शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

अँब्रॉडच्या स्वप्नाला इंटरनॅशनल बोर्डाचे पंख?

By admin | Updated: June 5, 2014 18:04 IST

कुणी सांगितलं की, लहानग्या पोरांच्या शाळा प्रवेशालाच आईबाबा जाम अधीर होतात. मोठं होता होता, म्हणजे एकदम नववीत किंवा मग अकरावीतही गेल्यावर अनेक मुलामुलींना वाटू लागतं की, आपल्या आईबाबांचं चुकलंच

कुणी सांगितलं की, लहानग्या पोरांच्या शाळा प्रवेशालाच आईबाबा जाम अधीर होतात.
मोठं होता होता, म्हणजे एकदम नववीत किंवा मग अकरावीतही गेल्यावर अनेक मुलामुलींना वाटू लागतं की, आपल्या आईबाबांचं चुकलंच. आपल्याला कसल्या ‘देसी’ बोर्डात घालून ठेवलंय.
म्हणून मग अनेक जण आईवडिलांच्या मागे लकडा लावतात की मला ‘आयबी’च पाहिजे. काही जण तर आईवडिलांना सांगायचेही कष्ट घेत नाहीत आणि परस्पर इंटरनॅशनल बोर्ड घ्यायचंच, असा निर्णय घेऊन मोकळे होतात. ‘आयबी’ किंवा ‘आयजीएसई’ बोर्ड घ्यायचं ही आजकालची फॅशन असल्यासारखी पोरं हीच बोर्ड पाहिजे म्हणून हटून बसतात. एरवी आईवडील कशाला मुलांना इंटरनॅशनल बोर्ड घेऊ नको म्हणतील? पण ते नाही म्हणतात ते एकाच गोष्टीमुळे, ते म्हणजे पैसा. किमान ६ ते ९ लाख रुपये या बोर्डांची वर्षाची फी असते. अनेक पालकांना तेवढा पैसा उभं करणंही शक्य नसतं. मग कर्ज काढा, सोनं गहाण ठेवा असं करून पालक मुलांचा हट्ट पूर्ण करतात.
देशाबाहेर शिकायला किंवा नोकरीला जायचं तर एवढं करायलाच हवं, ही त्यामागची भावना. खरंतर शिकायलाच?
अनेक मुलामुलींचं हल्ली ठाम मत आहे की, आपण इथे इंटरनॅशनल बोर्ड घेतलं की इथली डिग्री घेतली की पुढचं पाऊल थेट देशाबाहेरच्याच एखाद्या बड्या युनिव्हर्सिटीत. आपण डायरेक्ट ग्लोबल सिटीझनच होऊ.
प्रत्यक्षात सगळ्यांचंच तसं होत नाही. स्वप्न विदेशाची पडत असली तरी प्रत्यक्षात तो अभ्यासक्रम झेपत नाही, आईवडील कर्जात डुबतात. काही जणं तर नापास होतात.
आणि शेवटी निराशेच्या गर्तेत जातात.
इंटरनॅशनल बोर्डांचं हे अतिरेकी स्वप्नाळू भूत आपल्याला खरंच काही ‘शिकवतं’ का, जगाच्या स्पर्धेत उभं रहायला लायक बनवतं का?
हे तपासून पहायला हवं.
नाहीतर तेल -तूप -धुपाटण्यासह सगळंच गमावण्याची पाळी आज अनेकांवर येते आहे.