शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

फक्त ट्विट नको, काम हवं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 08:00 IST

ज्ञान, मूल्य आणि सातत्य या तीन गोष्टी आणि तरुणांचा ॲक्टिव्हिजम...

- अमृत बंग

आजकाल तरुण मुलं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपली मतं व्यक्त करतात, हे खऱ्या अर्थानं अभिव्यक्तीचं ‘लोकशाहीकरण’ आहे. तरुण मुलं भरपूर बोलतात आणि सुशिक्षित तरुण मुलंमुली काय लिहितात, याचा काही परिणाम तर नक्कीच समाजावर, व्यवस्थांवर होतो. मात्र ,या व्यक्त होण्याचीही एक मर्यादा आहे, ते म्हणजे केवळ समाज माध्यमात मत व्यक्त केलं म्हणून थांबून चालणार नाही.

ज्या तरुण मुलांना कुठल्याही एका मुद्द्यासाठी ‘ॲक्टिव्हिजम’ करायचा त्यांनी ‘टिप्पणी’च्या पुढे जायचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे मुद्दा काहीही असो, ती गोष्ट बाह्य जगात जिथे खरे प्रश्न, समस्या आहे, जिथं ते घडत असतं तिथपर्यंत जायला हवं.

काहीजण केवळ समाजमाध्यमात मत मांडलं म्हणत थांबून जातात. ते पुरेसं नाही. ज्या प्रश्नाविषयी आपल्याला कळकळ वाटते, तिथं प्रत्यक्ष जायला हवं. तेही जमणार नसेल तर त्याचं जे आपल्याजवळचं रुप आहे, ते तरी समजून घ्यायला हवं.

आणि अजून त्यासह करायची गोष्ट म्हणजे आपण जी टिप्पणी करतो, जो ॲक्टिव्हिजम करतो त्याला तीन गोष्टींची जोड हवी.

ज्ञान, मूल्य, आणि सातत्य.

 

आपण ट्विटरवर मत मांडतो, आपल्या बाजूच्या मताचे १० लोक, विरोधातल्या मताचे ११ लोक, त्या वादात जो जिंकला, तो जिंकला. हे केवळ ‘मतमोजणी’चं अंकगणित आहे. त्यापलिकडे जायचं तर आपण जे बोलतो, करतो त्याला या तीन गोष्टींची जोड हवीच.

१. ज्ञानाधार.

आपलं मत आहे, तसं इतरांचं मतही आहेच. मग चूक की बरोबर कसं ठरवणार? ते ठरवायचं तर आपल्या मताला ज्ञानाधार असावा. म्हणजे जे मी म्हणतो त्याला अभ्यासाचं बळ हवं . तरच आपल्या ॲक्टिव्हिजमला बळ येतं.

 

२. मूल्याधार.

आपण जे बोलतो, लिहितो ते केवळ शाब्दिक मत न राहता, ते मी माझ्या जगण्यात उतरवतो का, ते माझ्या जगण्यात स्वीकारतो का, हे महत्त्वाचं आहे. ते तसं नसेल तर लोक म्हणतात, ठीक आहे, ही फक्त बडबड आहे.

तसं होऊ नये.

३. सातत्य

आपल्या ॲक्टिव्हिजमची प्रेरणा काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तात्कालिक राग आला म्हणून केलं मत व्यक्त. संपलं तिथेच असं होऊ नये. आपण जे काम करतो, त्यात सातत्य महत्त्वाचं. नाहीतर केवळ स्टेटमेण्ट मारून अनेकजण मोकळे होतात. तसं होऊ नये. एका विषयातला तरी अभ्यास, त्यासाठी काम, वेगवेगळ्या लोकांसमोर आपला मुद्दा मांडणे, आपल्या विषयात जे नवीन काम होतं आहे ते समजून घेत अपडेट राहणं, हे महत्त्वाचं आहे.

ज्ञान, मूल्य, सातत्य यांसह आपण जी ‘भूमिका’ घेतो, त्याचा आणि आपण ज्यासाठी काम करतो त्याचा जैविक संबंध जोडता आला पाहिजे.

तरुणांच्या ॲक्टिव्हिजमसाठी ते महत्त्वाचं आहे.

(निर्माण, तरुणांसाठीची चळवळ)