शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

बॅक ऑन ट्रॅक

By admin | Updated: October 9, 2014 18:47 IST

सेटलबिटल झालो, लग्नबिग्नं झाली, मग पुढे? त्याचंही उत्तर सापडलं आणि आम्ही मित्र कॉलेजातल्याच उत्साहानं नव्यानं कामाला भिडलोय.

‘संवेदना ’ ग्रुप स्थापन करुन जेव्हा मित्र कामाला लागले.
 
 
 
कॉलेज संपलं. जो तो आपापल्या आयुष्यात बर्‍यापैकी सेटल झाला. नोकरीबिकरी, लग्नबिग्नं झाली. सगळे मित्र आता फक्त बारसे, वाढदिवसांना भेटू लागले. एनएसएसमध्ये शिकलेली सामाजिक कामांची जाणीव कॉलेजातच राहून गेली. कुठंतरी.  
आमचा मित्र समीरच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रंगलेल्या मैफलीनं मात्र अचानक टर्न घेतला आणि आम्ही थेट कॉलेज कट्टय़ावर पोहोचलो. एनएसएसच्या माध्यमातून मिळविलेला सामाजिक बांधिलकीचा ‘टच’ रिन्यू झाला. प्रत्येकाला  वाटू लागलं, कॉलेज काळात खूप उपक्रम यशस्वी केलेत. तेव्हा खिशात पैसा नव्हता, अनुभव नव्हता, कुणी मदत करण्यास तयार नव्हतं, पण केवळ इच्छेच्या बळावर बरेच उद्योग केले. कॉलेज सुटल्यापासून ते मागे पडलं.  मात्र बोलता बोलता आम्ही जुन्या ट्रॅकवर आलो हे महत्त्वाचं. संवेदना क्रिएटिव्ह क्लब असं आमच्या ग्रुपचं नामकरण झालं.
सुरूवातीला मनपाच्या ‘ग्रीन अकोला; क्लिन अकोला’ या हाकेला प्रतिसाद देत शहरातल्या मुबलक पाणी असलेल्या भागात वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले. दोन वर्षात वाढलेली झाडं आवश्यक सुरक्षा कवच देऊन परिसरातील नागरिकांना दत्तक दिली. ठरावीक कालावधीच्या अंतराने २५-२५ झाडं लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी शेजार्‍यांवर सोपवत, स्वत:ही झाडं जगवण्याच्या योजना करत कामाला लागलो. 
आता आम्ही एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेलं ‘जनुना’ हे गाव दत्तक घेतलं. या गावात मूलभूत सेवा पुरविण्याची योजना आखल. सध्या २५0हून अधिक सक्रिय स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी आहेत.
गावाचा परिचय व्हावा, गावकर्‍यांशी ओळख व्हावी म्हणून संवेदनानं कपडे वाटपाचा पहिला कार्यक्रम ठेवला. या उपक्रमात आपल्याकडील व आपल्या मित्रांकडे वापरात नसलेले कपडे एकत्र केले. ते स्वच्छ धुवून, इस्त्री करून घेतले आणि जनुन्यात त्याचे वाटप केले. कपडे देताना सांगितलं की, आम्ही काही फार श्रीमंत नाही, जे जमेल ते देतोय. आणि देतोय म्हणजे उपकार नाही, फक्त आमच्या भावना समजून घ्या, आम्ही फक्त मदत करतोय. 
अशा कामांचा फार उपयोग नाही हे आम्हालाही पटलं; पण निदान ओळख तरी झाली गावकर्‍यांशी. पण पुढच्या आठच दिवसात कानावर बातमी आली आमच्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती झाल्याची. कपडे वाटपाची बातमी जेव्हा वृत्तपत्रामधून छापून आली तेव्हा हिवरखेड नावाच्या गावच्या शाळेनं एक उपक्रम राबविला. शिक्षकांनी पेपरात छापून आलेली बातमी विद्यार्थ्यांना दाखवून विचारलं, आपण असं काय करू शकतो? तर विद्यार्थ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या अतिरिक्त शालेय वस्तू देण्याची तयारी दर्शविली. या उपक्रमात विद्यार्थी इतके सरसावले की, पेनाच्या दोन पैकी एकेक रिफिलीसुद्धा त्यांनी डोनेट बॉक्समध्ये टाकल्या. अर्धवट लिहून सोडलेल्या नोटबुक, स्केल, पेन्सिली, पाठय़पुस्तके, जुनी दफ्तरं अशा वस्तूंनी अनेक गरजू विद्यार्थ्यांची  ‘निकड’  भागविली.
दिवाळीत आता आम्ही एक तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन केलं आहे. शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांची पहिली गरज म्हणून आरोग्य तपासणी,  औषधोपचार शिबिर तसेच आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन असे काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 
नोकरी-व्यवसायातून आलेल्या शहाणपणाचा उपयोग करून आम्ही कॉलेजच्या काळातल्याच उत्साहानं कामाला लागलोय. अजून काय पाहिजे?
 
- नंदकिशोर चिपडे आपातापा, ता. जि. अकोला.