शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

आर्ची परश्या की तुम्हीच?

By admin | Updated: May 12, 2016 15:16 IST

एक दूजे के लिए, कयामत से कयामत तक पासून प्रेमाचा बळी घेणारी प्रेमाची सैराट ष्टोरी.

‘तू असशील मोठा बादशहा, मी नाही घाबरत तुला जा.’
असं सांगणारी अनारकली कोणो एकेकाळी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर झळकली होती.
ती भर राजसभेत बादशहाला ठणकावून सांगते की, ‘पर्दा नहीं जब कोई खुदा से, बंदो से पर्दा करना क्या, जब प्यार किया तो डरना क्या..’
अर्थात या बेडरपणाची किंमत पण तिला मोजावीच लागते. बादशहा तिला भिंतीत जिवंत गाडतो. सलीम-अनारकलीची प्रेमकथा इथं संपते पण त्यांचं प्रेम बादशहाच्या दहशतीलाच नाही, तर आलम दुनियेला फतेह करत कायमचं अमर होतं.
अशा किती कहाण्या हिंदी सिनेमात आपण आजवर पाहिल्या.
एक दूजे के लिए जगू पाहणारे वासू -सपना भाषिक संघर्षाच्या विस्तवात भरडले जातात आणि शेवटी संपवून टाकतात स्वत:ला एकदुस:याच्या साक्षीनं.
साथ जी तो नहीं सकते, पर मर तो सकते है म्हणत ‘कयामत’ घेऊन आलेले आणि खानदानांच्या वैरापायी बळी गेलेले राज-रश्मी. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून ते पळून तर जातात पण त्यांच्या जिवावर उठलेली माणसं त्यांना गाठतात आणि शेवटी संपवतातच.
ज्याची सध्या तुफान चर्चा सुरू आहे तो सैराट तरी काय सांगतो. जातीपातीच्या आणि गरीब-श्रीमंतीच्या चरकात शेवटी पिळवटून कापलंच जातं आर्ची-परश्याचं प्रेम!
हीर-रांझा, सोहनी-महवाल ते वासू सपना, आर्ची-परश्या.
काळ किती बदलला.पण गोष्ट तीच.
सच्च्या प्रेमाची आणि प्रेमावर उठणा:या निष्ठूर दुनियेची.
कुठल्याच भेदाला न जुमानणारं आणि त्यापल्याड गेलेलं तरुण जोडप्यांचं प्रेम आणि निर्दयतेची कुठली सीमाच न राखता त्या प्रेमाला संपवायला निघालेली भवतालची माणसं. समाज..
या गोष्टीतलं सूत्र काळाबरोबर आपल्या समाजात बदललंच नाही हेच सांगतोय का हा सिनेमाचा प्रवास? 
प्रेम असफल झाल्यानं एकेकटय़ानं किंवा जोडप्यानं जीव दिल्याच्या बातम्या आणि ऑनर किलिंगच्या निर्घृण बातम्या अजूनही जागा व्यापतच आहेत वर्तमानपत्रतही आणि टीव्हीवरच्या प्राइमटाइममध्येही.
हे असं का होतं; याचीच एक चर्चा पान 4-5 वर.
 
- ऑक्सिजन टीम