शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

आर्ची परश्या की तुम्हीच?

By admin | Updated: May 12, 2016 15:16 IST

एक दूजे के लिए, कयामत से कयामत तक पासून प्रेमाचा बळी घेणारी प्रेमाची सैराट ष्टोरी.

‘तू असशील मोठा बादशहा, मी नाही घाबरत तुला जा.’
असं सांगणारी अनारकली कोणो एकेकाळी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर झळकली होती.
ती भर राजसभेत बादशहाला ठणकावून सांगते की, ‘पर्दा नहीं जब कोई खुदा से, बंदो से पर्दा करना क्या, जब प्यार किया तो डरना क्या..’
अर्थात या बेडरपणाची किंमत पण तिला मोजावीच लागते. बादशहा तिला भिंतीत जिवंत गाडतो. सलीम-अनारकलीची प्रेमकथा इथं संपते पण त्यांचं प्रेम बादशहाच्या दहशतीलाच नाही, तर आलम दुनियेला फतेह करत कायमचं अमर होतं.
अशा किती कहाण्या हिंदी सिनेमात आपण आजवर पाहिल्या.
एक दूजे के लिए जगू पाहणारे वासू -सपना भाषिक संघर्षाच्या विस्तवात भरडले जातात आणि शेवटी संपवून टाकतात स्वत:ला एकदुस:याच्या साक्षीनं.
साथ जी तो नहीं सकते, पर मर तो सकते है म्हणत ‘कयामत’ घेऊन आलेले आणि खानदानांच्या वैरापायी बळी गेलेले राज-रश्मी. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून ते पळून तर जातात पण त्यांच्या जिवावर उठलेली माणसं त्यांना गाठतात आणि शेवटी संपवतातच.
ज्याची सध्या तुफान चर्चा सुरू आहे तो सैराट तरी काय सांगतो. जातीपातीच्या आणि गरीब-श्रीमंतीच्या चरकात शेवटी पिळवटून कापलंच जातं आर्ची-परश्याचं प्रेम!
हीर-रांझा, सोहनी-महवाल ते वासू सपना, आर्ची-परश्या.
काळ किती बदलला.पण गोष्ट तीच.
सच्च्या प्रेमाची आणि प्रेमावर उठणा:या निष्ठूर दुनियेची.
कुठल्याच भेदाला न जुमानणारं आणि त्यापल्याड गेलेलं तरुण जोडप्यांचं प्रेम आणि निर्दयतेची कुठली सीमाच न राखता त्या प्रेमाला संपवायला निघालेली भवतालची माणसं. समाज..
या गोष्टीतलं सूत्र काळाबरोबर आपल्या समाजात बदललंच नाही हेच सांगतोय का हा सिनेमाचा प्रवास? 
प्रेम असफल झाल्यानं एकेकटय़ानं किंवा जोडप्यानं जीव दिल्याच्या बातम्या आणि ऑनर किलिंगच्या निर्घृण बातम्या अजूनही जागा व्यापतच आहेत वर्तमानपत्रतही आणि टीव्हीवरच्या प्राइमटाइममध्येही.
हे असं का होतं; याचीच एक चर्चा पान 4-5 वर.
 
- ऑक्सिजन टीम