शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

महिला विश्वचषक - दक्षिण अफ्रिकेकडून भारताचा दणदणीत पराभव

By admin | Updated: July 8, 2017 22:17 IST

274 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा डाव 158 धावांवरच आटोपला

ऑनलाइन लोकमत
लीसेस्टर, दि. 8 - आयसीसी महिला क्रिकेट विश्चचषकात दक्षिण अफ्रिकेने भारतीय संघाची विजयी घोडदौड रोखत दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण अफ्रिकेने 115 धावांनी भारताचा पराभव केला आहे. 274 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा डाव 158 धावांवरच आटोपला. भारताकडून दिप्ती शर्मा आणि झूलन गोस्वामी वगळता कोणीच मोठी खेळू करु शकलं नाही. दिप्ती शर्माने 60 तर झूलन गोस्वामीने नाबाद 43 धावा केल्या.  स्मती मंधाना मोठी खेळी करु शकली नाही. ती चार धावांवरच आऊट झाली. कर्णधार मिताली राजही शून्यावर बाद झाली. 
भारतीय संघाने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण अफ्रिकेने भारतीय संघासमोर 274 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण अफ्रिकेने 50 ओव्हर्समध्ये नऊ विकेट्स गमावत 273 धावा केल्या होत्या. गेल्या सामन्यांमधील कामगिरी पाहता भारतीय संघ हे तगडं आव्हान सहज पेलेल असं वाटलं होतं. मात्र एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची चांगलीच दमछाक झालेली दिसली. 
दक्षिण अफ्रिकेच्या लिजेल लीने ताबडतोब फलंदाजी करत फक्त 65 चेंडूत 92 धावा काढल्या होत्या. लिजेल लीने आपल्या 92 धावांच्या स्फोटक खेळीत सात षटकार लगावले होते. मात्र ती शतक करु शकली नाही. हरमनप्रीत कौरने तिला पायचीत करत आऊट केलं. याशिवाय कर्णधार डेन वॉन नीकर्कने 57 धावांची खेळी केली होती. ती नाबाद राहिली. दक्षिण अफ्रिकेकडे मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र विकेट्स गमावल्याने त्यांना 273 धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश मिळालं होतं. शेवटच्या फळीतील खेळाडू मोठी धावसंख्या उभारु शकले नव्हते. 
भारताकडून शिखा पांडेने चांगली गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतले होते. एकता बिश्त आणि हरमनप्रीत कौर यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाले. एकता बिश्तने 9 ओव्हर्समध्ये 68 धावा दिल्या होत्या. झूलन गोस्वामी आणि पूनम यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली.