. त्या संस्थांना या मुलांच्या पदवीसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.व्यावसायिक आणि न व्यावसायिक असा भेदही यातून शिक्षणव्यवस्थेसमोर आहे, दुसरीकडे विद्याथ्र्याच्या डोक्यावर निकालाची, पदवीची टांगती तलवार आहेच.नेमकं काय होणार हे अनेकांना कळत नाही.

यासा:यात परीक्षांचा निर्णय ऐच्छिक असल्याने आणि मूल्यांकनाची जबाबदारी सर्वस्वी विद्यापीठांवर सोपविल्याने एकसूत्रतेच्या सूत्रलाच तिलांजली देण्याचा प्रकार झाला आहे.  केंद्राने देशभरात यासंदर्भात एक सूत्र ठरवून द्यावे ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची मागणी योग्य होती.मात्र असे समान सूत्र महाराष्ट्रातही ठरवता आलेले नाही. उद्या तू मुंबई विद्यापीठातून पास होऊन आलेला आणि तू अमरावती विद्यापीठातून पास होऊन आलेला म्हणूनही विद्याथ्र्याची तुलना होणार नाही हे कशावरून?किमान राज्यातील शिक्षणात एकसूत्रीपणा असणं, विद्याथ्र्याना नोकरीत, पुढील उच्च शिक्षणात समान संधी मिळण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. ते तरी साधलं जायला हवं.बाकी परीक्षांच्या आधी काही दिवस अभ्यास करून, गुण पदरात पाडून घेणा:यांचीही या निर्णयानं मोठीच गोची झाली आहे.एकीकडे भरपूर बेरोजगार पदवीधर आधीच बाहेर असताना आता ‘सरासरी’ निकाल घेऊन पडणा:यांचं काय होणार हा मोठाच प्रश्न आहे.

(सीमा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत शैक्षणिक वार्ताहर आहे.)