शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

मौसम खत्रीचे स्वप्न भंगले

By admin | Updated: May 9, 2016 00:02 IST

भारताचा मौसम खत्री याचे रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न दुसऱ्या आणि अखेरच्या विश्व क्वालिफाइंग स्पर्धेत रविवारी फ्रीस्टाईल ९७ किलो वजन गटाच्या संघर्षपूर्ण सेमी फायनलमधील पराभवाबरोबरच भंगले.

इस्तंबूल : भारताचा मौसम खत्री याचे रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न दुसऱ्या आणि अखेरच्या विश्व क्वालिफाइंग स्पर्धेत रविवारी फ्रीस्टाईल ९७ किलो वजन गटाच्या संघर्षपूर्ण सेमी फायनलमधील पराभवाबरोबरच भंगले. आता आॅगस्टमध्ये रिओ आॅलिम्पिकमध्ये ६ पैलवान भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे निश्चित झाले.रिओ आॅलिम्पिकसाठी या अखेरच्या क्वालिफाइंग स्पर्धेच्या फ्रीस्टाईल गटात भारताचे तीन मल्ल सहभागी झाले होते. त्यातील दोन मल्ल गोपाल केदारनाथ यादव (८६ किलो) आणि हितेंदर (१२५ किलो) पहिल्याच फेरीत पराभूत झाले, तर मौसम खत्रीचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.खत्रीला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता आणि उपउपांत्यपूर्व फेरीत त्याने ग्रीसच्या निकोलाओस पापोइकोनोमो याचा १०-० असा धुव्वा उडवला होता. उपांत्यपूर्व फेरीत खत्रीने जर्मनीच्या एरिक स्वेन थिएले याचे आव्हान ८-४ असे मोडीत काढले. उपांत्य फेरीत खत्रीची लढत मंगोलियाच्या खुदेरबुल्गा दोर्जखंड याच्याशी होती. मंगोलियाच्या मल्लाने संघर्षपूर्ण लढतीत खत्रीचा ८-६ असा पराभव करीत ती जिंकली. या पराभवाबरोबरच हरियानाच्या खत्री याचे रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न भंगले.त्याआधी गोपाल केदारनाथ यादव याला ८६ किलो वजन गटात लातवियाच्या अर्मांडस् ज्विरबुलिस याने ५-४ अशा संघर्षपूर्ण लढतीत नमवले, तर १२५ किलो वजन गटात युक्रेनच्या ओलेक्सांद्र खोत्सियानीवस्कीने हितेंदरला क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ७-२ असे पराभूत केले.आॅलिम्पिकसाठी या अखेरच्या पात्रता स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताचे पाचही ग्रीकोरोमन पैलवान फ्लॉप ठरले होते. त्यातील चार जण तर एकही कुस्ती जिंकू शकले नव्हते, तर गुरप्रीतला वजन जास्त आढळल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. महिला गटात सहा मल्लांपैकी विनेशने ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकत आणि साक्षीने ५८ किलो वजन गटात रौप्यपदक जिंकताना देशाला आॅलिम्पिक कोटा मिळवून दिला होता.रिओ आॅलिम्पिकसाठी भारताकडून संदीप तोमर (५७), योगेश्वर दत्त (६५ किलो), नरसिंह यादव (७४ किलो), ग्रीकोरोमन मल्ल हरदीप (९८ किलो), महिला मल्ल विनेश (४८) आणि साक्षी (५८) यांनी आॅलिम्पिक कोटा मिळवला होता.२०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये अमित कुमार (५५ किलो), योगेश्वर दत्त (६०), सुशील कुमार (६६), नरसिंह यादव (७४) आणि गीता फोगट (५५) यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते.