शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

गिल्टी वाटतं? माझं चुकलंच!

By admin | Updated: July 10, 2014 18:11 IST

उशीर होणं तसं काही नवीन नसतंच. कुठंही-कधीही पोहचायला कायम उशीरच होतो. वेळ चुकली की आपण नेहमी कारणं देतो

- डॉ. संज्योत देशपांडे
उशीर होणं तसं काही नवीन नसतंच. कुठंही-कधीही पोहचायला कायम उशीरच होतो. वेळ चुकली की आपण नेहमी कारणं देतो. दोष देतो. ‘‘ही भेटीची वेळच ज्यानं कुणी ठरवली ती कशी चुकीची आहे, रस्त्यात ट्राफिक कसलं वाईट आहे.’’ अशी वाट्टेल ती कारणं सांगितली जातात, स्वत:लाही-इतरांनाही. 
पण आपण  वेळेवर निघालो नाही, म्हणून उशीर झाला ही साधी सोपी गोष्ट आपण का मान्य करत नाही? 
ती चूक मान्य केली, पश्चात्तापाची भावना योग्य प्रमाणात झाली तर निदान त्या गिल्टपोटी तरी पुढच्या वेळी चूक सुधारण्याची काही शक्यता निर्माण होते. पण आपण त्या भावनेलाच नाकारलं तर त्यातून मानसिक आरोग्याचे वेगळेच प्रश्न निर्माण होतात. 
याला म्हणतात अपराधीपणाची भावना. ती योग्य प्रमाणात स्वीकारली तर तिचा फायदाच होतो, पण अती अपराधी वाटू लागलं तरी खूप गंभीर प्रश्न निर्माण होतात. आपल्या चुकांसाठी सतत इतरांना दोष देत राहण्याची सवय लागली तरी प्रश्न बिकट होतात.
प्रत्येकच माणसाच्या मनात एक सदसद्विवेकबुद्धी असते. एक आतला आवाज असतो. तो आतला आवाज आपण कसं वागावं-कसं नाही याची दिशा देत राहतो. लहानपणापासूनच आपण अनुभवातून - संस्कारातून जगण्याचे-वागण्याचे लिखित अलिखित नियम, जगण्याची मूल्ये शिकत जात असतो. आपण चुकीचं वागतो तेव्हा आपलं मन, आपला तो आतला आवाज आपाल्याला सांगतंच असतो की, ‘तू चूक करतोय, चुकीचं वागतोय.’ 
एका अर्थी ही भावना मदतही करणारी असते. कारण ही भावना न नाकारता आपण ती अनुभवली तर त्यातून आपण खरंतर खूप काही शिकत जात असतो. स्वत:त सुधारणा करण्याची संधीच स्वत:ला देत असतो.
म्हणजे आपल्या बोलण्यानं, वक्तव्यानं जर कुणाला दुखावलं तर आपलं आपल्यालाच कळतं की, माझी बोलण्याची, वागण्याची पद्धत बदलायला हवी. आपलं वागणं चुकतंय याची ही खंतच आपल्याला स्वत:च्या ‘चुकीच्या’ वर्तनाची जाणीव करून देते. त्यातूनच आपण स्वत:कडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला शिकू शकतो.
दुसरं म्हणजे ही पश्चात्तापाची भावना आपल्या वर्तनाचा स्वत:वर व इतरांवर होणारा परिणामही आपल्याला जाणवून देते. आपण स्वत:ला एका त्रयस्थ नजरेतून तपासून पाहू शकतो. स्वत:मध्ये ख:या अर्थानं काही बदल घडवून आणू शकतो. ‘वाल्याचा वाल्मीकी’ झाल्याची गोष्ट तर आपण लहानपणापासून ऐकतोय.
हे असं वाचायला, समजून घ्यायला जरी सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात असं घडत नाही. अनेक जणांना आपल्या हातून चूक झाली म्हणजे आपल्यातच काहीतरी कमतरता आहे, असं वाटायला लागतं. पुन्हा आपल्या हातून तीच चूक घडेल असं वाटून ताण वाढतो, स्वत:विषयीच साशंकता निर्माण होते. काहींची आपल्यातली ती कमतरता पाहून ते मान्य करण्याची, बदल करण्याचीच तयारी नसते. त्यापेक्षा त्या चुकांवर पांघरूण घालण्याचा सोपा मार्ग त्यांना बरा वाटतो. त्यासाठी ही माणसं विविध मार्ग पत्करतात. सतत कारणं सांगत राहतात.
काही माणसं याच्या अगदी उलट. त्यांना लहानसहान चुकांमुळेही खूप अपराधी वाटतं. आपण काहीतरी गुन्हा केलाय, काही पाप केलंय असं ते स्वत:च्या चुकांकडे पाहतात. त्यातून नैराश्य येतं, सतत पश्चात्ताप वाटत राहिल्यानं स्वत:च्या नजरेत त्यांची किंमतही कमी व्हायला लागते. त्याचाही त्यांच्या वर्तनावर खूप नकारात्मक परिणाम होत राहतो. 
 काही जणांना ब:याचदा उगाचच - विनाकारण अपराधी वाटत रहातं. घडणा:या गोष्टींना आपणच जबाबदार आहोत असं वाटतं. इतरांचा मूड गेला त्याला मीच कारण आहे, असं त्यांना दिवसातून ब:याचदा काहीही कारणाशिवाय वाटत रहातं. यामुळे अशी माणसं सतत काहीशा ओङयाखाली, दडपणाखाली वावरत राहतात. त्याचा त्यांच्या वागण्यावर-बोलण्यावर-कामावर-नातेसंबंधावर परिणाम होतो. अशी माणसं मग स्वत:ला साध्या साध्या चुका करायचीही परवानगी देत नाहीत. 
आणि त्यातूनही त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं.
ते स्वत:चाच जीव खात बसतात आणि त्यातून गोष्टी सुधारत नाहीत तर बिघडतच जातात.