शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

तुमचं मत स्वतंत्र झालंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 06:50 IST

आज 15 ऑगस्ट, लोकशाहीचा सुजाण मतदार होण्याचं स्वातंत्र्य टिकवायचं की व्हायचं गुलाम, तुम्हीच ठरवा!

ठळक मुद्देमत देताना तुम्ही काम पाहता की जात पाहता? उमेदवारानं दिलेल्या माहितीचा अभ्यास करुन मत देता की देता ठोकून जातीचा माणूस म्हणून?

 - मिलिंद थत्ते

राजकीय सत्ता मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला पहिला व सगळ्यात रुढ मार्ग आहे - मतदारांना येडय़ात काढायचा! मतदाराच्या पोटात अन्नाचा दाणा नसला तरी चालेल, पण त्याच्या भावनांना भुलवायचे. त्याच्या डोईवर पागोटी बांधायची नि लंगोटी काढून घ्यायची. अन् तेही येडं पागोटी कुरवाळत बसतंय! पायाखालची जमीन जाते, रोजीरोटीला उपयोगाचं शिक्षण नसतं, शेतीला पाणी नसतं, पिकाला बाजारभाव नसतो, पण आपल्या जातीतल्या माणसाला निवडून द्यायला आपण त्याचे सगळे गुन्हे विसरतो! हेच ते - लंगोटी गेली तरी पागोटी कुरवाळणं.  आपण ज्याला निवडून देतो किंवा आपला पुढारी मानतो, तो आपल्या जीविकेसाठी किंवा पोटापाण्याच्या प्रश्नासाठी काय करतो याकडे लक्ष न देता त्याच्या जातीकडे पहायला आपल्याला शिकवले जाते. एका दुष्काळी तालुक्यातले एक आमदार होते. त्यांनी मोठय़ा प्रमाणात पाणी वाचविण्याची कामे करून घेतली. त्यांच्या तालुक्याच्या नावाने जलसंधारणाचा पॅटर्न प्रसिद्ध झाला. दुष्काळ मिटला, पण पुढच्या निवडणुकीत जातीचे वाद झाले आणि ते निवडणुकीत हरले. मतदारांनी माणूस न पाहता जातीला मत दिले. असेच धर्माच्याही बाबतीत आहे.सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार - यांची कामं काय असतात? त्यांचे काम त्यांनी केलं का? हे आपण बघतच नाही. त्यांनी काम केलं म्हणून त्यांना पुन्हा निवडून द्या किंवा त्यांनी काम केलं नाही म्हणून त्यांना पाडा - असं मतदार म्हणून आपण म्हणतच नाही. त्या त्या वेळी जी भूल पडेल त्यात बटण दाबायचे! कुठला झेंडा, कुठला टिळा लावला की आपण मतदार फसतो हे  राजकारण्यांना चांगलं माहीत असतं. मग लग्ना-मयतात जायचं, सर्व प्रकारच्या देवळात निवद दावायचा, विविध जातीतल्या संतांच्या जयंत्या-मयंत्या करायच्या - अशी सोंगं करून मतदार भुलवायचा. वर्षानुवर्ष पिढय़ान्पिढय़ा हे असंच चाललं आहे. आपण नवीन पिढीचे मतदारही असेच बावळट आहोत का? की आपल्याला यांच्या कामाचा हिशेब करता येतो? असोसिएशन फॉर डेमोक्र ॅटिक रिफॉर्म्स नावाची एक संस्था आहे. ते दर निवडणुकीच्या वेळी सर्व उमेदवारांची आर्थिक प्रगती, गुन्हेगारी प्रगती प्रसिद्ध करतात. त्यांच्या वेबसाइटवर ही सर्व माहिती वाचता येते. हीच सर्व माहिती आपल्याला थेट निवडणूक आयोगाकडूनसुद्धा मिळू शकते. सर्व उमेदवारांना एक प्रतिज्ञापत्न आयोगाकडे सादर करायचं असतं. त्यात त्यांची व कुटुंबाची संपत्ती जाहीर केलेली असते. मागील पाच वर्षात त्यात किती फरक पडला तेही आपल्याला कळू शकतं. त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, सिद्ध झालेत तेही कळतं. ही सारी माहिती खुली असते. सरकार सुधारायचे तर चांगली कामं करणारी माणसं आपण निवडून दिली पाहिजेत. जातीचं भूत कितीही वाढवलं ंतरी लोक फसत नाहीत - ही अक्कल आपण मतदारांनी पुढार्‍यांना शिकविली पाहिजे.गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमधली एक चांगली गोष्ट अशी की कोणत्याही जातीय किंवा धार्मिक वादाचा मुद्दा या निवडणुकांमधला मुख्य मुद्दा नव्हता. काही लोकांनी असे जातीय मुद्दे आणायचा प्रयत्न करून पाहिला, तरीही ते मुद्दे कोपर्‍यात पडले. जातीय ध्रुवीकरणाशिवायही जिंकता येतं हे या निवडणुकांनी दाखवून दिलं. आपल्यासारख्या नव्या दमाच्या मतदारांसाठी ही फार चांगली संधी आहे. इथून मागं फिरायचं नाही, फिरू द्यायचं नाही. नया इंडिया अपनेको जैसा चाहिए, वैसाच बनानेका!