शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

बहिरे की ढिम्म?

By admin | Updated: September 24, 2015 15:02 IST

सेलिब्रेशन बनता है, हे मान्य; पण त्यात तारतम्य नको का?

 
 
ही ईमेल लिहावी की नाही याचा मी बरेच दिवस विचार करत होतो.
आपण फारच नतद्रष्ट कॅटॅगरीतले ठरू अशी भीती होतीच.
पण तरी लिहितोय.
मी लातूरजवळच्या खेडय़ातला.
आता पुण्यात असतो.
इथं केवढा गणपतीउत्सव. केवढा खर्च. केवढा तो तामझाम. परवा एका इंटरव्ह्यूसाठी मुंबईला गेलो. सोबत दोस्त होते. गणपती पाहायला चल म्हणाले, तर गेलो. तिथं तर डोळे दिपून गेले. काय तो लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकाचा पैसा, काय ते वैभव.
त्याच दिवसांत टीव्हीवर पाहतच होतो, नाशिकच्या कुंभाची केवढी ती हौस. त्यापायी खर्च झालेला पैसा..
आपण गरीब देशात राहतोय असं कोण म्हणोल?
केवढी ही श्रीमंती?
पण त्या श्रीमंतीलाच का दोष द्या? आमच्या मराठवाडय़ातही मध्यमवर्गीय नोकरदार माणसांच्या घरात सणउत्सव वैभवात सुरूच आहेत की.
गरिबाचं कोणाला पडलंय?
मी म्हणत नाही सगळ्या पैशांची दुष्काळग्रस्तांना मदत करा. फुकट मिळालेला पैसा पुरत नाही हे आमच्या गावखेडय़ात सगळ्यांना कळतं.
त्यामुळे नुस्त्या आर्थिक मदतीला काही अर्थ नाही.
पण मुळात प्रश्न समजून घेऊन तो सोडवण्यासाठी काही मदत करता येईल का, याचा विचार तरुण मंडळांनी नको का करायला?
नेहमीच काय तो धांगडधिंगा. सेलिब्रेशन बनता है, हे मान्य; पण त्यात तारतम्य नको का?
त्याच पैशातून दुष्काळी भागातल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला तर?
पिण्याच्या पाण्यासह काही सुधार योजनांना पैसा दिला तर?
गरीब शेतक:यांना बी-बियाण्यांना पैसे मदत म्हणून देता आले तर?
असे कितीतरी पर्याय आहेत.
पण आपल्याला करायची इच्छा असेल तर.?
आपल्याला इच्छाच होत नाही असं आहे, की आपल्या संवेदनाच पुरत्या शहरी झाल्या आहेत?
मी विचारतोय हे प्रश्न स्वत:ला, कारण मीही आता शहरीच झालोय.
थोडासा बहिरा, थोडासा ढिम्म आणि बथ्थडही!
- आशुतोष