शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

राणासारखे युवा खेळाडू भारतीय क्रिकेटचे भविष्य!

By admin | Updated: April 21, 2017 23:35 IST

मुंबईविरुद्ध दिल्ली हा आयपीएलचा सामना आज, शनिवारी रंगणार आहे. या सामन्यात धडाकेबाज युवा खेळाडूंची बहारदार कामगिरी अनुभवायला मिळणार!

रवि शास्त्री लिहितात...मुंबईविरुद्ध दिल्ली हा आयपीएलचा सामना आज, शनिवारी रंगणार आहे. या सामन्यात धडाकेबाज युवा खेळाडूंची बहारदार कामगिरी अनुभवायला मिळणार! पांड्या आणि राणा; नायर आणि अय्यर या खेळाडूंनी स्वत:च्या कामगिरीमुळे कमालीची लोकप्रियता कमावली आहे. ऋषभ पंत हा आणखी एक चांगला खेळाडू. या सर्व खेळाडूंमध्ये राणाला स्वत:ची ओळख सांगण्याची वेळ राहिलेली नाही. शिवाय या खेळाडूंना कुठल्याही संघाविरुद्ध कामगिरी उंचावण्यास वेळ लागणार नाही. राणाची चमक तर कुणाच्याही ध्यानीमनी नव्हती. तो धडाका करेल, असे कुणी भाकितही केले नव्हते. मुंबई इंडियन्सच्या बाकावर बसणारा हा युुवा खेळाडू आता संघाच्या चाव्या सांभाळायला लागला आहे. प्रत्येकाचा विश्वास त्याने कमावला आहे. मैदानात असेल तेव्हा प्रत्येक क्षणाला वर्चस्व गाजवितो. २०१७ चे आयपीएल सत्र माझे आहे, असा जणू काही तो इशाराच देत आहे.राणा हा गोलंदाजांसाठी ‘कोडे’ ठरलेला फलंदाज आहे. त्याला चेंडू कसा टाकावा, हे देखील अनेकांना समजत नसावे. त्याच्या हातात वेग आणि मनगटात ताकद असल्याने वेगाने बॅट फिरविण्यात तरबेज वाटतो. सध्याच्या पर्वात त्याच्यापेक्षा जास्त षट्कार कुणी मारले नसावते, यावरून राणाची फटकेबाजी लक्षात येते. राणा मुंबईसाठी जी कामगिरी करू शकतो तशीच कामगिरी दिल्लीसाठी श्रेयस अय्यर हा देखील करू शकतो. दोघेही सारख्याच वयाचे आहेत. या स्पर्धेत युवा खेळाडू सर्वाधिक जोखीम पत्करून खेळतात. त्यात दिल्ली आणि मुंबई संघात युवा खेळाडूंचा सर्वाधिक भरणा आहे; पण या युवा खेळाडूंनी सावध खेळ करायलाच हवा. जोखीम पत्करण्याच्या नावाखाली चुका करू नये. पंतने हैदराबादविरुद्ध मोठी चूक करीत युवराजच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नरकडे सोपा झेल दिला होता. पांड्या बंधू आणि ऋषभ पंत हे क्रिकेटचे भविष्यातील ब्रँड बनू शकतात. याच मालिकेत संजू सॅमसन याला विसरता येणार नाही. २३ वर्षांच्या या खेळाडूने आयपीएलचे पहिले शतक ठोकले. करुण नायर आणि जसप्रीत बुमराह हे देखील या खेळातील स्वमर्जीचे मालक आहेत. यामुळेच माझ्या मते वानखेडे स्टेडियमवर भारतीय टी-२० क्रिकेटचे भविष्य आपापले कौशल्य पणाला लावताना दिसणार आहे. (टीसीएम)