शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बहिरे की ढिम्म?

By admin | Updated: September 24, 2015 15:02 IST

सेलिब्रेशन बनता है, हे मान्य; पण त्यात तारतम्य नको का?

 
 
ही ईमेल लिहावी की नाही याचा मी बरेच दिवस विचार करत होतो.
आपण फारच नतद्रष्ट कॅटॅगरीतले ठरू अशी भीती होतीच.
पण तरी लिहितोय.
मी लातूरजवळच्या खेडय़ातला.
आता पुण्यात असतो.
इथं केवढा गणपतीउत्सव. केवढा खर्च. केवढा तो तामझाम. परवा एका इंटरव्ह्यूसाठी मुंबईला गेलो. सोबत दोस्त होते. गणपती पाहायला चल म्हणाले, तर गेलो. तिथं तर डोळे दिपून गेले. काय तो लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकाचा पैसा, काय ते वैभव.
त्याच दिवसांत टीव्हीवर पाहतच होतो, नाशिकच्या कुंभाची केवढी ती हौस. त्यापायी खर्च झालेला पैसा..
आपण गरीब देशात राहतोय असं कोण म्हणोल?
केवढी ही श्रीमंती?
पण त्या श्रीमंतीलाच का दोष द्या? आमच्या मराठवाडय़ातही मध्यमवर्गीय नोकरदार माणसांच्या घरात सणउत्सव वैभवात सुरूच आहेत की.
गरिबाचं कोणाला पडलंय?
मी म्हणत नाही सगळ्या पैशांची दुष्काळग्रस्तांना मदत करा. फुकट मिळालेला पैसा पुरत नाही हे आमच्या गावखेडय़ात सगळ्यांना कळतं.
त्यामुळे नुस्त्या आर्थिक मदतीला काही अर्थ नाही.
पण मुळात प्रश्न समजून घेऊन तो सोडवण्यासाठी काही मदत करता येईल का, याचा विचार तरुण मंडळांनी नको का करायला?
नेहमीच काय तो धांगडधिंगा. सेलिब्रेशन बनता है, हे मान्य; पण त्यात तारतम्य नको का?
त्याच पैशातून दुष्काळी भागातल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला तर?
पिण्याच्या पाण्यासह काही सुधार योजनांना पैसा दिला तर?
गरीब शेतक:यांना बी-बियाण्यांना पैसे मदत म्हणून देता आले तर?
असे कितीतरी पर्याय आहेत.
पण आपल्याला करायची इच्छा असेल तर.?
आपल्याला इच्छाच होत नाही असं आहे, की आपल्या संवेदनाच पुरत्या शहरी झाल्या आहेत?
मी विचारतोय हे प्रश्न स्वत:ला, कारण मीही आता शहरीच झालोय.
थोडासा बहिरा, थोडासा ढिम्म आणि बथ्थडही!
- आशुतोष