शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

आला मेसेज की ढकल पुढे, कर फॉरवर्ड असं करता तुम्ही? पण खबरदार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 16:16 IST

मार फॉरवर्ड- असं प्रत्येकच मेसेजबाबत करणं धोक्याचं आहे.

ठळक मुद्दे तुम्ही गोत्यातही येऊ शकता.

-आवेझ काझी

कोणताही मेसेज मित्र-मैत्रिणींनी पाठवला किंवा एखाद्या ग्रुपवर पडला की तुम्ही काय करता?अनेकदा तर वरवर वाचूनच लगेच  ग्रुपमध्ये ढकलता. फॉरवर्ड मारता.हे फॉरवर्ड मारणं इतकं वेगवान असतं की आपण जी माहिती पुढे पाठवतो आहे, ती खरी आहे की नाही, जी गोष्ट चार लोकांना सांगतोय ती खरंच तशी आहे का, याची खात्रीही करून घेणं अनेकांना गरजेचं वाटत नाही.स्पर्धा असल्यासारखे तेच ते मेसेज लोक इकडून तिकडे ढलकत राहातात.मात्र एखादा मेसेज त्याचा स्नेत, ख:याखोटय़ाची खात्री नसणं, गुगल किंवा इतर स्नेतांच्या माध्यमातून पडताळणी न करणं आणि आला मेसेज केला फॉरवर्ड म्हणून अनेकांना पाठवणं हे महागात पडू शकतं. तुमच्या अंगलट येऊ शकतं. तुमच्यासह तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप, मेसेंजर ग्रुपमधील इतर सदस्यांना त्रस होऊ शकतो. ग्रुपची विश्वासार्हता धोक्यात येऊन परिणामी एखादा गुन्हादेखील दाखल होऊ शकतो. कायदेशीर प्रकियेला सामोरे जाऊ लागू शकतं.हे सारं टाळण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी विशेषत: सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील विषयांवरचे मेसेज खातरजमा न करता अजिबात पुढे पाठवू नका. तुम्ही पाठवलेल्या फेक मेसेजविरोधात कोणी फिर्याद दाखल केली आणि तो मेसेज फेक आहे असं सिद्ध झालं तर माहिती तंत्रज्ञान कायदा किंवा भारतीय दंड संहितेतील विविध कलमान्वये तुम्ही शिक्षेसाठी पात्र ठरू शकता. म्हणूनच कोणत्याही ग्रुपवरचा मेसेज, त्यातील मजकुराची खातरजमा, त्यात दिलेले मोबाइल नंबर, मॉर्फ केलेले फोटो हे सगळं बारकाईने पाहा. गरज नसेल तर ते फॉरवर्ड करणं टाळायला हवं. सगळ्यांना कुठून ना कुठून माहिती येते.आपण नाही फॉरवर्ड केलं तर काही फार बिघडत नाही.विशेषत: हल्ली कोविड महामारीच्या काळात गरजूंना मदत करा म्हणून फॉरवर्ड केलेल्या मॅसेजेसमध्ये, व्हिडिओमध्ये किंवा ऑडिओ क्लिप्समध्ये काही संपर्कक्रमांकही देण्यात येतात. हे नंबर जनतेची आर्थिक फसवणूक करण्याकरिता वापरले जात आहेत. असे मेसेज फॉरवर्ड करताना किंवा त्यावर रिअॅक्ट करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे.सोशल मीडिया अॅप्स, सोशल नेटवर्किगची काळी बाजू म्हणजे खोटय़ा बनावट माहितीचा, असंबद्ध माहिती, फेक न्यूज, बदनामीकारक मजकूर, धार्मिक भावना दुखावणारे  व्हिडिओ, ऑडियो, मेसेजेस हे प्रचंड प्रमाणात आहेत.त्यामुळे फॉरवर्ड करण्याची स्पर्धा न लावता सोशल मीडियावीरांनी थोडी काळजी घ्यायला हवी.

प्रत्येक मेसेज फॉरवर्ड करताना विवेक, विचारबुद्धीने  निर्णय घेणं अत्यावश्यक आहे. कुणाच्या धार्मिक भावना दुखावणं, कोणा एखाद्या व्यक्ती,धर्म, महापुरु ष, प्रथा, भाषा किंवा समूहाबद्दल खोटी माहिती पसरवणं, तसे मेसेज फॉरवर्ड करणं गुन्हा आहे हे लक्षात ठेवा.** लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट्स केल्याप्रकरणी 530 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून,  274 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती  महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

( लेखक पोलीस उपनिरीक्षकअसून, सायबर गुन्हा अभ्यासक आहेत.)