शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

धोनी किंवा युवराजच्या जागी विराट ऋषभ पंतला संधी देणार का?

By admin | Updated: June 26, 2017 12:02 IST

कर्णधार विराट कोहलीने अँटीग्वा येथे होणा-या तिस-या वनडेमध्ये संघात काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

पोर्ट ऑफ स्पेन, दि. 26 - दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने अँटीग्वा येथे होणा-या तिस-या वनडेमध्ये संघात काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. आम्ही एकत्र बसू आणि संघात काय बदल करता येऊ शकतात यावर चर्चा करु. काही नव्या चेह-यांना संधी मिळू शकते असे विराटने सामन्यानंतरच्या पत्रकारपरिषदेत सांगितले. 
 
दिल्लीच्या ऋषभ पंतच्या नावाची जोरदार चर्चा असून, त्याला तिस-या वनडेमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. यष्टीरक्षक, फलंदाज असलेल्या ऋषभने यंदाच्या आयपीएल हंगामात दमदार फलंदाजी केली होती. सध्या युवराज सिंगचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलामीच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फटकावलेले अर्धशतक वगळता युवराजला अद्याप लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 
आणखी वाचा 
अजिंक्यच्या दमदार शतकाने भारताचा वेस्ट इंडिजवर 105 धावांनी विजय
 
वेस्ट इंडिज दौ-यावर पहिल्या वनडेमध्ये युवराजने फक्त 4 धावा केल्या होत्या. दुस-या सामन्यात त्याला फक्त 14 धावाच करता आल्या. दुस-या बाजूला महेंद्रसिंह धोनी फॉर्ममध्ये असला तरी, युवराज आणि धोनीच्या वयाचा मुद्दा विचारात घेण्याची मागणी होत आहे. दोन वर्षांनी 2019 मध्ये होणारा वर्ल्डकप लक्षात घेता धोनी आणि युवराजच्या भूमिकेबद्दल निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले होते. ऋषभ यष्टीरक्षक असल्यामुळे तिस-या वनडेमध्ये धोनी किंवा युवराजला विश्रांती देऊन त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो. 
भारताचा दमदार विजय 
दरम्यान अजिंक्य रहाणेचे दमदार शतक (103) व शिखर धवन (63), कर्णधार विराट कोहली (87) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 105 धावांनी पराभव केला. यासोबतच 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे, दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता.
 
या सामन्यात फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने निर्धारीत 43 षटकात वेस्ट इंडिजविरुध्द 5 बाद 310 धावांचा डोंगर उभारला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 43 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 205 धावा बनवू शकला.