शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

विश्वचषक भारत जिंकेल

By admin | Updated: November 22, 2014 02:04 IST

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसकर यांनी आज, शुक्रवारी भारतीय संघाला आगामी आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसकर यांनी आज, शुक्रवारी भारतीय संघाला आगामी आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आणि ‘२०१५चा विश्वचषक’ भारतीय संघच जिंकेल, अशी आशा व्यक्त केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) २०१३-१४ च्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण आज मुंबईत करण्यात आले. यावेळी वेंगसरकर यांना भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या योगदानासाठी कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेंगसरकर म्हणाले, आगामी आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला घवघवीत यश मिळेल, यासाठी माझ्या शुभेच्छा. आशा करतो की, या मालिकेच्या अनुभवाच्या बळावर भारत विश्वचषकाचे जेतेपद कायम राखण्यात यशस्वी होईल.५८ वर्षीय वेंगसरकरांनी ११६ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. १९७५-७६ मध्ये नागपूर येथे इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून खेळणाऱ्या वेंगसरकर यांनी शेष भारताविरुद्ध खणखणीत शतक ठोकले होते. १९८३च्या विश्वचषक विजयी आणि १९८५च्या चॅम्पियन्स चषक विजयी संघात त्यांचा समावेश होता. तसेच २००६ ते २००८ या कालावधीत त्यांनी भारताच्या वरिष्ठ संघाच्या निवड समिती अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर वेंगसरकर म्हणाले, या आनंदाच्या क्षणी माझ्या शाळेचे किंग जॉर्ज (राजे शिवाजी) ज्यांच्याकडून मी पहिल्यांदा ‘गाईल्स आणि हॅरिस’ शिल्ड स्पर्धेत खेळलो त्यांचे आभार व्यक्त करतो. पोद्दार कॉलेजचे विशेष आभार. त्यांच्यामुळे भारतीय संघाचे आणि भारतीय विद्यापीठ संघाचे कर्णधारपद भूषविण्याची मला संधी मिळाली. विद्यापीठाच्या संघाकडून १९७७ मध्ये एमसीसी संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळाला. तसेच दादर युनियन क्लबला विसरून चालणार नाही. मुंबई आणि भारतीय संघाकडून खेळतानाच्या अनेक आठवणी या क्लबशी जोडलेल्या आहेत.मुंबई आणि भारतीय संघात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि हे दोन्ही पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक डाव, प्रत्येक सामना, प्रत्येक मालिका आणि प्रत्येक दौऱ्याचा मनमुरादपणे आनंद लुटल्याचे वेंगसरकर सांगतात. (प्रतिनिधी)