शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

तुमचं मत स्वतंत्र झालंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 06:50 IST

आज 15 ऑगस्ट, लोकशाहीचा सुजाण मतदार होण्याचं स्वातंत्र्य टिकवायचं की व्हायचं गुलाम, तुम्हीच ठरवा!

ठळक मुद्देमत देताना तुम्ही काम पाहता की जात पाहता? उमेदवारानं दिलेल्या माहितीचा अभ्यास करुन मत देता की देता ठोकून जातीचा माणूस म्हणून?

 - मिलिंद थत्ते

राजकीय सत्ता मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला पहिला व सगळ्यात रुढ मार्ग आहे - मतदारांना येडय़ात काढायचा! मतदाराच्या पोटात अन्नाचा दाणा नसला तरी चालेल, पण त्याच्या भावनांना भुलवायचे. त्याच्या डोईवर पागोटी बांधायची नि लंगोटी काढून घ्यायची. अन् तेही येडं पागोटी कुरवाळत बसतंय! पायाखालची जमीन जाते, रोजीरोटीला उपयोगाचं शिक्षण नसतं, शेतीला पाणी नसतं, पिकाला बाजारभाव नसतो, पण आपल्या जातीतल्या माणसाला निवडून द्यायला आपण त्याचे सगळे गुन्हे विसरतो! हेच ते - लंगोटी गेली तरी पागोटी कुरवाळणं.  आपण ज्याला निवडून देतो किंवा आपला पुढारी मानतो, तो आपल्या जीविकेसाठी किंवा पोटापाण्याच्या प्रश्नासाठी काय करतो याकडे लक्ष न देता त्याच्या जातीकडे पहायला आपल्याला शिकवले जाते. एका दुष्काळी तालुक्यातले एक आमदार होते. त्यांनी मोठय़ा प्रमाणात पाणी वाचविण्याची कामे करून घेतली. त्यांच्या तालुक्याच्या नावाने जलसंधारणाचा पॅटर्न प्रसिद्ध झाला. दुष्काळ मिटला, पण पुढच्या निवडणुकीत जातीचे वाद झाले आणि ते निवडणुकीत हरले. मतदारांनी माणूस न पाहता जातीला मत दिले. असेच धर्माच्याही बाबतीत आहे.सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार - यांची कामं काय असतात? त्यांचे काम त्यांनी केलं का? हे आपण बघतच नाही. त्यांनी काम केलं म्हणून त्यांना पुन्हा निवडून द्या किंवा त्यांनी काम केलं नाही म्हणून त्यांना पाडा - असं मतदार म्हणून आपण म्हणतच नाही. त्या त्या वेळी जी भूल पडेल त्यात बटण दाबायचे! कुठला झेंडा, कुठला टिळा लावला की आपण मतदार फसतो हे  राजकारण्यांना चांगलं माहीत असतं. मग लग्ना-मयतात जायचं, सर्व प्रकारच्या देवळात निवद दावायचा, विविध जातीतल्या संतांच्या जयंत्या-मयंत्या करायच्या - अशी सोंगं करून मतदार भुलवायचा. वर्षानुवर्ष पिढय़ान्पिढय़ा हे असंच चाललं आहे. आपण नवीन पिढीचे मतदारही असेच बावळट आहोत का? की आपल्याला यांच्या कामाचा हिशेब करता येतो? असोसिएशन फॉर डेमोक्र ॅटिक रिफॉर्म्स नावाची एक संस्था आहे. ते दर निवडणुकीच्या वेळी सर्व उमेदवारांची आर्थिक प्रगती, गुन्हेगारी प्रगती प्रसिद्ध करतात. त्यांच्या वेबसाइटवर ही सर्व माहिती वाचता येते. हीच सर्व माहिती आपल्याला थेट निवडणूक आयोगाकडूनसुद्धा मिळू शकते. सर्व उमेदवारांना एक प्रतिज्ञापत्न आयोगाकडे सादर करायचं असतं. त्यात त्यांची व कुटुंबाची संपत्ती जाहीर केलेली असते. मागील पाच वर्षात त्यात किती फरक पडला तेही आपल्याला कळू शकतं. त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, सिद्ध झालेत तेही कळतं. ही सारी माहिती खुली असते. सरकार सुधारायचे तर चांगली कामं करणारी माणसं आपण निवडून दिली पाहिजेत. जातीचं भूत कितीही वाढवलं ंतरी लोक फसत नाहीत - ही अक्कल आपण मतदारांनी पुढार्‍यांना शिकविली पाहिजे.गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमधली एक चांगली गोष्ट अशी की कोणत्याही जातीय किंवा धार्मिक वादाचा मुद्दा या निवडणुकांमधला मुख्य मुद्दा नव्हता. काही लोकांनी असे जातीय मुद्दे आणायचा प्रयत्न करून पाहिला, तरीही ते मुद्दे कोपर्‍यात पडले. जातीय ध्रुवीकरणाशिवायही जिंकता येतं हे या निवडणुकांनी दाखवून दिलं. आपल्यासारख्या नव्या दमाच्या मतदारांसाठी ही फार चांगली संधी आहे. इथून मागं फिरायचं नाही, फिरू द्यायचं नाही. नया इंडिया अपनेको जैसा चाहिए, वैसाच बनानेका!