शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

वेगळं. आणि विचित्रच!

By admin | Updated: November 13, 2014 20:52 IST

नेट लावून काहीतरी लिहायचं म्हणजे पेशन्स लागतो. तो कुठून-कसा आणला ? नेटाने लिहावं लागतं हे खरंच.

नाव : प्रणव जोशी 
पुस्तकाचं नाव - टेक इट इझी !
कधी प्रसिद्ध झालं? - एप्रिल 2क्14
पुस्तकात काय आहे ? - बारावीत शिकणा:या तीन मित्रंची आणि त्यांच्या आयुष्यात घडणा:या घडामोडींची ही गोष्ट. 
पुस्तक आवडलं असं सांगणारी कॉमेण्ट  - खरं तर ज्यांना हे पुस्तक आवडलं त्यांनी एकाच वाक्यात अजून तरी कौतुक केलेलं नाही. खूपच छान, मस्तच, एकच नंबर. हेच शब्द अनेक पद्धतीने विविध हावभावांत अनेक लोकांकडून ऐकलेत.
पुस्तक भिकार आहे, यातले संदर्भ अजिबात आवडले नाहीत असं सांगणारी कॉमेण्ट-  माझं मन दुखू नये म्हणून असेल कदाचित पण, ‘चांगला प्रयत्न होता’  हेच ऐकवण्यात आलं, जमेल तितक्या कटुतेने !
 
 
आपणच एक पुस्तक लिहावं असा किडा कधी, कसा आणि का डोक्यात आला?
हा किडा मी इंदूरमध्ये बी.कॉम करत असताना डोक्यात आला होता. तेव्हा मी काही काळ सातत्यानं डायरी लिहित होतो, पण टायफॉईड आणि कावीळ असे दोन्ही आजार एकत्र झाल्यानं सक्तीची विश्रंती घेत होतो. वेळच वेळ होता. मग डोक्यात किडा मारो आंदोलन सुरू झालं. लिहायला लागलो. आपण लिहितोय, हे तसं अजून ङोपलं नाहीये, पण लिहिलं हे खरं !  
हल्लीची मुलं कुठे वाचतात? 
आपलं पुस्तक कोण वाचणार असा संशय-प्रश्न-शंका मनात आली नाही का?
- हो ! आला होताना हा प्रश्न! नक्कीच! पण लिहिताना नाही,  लिहिताना आनंद मिळत होता म्हणून मी लिहीत होतो आणि जसं सुचलं तसं लिहीत गेलो. त्यामुळे कोण वाचणार ह्या प्रश्नाने मला फार फरक पडला नाही. आणि अजूनही लोक वाचतात हीच श्रद्धा मी मनात अजूनही बाळगून आहे. तसा रिस्पॉन्सपण मला येतो आहे. 
नेट लावून काहीतरी लिहायचं म्हणजे पेशन्स लागतो. तो कुठून-कसा आणला ?
नेटाने लिहावं लागतं हे खरंच. मी तर आधी डायरीच्या मागच्या पानावर कथा लिहायला सुरुवात केली होती. कथा रचताना, लिहिताना मीच त्यात बुडून जायचो, आनंद मिळायचा. त्यामुळे कंटाळा आला नाही आणि त्यामुळेच  माङो पेशन्स काही पारखले गेले नाहीत. लिहिणं स्वेच्छेने होतं आणि सुचायला काही काळ -वेळ नव्हता. लिहिण्याची फक्तजिद्द होती.
या प्रोसेसने तुला काय शिकवलं?
ह्या प्रोसेसने शिकवला पेशन्स ! लिहिताना लागत नसले तरी माङयासारख्या मुलाला नंतर त्याची गरज पडते, तो माझं स्वभाव दोष आहे. बराच धीर धरता आला. आणि मुख्य म्हणजे दिला थोडा नम्रपणा. 
आपल्या पिढीचं खरं म्हणणं, जगणं काय आहे ते कोणीच लिहीत नाही असं वाटतं का?
- माफ करा, पण माझं मत थोडं वेगळं आहे ! आमची पिढीच थोडी विचित्र परिस्थितीत वाढली असल्याने त्यांनाच स्वत:ला काय हवंय हे माहिती नाही. त्यामुळे बाकीचे तरी आमच्याबद्दल काय आणि कसं लिहितील? आम्ही स्वत:शीच संवाद नाही करू शकत नाही अजून, उगाच लोकांसमोर आपली जी इमेज आहे ती पोसल्यासारखं आमचं वागणं असतं.