शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मौसम खत्रीचे स्वप्न भंगले

By admin | Updated: May 9, 2016 00:02 IST

भारताचा मौसम खत्री याचे रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न दुसऱ्या आणि अखेरच्या विश्व क्वालिफाइंग स्पर्धेत रविवारी फ्रीस्टाईल ९७ किलो वजन गटाच्या संघर्षपूर्ण सेमी फायनलमधील पराभवाबरोबरच भंगले.

इस्तंबूल : भारताचा मौसम खत्री याचे रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न दुसऱ्या आणि अखेरच्या विश्व क्वालिफाइंग स्पर्धेत रविवारी फ्रीस्टाईल ९७ किलो वजन गटाच्या संघर्षपूर्ण सेमी फायनलमधील पराभवाबरोबरच भंगले. आता आॅगस्टमध्ये रिओ आॅलिम्पिकमध्ये ६ पैलवान भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे निश्चित झाले.रिओ आॅलिम्पिकसाठी या अखेरच्या क्वालिफाइंग स्पर्धेच्या फ्रीस्टाईल गटात भारताचे तीन मल्ल सहभागी झाले होते. त्यातील दोन मल्ल गोपाल केदारनाथ यादव (८६ किलो) आणि हितेंदर (१२५ किलो) पहिल्याच फेरीत पराभूत झाले, तर मौसम खत्रीचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.खत्रीला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता आणि उपउपांत्यपूर्व फेरीत त्याने ग्रीसच्या निकोलाओस पापोइकोनोमो याचा १०-० असा धुव्वा उडवला होता. उपांत्यपूर्व फेरीत खत्रीने जर्मनीच्या एरिक स्वेन थिएले याचे आव्हान ८-४ असे मोडीत काढले. उपांत्य फेरीत खत्रीची लढत मंगोलियाच्या खुदेरबुल्गा दोर्जखंड याच्याशी होती. मंगोलियाच्या मल्लाने संघर्षपूर्ण लढतीत खत्रीचा ८-६ असा पराभव करीत ती जिंकली. या पराभवाबरोबरच हरियानाच्या खत्री याचे रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न भंगले.त्याआधी गोपाल केदारनाथ यादव याला ८६ किलो वजन गटात लातवियाच्या अर्मांडस् ज्विरबुलिस याने ५-४ अशा संघर्षपूर्ण लढतीत नमवले, तर १२५ किलो वजन गटात युक्रेनच्या ओलेक्सांद्र खोत्सियानीवस्कीने हितेंदरला क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ७-२ असे पराभूत केले.आॅलिम्पिकसाठी या अखेरच्या पात्रता स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताचे पाचही ग्रीकोरोमन पैलवान फ्लॉप ठरले होते. त्यातील चार जण तर एकही कुस्ती जिंकू शकले नव्हते, तर गुरप्रीतला वजन जास्त आढळल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. महिला गटात सहा मल्लांपैकी विनेशने ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकत आणि साक्षीने ५८ किलो वजन गटात रौप्यपदक जिंकताना देशाला आॅलिम्पिक कोटा मिळवून दिला होता.रिओ आॅलिम्पिकसाठी भारताकडून संदीप तोमर (५७), योगेश्वर दत्त (६५ किलो), नरसिंह यादव (७४ किलो), ग्रीकोरोमन मल्ल हरदीप (९८ किलो), महिला मल्ल विनेश (४८) आणि साक्षी (५८) यांनी आॅलिम्पिक कोटा मिळवला होता.२०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये अमित कुमार (५५ किलो), योगेश्वर दत्त (६०), सुशील कुमार (६६), नरसिंह यादव (७४) आणि गीता फोगट (५५) यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते.