शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बॅक ऑन ट्रॅक

By admin | Updated: October 9, 2014 18:47 IST

सेटलबिटल झालो, लग्नबिग्नं झाली, मग पुढे? त्याचंही उत्तर सापडलं आणि आम्ही मित्र कॉलेजातल्याच उत्साहानं नव्यानं कामाला भिडलोय.

‘संवेदना ’ ग्रुप स्थापन करुन जेव्हा मित्र कामाला लागले.
 
 
 
कॉलेज संपलं. जो तो आपापल्या आयुष्यात बर्‍यापैकी सेटल झाला. नोकरीबिकरी, लग्नबिग्नं झाली. सगळे मित्र आता फक्त बारसे, वाढदिवसांना भेटू लागले. एनएसएसमध्ये शिकलेली सामाजिक कामांची जाणीव कॉलेजातच राहून गेली. कुठंतरी.  
आमचा मित्र समीरच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रंगलेल्या मैफलीनं मात्र अचानक टर्न घेतला आणि आम्ही थेट कॉलेज कट्टय़ावर पोहोचलो. एनएसएसच्या माध्यमातून मिळविलेला सामाजिक बांधिलकीचा ‘टच’ रिन्यू झाला. प्रत्येकाला  वाटू लागलं, कॉलेज काळात खूप उपक्रम यशस्वी केलेत. तेव्हा खिशात पैसा नव्हता, अनुभव नव्हता, कुणी मदत करण्यास तयार नव्हतं, पण केवळ इच्छेच्या बळावर बरेच उद्योग केले. कॉलेज सुटल्यापासून ते मागे पडलं.  मात्र बोलता बोलता आम्ही जुन्या ट्रॅकवर आलो हे महत्त्वाचं. संवेदना क्रिएटिव्ह क्लब असं आमच्या ग्रुपचं नामकरण झालं.
सुरूवातीला मनपाच्या ‘ग्रीन अकोला; क्लिन अकोला’ या हाकेला प्रतिसाद देत शहरातल्या मुबलक पाणी असलेल्या भागात वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले. दोन वर्षात वाढलेली झाडं आवश्यक सुरक्षा कवच देऊन परिसरातील नागरिकांना दत्तक दिली. ठरावीक कालावधीच्या अंतराने २५-२५ झाडं लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी शेजार्‍यांवर सोपवत, स्वत:ही झाडं जगवण्याच्या योजना करत कामाला लागलो. 
आता आम्ही एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेलं ‘जनुना’ हे गाव दत्तक घेतलं. या गावात मूलभूत सेवा पुरविण्याची योजना आखल. सध्या २५0हून अधिक सक्रिय स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी आहेत.
गावाचा परिचय व्हावा, गावकर्‍यांशी ओळख व्हावी म्हणून संवेदनानं कपडे वाटपाचा पहिला कार्यक्रम ठेवला. या उपक्रमात आपल्याकडील व आपल्या मित्रांकडे वापरात नसलेले कपडे एकत्र केले. ते स्वच्छ धुवून, इस्त्री करून घेतले आणि जनुन्यात त्याचे वाटप केले. कपडे देताना सांगितलं की, आम्ही काही फार श्रीमंत नाही, जे जमेल ते देतोय. आणि देतोय म्हणजे उपकार नाही, फक्त आमच्या भावना समजून घ्या, आम्ही फक्त मदत करतोय. 
अशा कामांचा फार उपयोग नाही हे आम्हालाही पटलं; पण निदान ओळख तरी झाली गावकर्‍यांशी. पण पुढच्या आठच दिवसात कानावर बातमी आली आमच्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती झाल्याची. कपडे वाटपाची बातमी जेव्हा वृत्तपत्रामधून छापून आली तेव्हा हिवरखेड नावाच्या गावच्या शाळेनं एक उपक्रम राबविला. शिक्षकांनी पेपरात छापून आलेली बातमी विद्यार्थ्यांना दाखवून विचारलं, आपण असं काय करू शकतो? तर विद्यार्थ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या अतिरिक्त शालेय वस्तू देण्याची तयारी दर्शविली. या उपक्रमात विद्यार्थी इतके सरसावले की, पेनाच्या दोन पैकी एकेक रिफिलीसुद्धा त्यांनी डोनेट बॉक्समध्ये टाकल्या. अर्धवट लिहून सोडलेल्या नोटबुक, स्केल, पेन्सिली, पाठय़पुस्तके, जुनी दफ्तरं अशा वस्तूंनी अनेक गरजू विद्यार्थ्यांची  ‘निकड’  भागविली.
दिवाळीत आता आम्ही एक तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन केलं आहे. शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांची पहिली गरज म्हणून आरोग्य तपासणी,  औषधोपचार शिबिर तसेच आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन असे काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 
नोकरी-व्यवसायातून आलेल्या शहाणपणाचा उपयोग करून आम्ही कॉलेजच्या काळातल्याच उत्साहानं कामाला लागलोय. अजून काय पाहिजे?
 
- नंदकिशोर चिपडे आपातापा, ता. जि. अकोला.