शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

तुमचं मत स्वतंत्र झालंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 06:50 IST

आज 15 ऑगस्ट, लोकशाहीचा सुजाण मतदार होण्याचं स्वातंत्र्य टिकवायचं की व्हायचं गुलाम, तुम्हीच ठरवा!

ठळक मुद्देमत देताना तुम्ही काम पाहता की जात पाहता? उमेदवारानं दिलेल्या माहितीचा अभ्यास करुन मत देता की देता ठोकून जातीचा माणूस म्हणून?

 - मिलिंद थत्ते

राजकीय सत्ता मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला पहिला व सगळ्यात रुढ मार्ग आहे - मतदारांना येडय़ात काढायचा! मतदाराच्या पोटात अन्नाचा दाणा नसला तरी चालेल, पण त्याच्या भावनांना भुलवायचे. त्याच्या डोईवर पागोटी बांधायची नि लंगोटी काढून घ्यायची. अन् तेही येडं पागोटी कुरवाळत बसतंय! पायाखालची जमीन जाते, रोजीरोटीला उपयोगाचं शिक्षण नसतं, शेतीला पाणी नसतं, पिकाला बाजारभाव नसतो, पण आपल्या जातीतल्या माणसाला निवडून द्यायला आपण त्याचे सगळे गुन्हे विसरतो! हेच ते - लंगोटी गेली तरी पागोटी कुरवाळणं.  आपण ज्याला निवडून देतो किंवा आपला पुढारी मानतो, तो आपल्या जीविकेसाठी किंवा पोटापाण्याच्या प्रश्नासाठी काय करतो याकडे लक्ष न देता त्याच्या जातीकडे पहायला आपल्याला शिकवले जाते. एका दुष्काळी तालुक्यातले एक आमदार होते. त्यांनी मोठय़ा प्रमाणात पाणी वाचविण्याची कामे करून घेतली. त्यांच्या तालुक्याच्या नावाने जलसंधारणाचा पॅटर्न प्रसिद्ध झाला. दुष्काळ मिटला, पण पुढच्या निवडणुकीत जातीचे वाद झाले आणि ते निवडणुकीत हरले. मतदारांनी माणूस न पाहता जातीला मत दिले. असेच धर्माच्याही बाबतीत आहे.सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार - यांची कामं काय असतात? त्यांचे काम त्यांनी केलं का? हे आपण बघतच नाही. त्यांनी काम केलं म्हणून त्यांना पुन्हा निवडून द्या किंवा त्यांनी काम केलं नाही म्हणून त्यांना पाडा - असं मतदार म्हणून आपण म्हणतच नाही. त्या त्या वेळी जी भूल पडेल त्यात बटण दाबायचे! कुठला झेंडा, कुठला टिळा लावला की आपण मतदार फसतो हे  राजकारण्यांना चांगलं माहीत असतं. मग लग्ना-मयतात जायचं, सर्व प्रकारच्या देवळात निवद दावायचा, विविध जातीतल्या संतांच्या जयंत्या-मयंत्या करायच्या - अशी सोंगं करून मतदार भुलवायचा. वर्षानुवर्ष पिढय़ान्पिढय़ा हे असंच चाललं आहे. आपण नवीन पिढीचे मतदारही असेच बावळट आहोत का? की आपल्याला यांच्या कामाचा हिशेब करता येतो? असोसिएशन फॉर डेमोक्र ॅटिक रिफॉर्म्स नावाची एक संस्था आहे. ते दर निवडणुकीच्या वेळी सर्व उमेदवारांची आर्थिक प्रगती, गुन्हेगारी प्रगती प्रसिद्ध करतात. त्यांच्या वेबसाइटवर ही सर्व माहिती वाचता येते. हीच सर्व माहिती आपल्याला थेट निवडणूक आयोगाकडूनसुद्धा मिळू शकते. सर्व उमेदवारांना एक प्रतिज्ञापत्न आयोगाकडे सादर करायचं असतं. त्यात त्यांची व कुटुंबाची संपत्ती जाहीर केलेली असते. मागील पाच वर्षात त्यात किती फरक पडला तेही आपल्याला कळू शकतं. त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, सिद्ध झालेत तेही कळतं. ही सारी माहिती खुली असते. सरकार सुधारायचे तर चांगली कामं करणारी माणसं आपण निवडून दिली पाहिजेत. जातीचं भूत कितीही वाढवलं ंतरी लोक फसत नाहीत - ही अक्कल आपण मतदारांनी पुढार्‍यांना शिकविली पाहिजे.गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमधली एक चांगली गोष्ट अशी की कोणत्याही जातीय किंवा धार्मिक वादाचा मुद्दा या निवडणुकांमधला मुख्य मुद्दा नव्हता. काही लोकांनी असे जातीय मुद्दे आणायचा प्रयत्न करून पाहिला, तरीही ते मुद्दे कोपर्‍यात पडले. जातीय ध्रुवीकरणाशिवायही जिंकता येतं हे या निवडणुकांनी दाखवून दिलं. आपल्यासारख्या नव्या दमाच्या मतदारांसाठी ही फार चांगली संधी आहे. इथून मागं फिरायचं नाही, फिरू द्यायचं नाही. नया इंडिया अपनेको जैसा चाहिए, वैसाच बनानेका!