शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

फक्त ट्विट नको, काम हवं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 08:00 IST

ज्ञान, मूल्य आणि सातत्य या तीन गोष्टी आणि तरुणांचा ॲक्टिव्हिजम...

- अमृत बंग

आजकाल तरुण मुलं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपली मतं व्यक्त करतात, हे खऱ्या अर्थानं अभिव्यक्तीचं ‘लोकशाहीकरण’ आहे. तरुण मुलं भरपूर बोलतात आणि सुशिक्षित तरुण मुलंमुली काय लिहितात, याचा काही परिणाम तर नक्कीच समाजावर, व्यवस्थांवर होतो. मात्र ,या व्यक्त होण्याचीही एक मर्यादा आहे, ते म्हणजे केवळ समाज माध्यमात मत व्यक्त केलं म्हणून थांबून चालणार नाही.

ज्या तरुण मुलांना कुठल्याही एका मुद्द्यासाठी ‘ॲक्टिव्हिजम’ करायचा त्यांनी ‘टिप्पणी’च्या पुढे जायचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे मुद्दा काहीही असो, ती गोष्ट बाह्य जगात जिथे खरे प्रश्न, समस्या आहे, जिथं ते घडत असतं तिथपर्यंत जायला हवं.

काहीजण केवळ समाजमाध्यमात मत मांडलं म्हणत थांबून जातात. ते पुरेसं नाही. ज्या प्रश्नाविषयी आपल्याला कळकळ वाटते, तिथं प्रत्यक्ष जायला हवं. तेही जमणार नसेल तर त्याचं जे आपल्याजवळचं रुप आहे, ते तरी समजून घ्यायला हवं.

आणि अजून त्यासह करायची गोष्ट म्हणजे आपण जी टिप्पणी करतो, जो ॲक्टिव्हिजम करतो त्याला तीन गोष्टींची जोड हवी.

ज्ञान, मूल्य, आणि सातत्य.

 

आपण ट्विटरवर मत मांडतो, आपल्या बाजूच्या मताचे १० लोक, विरोधातल्या मताचे ११ लोक, त्या वादात जो जिंकला, तो जिंकला. हे केवळ ‘मतमोजणी’चं अंकगणित आहे. त्यापलिकडे जायचं तर आपण जे बोलतो, करतो त्याला या तीन गोष्टींची जोड हवीच.

१. ज्ञानाधार.

आपलं मत आहे, तसं इतरांचं मतही आहेच. मग चूक की बरोबर कसं ठरवणार? ते ठरवायचं तर आपल्या मताला ज्ञानाधार असावा. म्हणजे जे मी म्हणतो त्याला अभ्यासाचं बळ हवं . तरच आपल्या ॲक्टिव्हिजमला बळ येतं.

 

२. मूल्याधार.

आपण जे बोलतो, लिहितो ते केवळ शाब्दिक मत न राहता, ते मी माझ्या जगण्यात उतरवतो का, ते माझ्या जगण्यात स्वीकारतो का, हे महत्त्वाचं आहे. ते तसं नसेल तर लोक म्हणतात, ठीक आहे, ही फक्त बडबड आहे.

तसं होऊ नये.

३. सातत्य

आपल्या ॲक्टिव्हिजमची प्रेरणा काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तात्कालिक राग आला म्हणून केलं मत व्यक्त. संपलं तिथेच असं होऊ नये. आपण जे काम करतो, त्यात सातत्य महत्त्वाचं. नाहीतर केवळ स्टेटमेण्ट मारून अनेकजण मोकळे होतात. तसं होऊ नये. एका विषयातला तरी अभ्यास, त्यासाठी काम, वेगवेगळ्या लोकांसमोर आपला मुद्दा मांडणे, आपल्या विषयात जे नवीन काम होतं आहे ते समजून घेत अपडेट राहणं, हे महत्त्वाचं आहे.

ज्ञान, मूल्य, सातत्य यांसह आपण जी ‘भूमिका’ घेतो, त्याचा आणि आपण ज्यासाठी काम करतो त्याचा जैविक संबंध जोडता आला पाहिजे.

तरुणांच्या ॲक्टिव्हिजमसाठी ते महत्त्वाचं आहे.

(निर्माण, तरुणांसाठीची चळवळ)