शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

स्मार्ट बॅटरीसाठी 5 ट्रिक्स

By admin | Updated: September 25, 2014 17:00 IST

स्मार्टफोनची वारंटी संपते न संपते तोच बॅटरी खराब झाली, बदलावी लागली असा अनुभव अनेकांना येतो. खरंतर बॅटरी हा स्मार्टफोनमधील अत्यंत महत्त्वाचा घटक. तिचं आयुष्य वाढावं म्हणून आपण काहीच करत नाही. मग बॅटरी ढपते, ती ढपू नये म्हणून करायलाच पाहिजेत अशा या ५ गोष्टी.

फोनची बॅटरी सारखी ढपते? या उतरणार्‍या बॅटरीचं लाईफ वाढवाल कसं?
 
स्मार्टफोनची वारंटी संपते न संपते तोच बॅटरी खराब झाली, बदलावी लागली असा अनुभव अनेकांना येतो. खरंतर बॅटरी हा स्मार्टफोनमधील अत्यंत महत्त्वाचा घटक. स्मार्टफोनची  एरव्ही आपण किती काळजी घेतो. त्यामध्ये अँण्टीव्हायरस टाकतो, त्याला बाहेरून व्यवस्थित कव्हर लावतो. पण बॅटरीचं काय? तिचं आयुष्य वाढावं म्हणून आपण काहीच करत नाही. मग बॅटरी ढपते, ती ढपू नये म्हणून करायलाच पाहिजेत अशा या ५ गोष्टी.
 
 
जास्त तपमान 
बॅटरीचे आयुष्य कमी करण्यासाठी जास्त तपमान खूप कारणीभूत असतं. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन उन्हात जास्त वेळ राहणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही उन्हात फिरणार असाल तर स्मार्टफोन हातरुमालात गुंडाळून मग खिशात किंवा पर्समध्ये ठेवा, म्हणजे तपमान वाढीचा फटका बॅटरीला बसणार नाही. 
 
पूर्णपणे डिसचार्ज नको
 असा एक गैरसमज आहे की, बॅटरी लाइफ वाढविण्यासाठी बॅटरी पूर्ण डिसचार्ज झाल्यानंतरच पूर्ण चार्ज करायला पाहिजे. मात्र आजकाल ज्या लिथीयम आयनच्या बॅटरीज स्मार्टफोनमध्ये वापरल्या जातात त्यासाठी असे करण्याची गरज नाही. बॅटरीचे लाइफ वाढविण्यासाठी थोडेथोडे चाजिर्ंग करावे म्हणजे २५ टक्क्यांवर बॅटरी आली असता त्याला ७0 टक्केपर्यंत चार्ज करावे. परत २५-३0  टक्क्यांवर बॅटरी आली असता ७0-८0 टक्क्यांपर्यंत बॅटरी चार्ज करावी. त्यामुळे बॅटरीचे लाइफ वाढते.
 
 
फुल्ल चार्जिंग नको
 काही लोकांना स्मार्टफोन रात्री चाजिर्ंगला लावून झोपायची सवय असते. त्यामुळे बॅटरी फुलचार्ज (१00 टक्के) झाल्यानंतरसुद्धा पावर कनेक्टेड असल्यामुळे बॅटरीची हेल्थ खराब होऊ शकते. बॅटरीची सवरेत्तम लाईफ म्हणजे ४0-८0 टक्क्य़ांमध्ये आहे. त्यामुळे जरी तुम्ही १00 टक्केपर्यंत बॅटरी चार्ज केलीच तर नंतर स्मार्टफोन चाजिर्ंग बंद करून टाका. 
 
ब्रॅण्डेड बॅटरी वापरा
   समजा तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी काही कारणामुळे खराब झालीच तर नवीन बॅटरी घेताना नेहमी ब्रॅण्डेड कंपनीचीच बॅटरी घ्या. काही पैसे वाचविण्यासाठी स्वस्तातील बॅटरी घेऊ नका. स्वस्तातील बॅटरीमुळे अपघाताचे प्रमाण वाढते.
 
 
डिसचार्ज महिन्यातून एकदाच
    सध्याच्या स्मार्टफोनच्या बॅटरीसुद्धा स्मार्ट आहेत. त्यामुळे स्मार्टफोन तुम्हाला किती वेळ बॅटरी पुरेल हे सांगत असतो. म्हणजे 2 ँ४१२ 15 ्रेल्ल४३ी२ १ीें्रल्ल्रल्लॅ असे काहीसे नोटीफिकेशन तुम्हाला स्मार्टफोन देत असतो. मात्र सारखंसारखं चार्ज-डिसचार्ज केल्याने स्मार्टफोनचा हा अंदाज चुकू शकतो आणि तुम्ही गोत्यात येऊ शकता. त्यामुळे बॅटरी बनविणार्‍यांचा असा सल्ला आहे की तुम्ही किमान महिन्यातून एकदा तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी पूर्णपणे डिसचार्ज होऊ द्या.
 
 
- अनिल भापकर 
anil.bhapkar@lokmat.com