शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान करके देखो, अच्छा लगता है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 15:16 IST

लॉकडाऊन, संचारबंदी यामुळे घराबाहेर पडता येत नव्हतं, शिबिरांना परवानगी नाही त्यामुळे रक्तदान झालं नाही. आता रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. मुख्यमंत्र्यांनीही आवाहन केलं की, रक्तदान करा. कोरोनाच्या संकटकाळात तरुण मुलांनी जबाबदारीने करावी अशी ही गोष्ट आहे.

ठळक मुद्देआपल्यामुळे एखाद्याला जीवनदान मिळत असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही.

- राहुल गायकवाड

कधी कोणी असा विचारसुद्धा केला नसेल की कोरोनासारखा एक छोटासा विषाणू संपूर्ण जगाला वेठीस धरेल. गेल्या तीन महिन्यांपासून भारत या विषाणूचा सामना करतोय. पुढील अनेक काळ आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे, असं जगभरातील तज्ज्ञ सांगताहेत. कोरोनाचा फटका सर्वच विभागांना बसला, तसा तो वैद्यकीय क्षेत्नालादेखील बसला. कोरोनाबाधित रुग्णांच्या सातत्याने वाढत जाणा:या संख्येमुळे वैद्यकीय व्यवस्थेवर ताण आला. त्यातच हाल झाले ते इतर आजारांनी ग्रस्त असणा:या रुग्णांचे. संपूर्ण वैद्यकीय यंत्नणा सध्या कोरोनाला हरविण्यासाठी काम करत असल्याने इतर व्याधींनी ग्रस्त रुग्णांचे हाल होत आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे कोणालाच घराबाहेर पडता न आल्याने रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे.त्यामुळे आता रुग्णांवर उपचार करण्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली आहे.एरव्ही पूर असो की कुठलीही नैसर्गिक आपत्ती तरुण मुलं जिवावर उदार होऊन काम करतात. गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरात अनेक तरुणांनी केलेलं मदतकार्य आपण पा¨हलं आहेच.मात्र ही कोरोनाची आपत्ती अशी वेगळीच की या काळात कुठं कशी मदत पोहोचवणार, घराबाहेर पडता येत नाही, शारीरिक अंतराचे नियम आहेतच, त्यातही अनेक तरुणांनी गरजूंना अन्नाची पाकिटं देणं अशी कामं केली.मात्र आता अजून एक महत्त्वाचं काम आहे जे तरुण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात, ते म्हणजे रक्तदान.कोरोनाच्या काळात अतिमहत्त्वाच्या शस्रक्रियांच्या व्यतिरिक्त इतर शस्रक्रि या बंद ठेवल्याने रक्ताची मागणी इतर वेळच्या तुलनेत कमी होती. मात्र असं असलं तरी ज्या रुग्णांना डायलिसिस करावं लागतं तसंच ज्या कोरोनाबाधित रुग्णांना रक्ताची गरज होती अशा रु ग्णांना रक्त उपलब्ध होणं अवघड जात आहे. लॉकडाऊनपूर्वी विविध संस्था, महाविद्यालये यांच्यामार्फत रक्तदान शिबिरे आयोजित केली जात होती. परंतु लॉकडाऊनच्या काळात अशी शिबिरे आयोजित करता आली नाहीत. त्यातच एकदा घेतलेले रक्त योग्य वेळेत वापरले नाही तर ते खराब होते, त्यामुळे रक्तदानाची प्रोसेस सातत्यानं सुरू असणंही आवश्यक असतं.पुण्यासारख्या शहरात दिवसाला आठशे ते हजार पिशव्या रक्त लागते. लॉकडाऊनच्या काळात मात्न हा पुरवठा होऊ शकला नाही.  अलीकडेच मुख्यमंत्नी उद्धव ठाकरे यांनी रक्तदानासाठी पुढं येण्याचं आवाहन केलं. परंतु फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असल्यानं तसंच घराबाहेर कोरोनाची भीती असल्याने अनेक तरुण समोर आले नाहीत. त्यातच जाहीर कार्यक्रम घेण्यास बंदी असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करणंही सामाजिक संस्थांना, रक्तपेढय़ांना शक्य झाले नाही. रक्तदान करायला येणा:या व्यक्तीला कोरोना आहे की नाही हे तपासणंही शक्य नसल्याने अनेकांनी ही रिस्क घेतली नाही. लॉकडाऊन काळात संचारबंदी असल्याने अनेक रक्तदात्यांना इच्छा असतानादेखील रक्तदान करण्यासाठी जाता आलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. लॉकडाऊन संपलं तरी कोरोनाची भीती राहाणार आहेच. त्यामुळे पुढेसुद्धा किती तरुण रक्तदान करण्यासाठी पुढे येतील, हा प्रश्न आहेच. मात्र आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार करून रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. कोरोनाला न घाबरता, रक्तदान करके देखो अच्छा लगता है !

‘रक्ताचे नाते’ या रक्तसंकलनासाठी काम करणा:या संस्थेचे प्रमुख राम बांगड सांगतात, लॉकडाऊनमुळे रक्तदाते रक्तदान करू शकले नाहीत. त्यामुळे या काळात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवला. आता लॉकडाऊन शिथिल होत असल्याने इतर व्याधींचे रु ग्णदेखील रु ग्णालयात दाखल होत आहेत. त्यातील अनेकांना रक्ताची गरज आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अजूनसुद्धा अनेक लोक हे रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत. आम्ही या काळात अनेक शिबिरे घेतली. रक्तदान करताना संपूर्ण खबरदारी घेतली जात असल्याने जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.’कोरोनाला घाबरून रक्तदान टाळू नये, असा त्यांचा सल्ला आहे.  

******या संकटकाळात रक्तदान करून आपण आपली सामाजिक जबाबदारीही पार पाडू शकतोच. असाच विचार काही तरुणही करतात. अनेकांनी लॉकडाऊनच्या काळात ई-पास काढूनही रक्तदान केलं. काहींनी आपल्याला बाकी काहीच करता येत नाही तर निदान रक्तदान तरी करूम्हणत आपला खारीचा वाटा उचलला.संध्या सोनवणो ही तरु णी सांगते, ‘कोरोनामुळे रक्तदान पुरेशा प्रमाणात झालेलं नाही. त्यातच रक्ताची सातत्यानं गरज असल्याने सध्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे आपल्या परीने आपण काही प्रयत्न करायला हवेत या हेतूने मी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. आपल्यामुळे एखाद्याला जीवनदान मिळत असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही.

(राहुल लोकमत डॉट कॉममध्ये वार्ताहर आहे.)