शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

स्मार्ट बॅटरीसाठी 5 ट्रिक्स

By admin | Updated: September 25, 2014 17:00 IST

स्मार्टफोनची वारंटी संपते न संपते तोच बॅटरी खराब झाली, बदलावी लागली असा अनुभव अनेकांना येतो. खरंतर बॅटरी हा स्मार्टफोनमधील अत्यंत महत्त्वाचा घटक. तिचं आयुष्य वाढावं म्हणून आपण काहीच करत नाही. मग बॅटरी ढपते, ती ढपू नये म्हणून करायलाच पाहिजेत अशा या ५ गोष्टी.

फोनची बॅटरी सारखी ढपते? या उतरणार्‍या बॅटरीचं लाईफ वाढवाल कसं?
 
स्मार्टफोनची वारंटी संपते न संपते तोच बॅटरी खराब झाली, बदलावी लागली असा अनुभव अनेकांना येतो. खरंतर बॅटरी हा स्मार्टफोनमधील अत्यंत महत्त्वाचा घटक. स्मार्टफोनची  एरव्ही आपण किती काळजी घेतो. त्यामध्ये अँण्टीव्हायरस टाकतो, त्याला बाहेरून व्यवस्थित कव्हर लावतो. पण बॅटरीचं काय? तिचं आयुष्य वाढावं म्हणून आपण काहीच करत नाही. मग बॅटरी ढपते, ती ढपू नये म्हणून करायलाच पाहिजेत अशा या ५ गोष्टी.
 
 
जास्त तपमान 
बॅटरीचे आयुष्य कमी करण्यासाठी जास्त तपमान खूप कारणीभूत असतं. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन उन्हात जास्त वेळ राहणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही उन्हात फिरणार असाल तर स्मार्टफोन हातरुमालात गुंडाळून मग खिशात किंवा पर्समध्ये ठेवा, म्हणजे तपमान वाढीचा फटका बॅटरीला बसणार नाही. 
 
पूर्णपणे डिसचार्ज नको
 असा एक गैरसमज आहे की, बॅटरी लाइफ वाढविण्यासाठी बॅटरी पूर्ण डिसचार्ज झाल्यानंतरच पूर्ण चार्ज करायला पाहिजे. मात्र आजकाल ज्या लिथीयम आयनच्या बॅटरीज स्मार्टफोनमध्ये वापरल्या जातात त्यासाठी असे करण्याची गरज नाही. बॅटरीचे लाइफ वाढविण्यासाठी थोडेथोडे चाजिर्ंग करावे म्हणजे २५ टक्क्यांवर बॅटरी आली असता त्याला ७0 टक्केपर्यंत चार्ज करावे. परत २५-३0  टक्क्यांवर बॅटरी आली असता ७0-८0 टक्क्यांपर्यंत बॅटरी चार्ज करावी. त्यामुळे बॅटरीचे लाइफ वाढते.
 
 
फुल्ल चार्जिंग नको
 काही लोकांना स्मार्टफोन रात्री चाजिर्ंगला लावून झोपायची सवय असते. त्यामुळे बॅटरी फुलचार्ज (१00 टक्के) झाल्यानंतरसुद्धा पावर कनेक्टेड असल्यामुळे बॅटरीची हेल्थ खराब होऊ शकते. बॅटरीची सवरेत्तम लाईफ म्हणजे ४0-८0 टक्क्य़ांमध्ये आहे. त्यामुळे जरी तुम्ही १00 टक्केपर्यंत बॅटरी चार्ज केलीच तर नंतर स्मार्टफोन चाजिर्ंग बंद करून टाका. 
 
ब्रॅण्डेड बॅटरी वापरा
   समजा तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी काही कारणामुळे खराब झालीच तर नवीन बॅटरी घेताना नेहमी ब्रॅण्डेड कंपनीचीच बॅटरी घ्या. काही पैसे वाचविण्यासाठी स्वस्तातील बॅटरी घेऊ नका. स्वस्तातील बॅटरीमुळे अपघाताचे प्रमाण वाढते.
 
 
डिसचार्ज महिन्यातून एकदाच
    सध्याच्या स्मार्टफोनच्या बॅटरीसुद्धा स्मार्ट आहेत. त्यामुळे स्मार्टफोन तुम्हाला किती वेळ बॅटरी पुरेल हे सांगत असतो. म्हणजे 2 ँ४१२ 15 ्रेल्ल४३ी२ १ीें्रल्ल्रल्लॅ असे काहीसे नोटीफिकेशन तुम्हाला स्मार्टफोन देत असतो. मात्र सारखंसारखं चार्ज-डिसचार्ज केल्याने स्मार्टफोनचा हा अंदाज चुकू शकतो आणि तुम्ही गोत्यात येऊ शकता. त्यामुळे बॅटरी बनविणार्‍यांचा असा सल्ला आहे की तुम्ही किमान महिन्यातून एकदा तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी पूर्णपणे डिसचार्ज होऊ द्या.
 
 
- अनिल भापकर 
anil.bhapkar@lokmat.com