शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

धोनी किंवा युवराजच्या जागी विराट ऋषभ पंतला संधी देणार का?

By admin | Updated: June 26, 2017 12:02 IST

कर्णधार विराट कोहलीने अँटीग्वा येथे होणा-या तिस-या वनडेमध्ये संघात काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

पोर्ट ऑफ स्पेन, दि. 26 - दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने अँटीग्वा येथे होणा-या तिस-या वनडेमध्ये संघात काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. आम्ही एकत्र बसू आणि संघात काय बदल करता येऊ शकतात यावर चर्चा करु. काही नव्या चेह-यांना संधी मिळू शकते असे विराटने सामन्यानंतरच्या पत्रकारपरिषदेत सांगितले. 
 
दिल्लीच्या ऋषभ पंतच्या नावाची जोरदार चर्चा असून, त्याला तिस-या वनडेमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. यष्टीरक्षक, फलंदाज असलेल्या ऋषभने यंदाच्या आयपीएल हंगामात दमदार फलंदाजी केली होती. सध्या युवराज सिंगचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलामीच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फटकावलेले अर्धशतक वगळता युवराजला अद्याप लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 
आणखी वाचा 
अजिंक्यच्या दमदार शतकाने भारताचा वेस्ट इंडिजवर 105 धावांनी विजय
 
वेस्ट इंडिज दौ-यावर पहिल्या वनडेमध्ये युवराजने फक्त 4 धावा केल्या होत्या. दुस-या सामन्यात त्याला फक्त 14 धावाच करता आल्या. दुस-या बाजूला महेंद्रसिंह धोनी फॉर्ममध्ये असला तरी, युवराज आणि धोनीच्या वयाचा मुद्दा विचारात घेण्याची मागणी होत आहे. दोन वर्षांनी 2019 मध्ये होणारा वर्ल्डकप लक्षात घेता धोनी आणि युवराजच्या भूमिकेबद्दल निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले होते. ऋषभ यष्टीरक्षक असल्यामुळे तिस-या वनडेमध्ये धोनी किंवा युवराजला विश्रांती देऊन त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो. 
भारताचा दमदार विजय 
दरम्यान अजिंक्य रहाणेचे दमदार शतक (103) व शिखर धवन (63), कर्णधार विराट कोहली (87) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 105 धावांनी पराभव केला. यासोबतच 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे, दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता.
 
या सामन्यात फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने निर्धारीत 43 षटकात वेस्ट इंडिजविरुध्द 5 बाद 310 धावांचा डोंगर उभारला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 43 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 205 धावा बनवू शकला.