शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

बहिरे की ढिम्म?

By admin | Updated: September 24, 2015 15:02 IST

सेलिब्रेशन बनता है, हे मान्य; पण त्यात तारतम्य नको का?

 
 
ही ईमेल लिहावी की नाही याचा मी बरेच दिवस विचार करत होतो.
आपण फारच नतद्रष्ट कॅटॅगरीतले ठरू अशी भीती होतीच.
पण तरी लिहितोय.
मी लातूरजवळच्या खेडय़ातला.
आता पुण्यात असतो.
इथं केवढा गणपतीउत्सव. केवढा खर्च. केवढा तो तामझाम. परवा एका इंटरव्ह्यूसाठी मुंबईला गेलो. सोबत दोस्त होते. गणपती पाहायला चल म्हणाले, तर गेलो. तिथं तर डोळे दिपून गेले. काय तो लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकाचा पैसा, काय ते वैभव.
त्याच दिवसांत टीव्हीवर पाहतच होतो, नाशिकच्या कुंभाची केवढी ती हौस. त्यापायी खर्च झालेला पैसा..
आपण गरीब देशात राहतोय असं कोण म्हणोल?
केवढी ही श्रीमंती?
पण त्या श्रीमंतीलाच का दोष द्या? आमच्या मराठवाडय़ातही मध्यमवर्गीय नोकरदार माणसांच्या घरात सणउत्सव वैभवात सुरूच आहेत की.
गरिबाचं कोणाला पडलंय?
मी म्हणत नाही सगळ्या पैशांची दुष्काळग्रस्तांना मदत करा. फुकट मिळालेला पैसा पुरत नाही हे आमच्या गावखेडय़ात सगळ्यांना कळतं.
त्यामुळे नुस्त्या आर्थिक मदतीला काही अर्थ नाही.
पण मुळात प्रश्न समजून घेऊन तो सोडवण्यासाठी काही मदत करता येईल का, याचा विचार तरुण मंडळांनी नको का करायला?
नेहमीच काय तो धांगडधिंगा. सेलिब्रेशन बनता है, हे मान्य; पण त्यात तारतम्य नको का?
त्याच पैशातून दुष्काळी भागातल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला तर?
पिण्याच्या पाण्यासह काही सुधार योजनांना पैसा दिला तर?
गरीब शेतक:यांना बी-बियाण्यांना पैसे मदत म्हणून देता आले तर?
असे कितीतरी पर्याय आहेत.
पण आपल्याला करायची इच्छा असेल तर.?
आपल्याला इच्छाच होत नाही असं आहे, की आपल्या संवेदनाच पुरत्या शहरी झाल्या आहेत?
मी विचारतोय हे प्रश्न स्वत:ला, कारण मीही आता शहरीच झालोय.
थोडासा बहिरा, थोडासा ढिम्म आणि बथ्थडही!
- आशुतोष