शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

मौसम खत्रीचे स्वप्न भंगले

By admin | Updated: May 9, 2016 00:02 IST

भारताचा मौसम खत्री याचे रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न दुसऱ्या आणि अखेरच्या विश्व क्वालिफाइंग स्पर्धेत रविवारी फ्रीस्टाईल ९७ किलो वजन गटाच्या संघर्षपूर्ण सेमी फायनलमधील पराभवाबरोबरच भंगले.

इस्तंबूल : भारताचा मौसम खत्री याचे रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न दुसऱ्या आणि अखेरच्या विश्व क्वालिफाइंग स्पर्धेत रविवारी फ्रीस्टाईल ९७ किलो वजन गटाच्या संघर्षपूर्ण सेमी फायनलमधील पराभवाबरोबरच भंगले. आता आॅगस्टमध्ये रिओ आॅलिम्पिकमध्ये ६ पैलवान भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे निश्चित झाले.रिओ आॅलिम्पिकसाठी या अखेरच्या क्वालिफाइंग स्पर्धेच्या फ्रीस्टाईल गटात भारताचे तीन मल्ल सहभागी झाले होते. त्यातील दोन मल्ल गोपाल केदारनाथ यादव (८६ किलो) आणि हितेंदर (१२५ किलो) पहिल्याच फेरीत पराभूत झाले, तर मौसम खत्रीचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.खत्रीला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता आणि उपउपांत्यपूर्व फेरीत त्याने ग्रीसच्या निकोलाओस पापोइकोनोमो याचा १०-० असा धुव्वा उडवला होता. उपांत्यपूर्व फेरीत खत्रीने जर्मनीच्या एरिक स्वेन थिएले याचे आव्हान ८-४ असे मोडीत काढले. उपांत्य फेरीत खत्रीची लढत मंगोलियाच्या खुदेरबुल्गा दोर्जखंड याच्याशी होती. मंगोलियाच्या मल्लाने संघर्षपूर्ण लढतीत खत्रीचा ८-६ असा पराभव करीत ती जिंकली. या पराभवाबरोबरच हरियानाच्या खत्री याचे रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न भंगले.त्याआधी गोपाल केदारनाथ यादव याला ८६ किलो वजन गटात लातवियाच्या अर्मांडस् ज्विरबुलिस याने ५-४ अशा संघर्षपूर्ण लढतीत नमवले, तर १२५ किलो वजन गटात युक्रेनच्या ओलेक्सांद्र खोत्सियानीवस्कीने हितेंदरला क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ७-२ असे पराभूत केले.आॅलिम्पिकसाठी या अखेरच्या पात्रता स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताचे पाचही ग्रीकोरोमन पैलवान फ्लॉप ठरले होते. त्यातील चार जण तर एकही कुस्ती जिंकू शकले नव्हते, तर गुरप्रीतला वजन जास्त आढळल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. महिला गटात सहा मल्लांपैकी विनेशने ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकत आणि साक्षीने ५८ किलो वजन गटात रौप्यपदक जिंकताना देशाला आॅलिम्पिक कोटा मिळवून दिला होता.रिओ आॅलिम्पिकसाठी भारताकडून संदीप तोमर (५७), योगेश्वर दत्त (६५ किलो), नरसिंह यादव (७४ किलो), ग्रीकोरोमन मल्ल हरदीप (९८ किलो), महिला मल्ल विनेश (४८) आणि साक्षी (५८) यांनी आॅलिम्पिक कोटा मिळवला होता.२०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये अमित कुमार (५५ किलो), योगेश्वर दत्त (६०), सुशील कुमार (६६), नरसिंह यादव (७४) आणि गीता फोगट (५५) यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते.