शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

आम्ही विजयाचे दावेदार नव्हतो - विराट कोहली

By admin | Updated: July 10, 2017 13:31 IST

पराभवाचे खापर कर्णधार विराट कोहलीने फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीवर फोडलं आहे.

ऑनलाइन लोकमतकिंग्स्टन, दि. 10 -  एव्हिन लेव्हिसने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने रविवारी खेळल्या गेलेल्या एकमेव टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा 9 गडी राखून पराभव केला. या  पराभवाचे खापर कर्णधार विराट कोहलीने फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीवर फोडलं आहे. पहिल्या टी 20 सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने विराट म्हणाला, वेस्ट इंडिजने आमच्या पेक्षा सरस खेळाचे पदर्शन केलं. चांगल्या सुरुवातीनंतर आमच्या फलंदाजांनी मोक्याच्या वेळी नांगी टाकली. क्षेत्ररक्षणावेळीही भारतीय खेळाडूंनी झेल सोडल्याचा फटका बसला. वेस्ट इंडिजच्या संघानी आमच्यापेक्षा सरस खेळ केला. कालची भारतीय संघाची कामगिरी पाहता आम्ही विजयाचे दावेदार नव्हतो. 

प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात 190 धावां केल्या होत्या. पण एव्हिन लेव्हिसने (नाबाद १२५ धावा, ६२ चेंडू, ६ चौकार, १२ षटकार) केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर त्यांनी सहज विजय मिळवला. भारतीय फलंदाजांनी मोक्याच्या वेळी विकेट गमावल्यामुळे भारत 190 धावां करु शकला. हाणामारीच्या षटकात महत्वाचे फलंदाज बाद झाल्यामुळे 20-30 धावा कमी निघाल्या. 
पुढे बोलताना कोहली म्हणाला, आलेल्या संधी सोडल्या नंतर तुम्ही विजयाचे दावेदार नाही होऊ शकत. फलंदाजांनी विजयाचा पाया रचायला हवा होता. दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी केली पण एका फलंदाजांनी 80-90 धावांची खेळी करायला हवी होती. फलंदाजी प्रमाणे आमच्या गोलंदाजांनीही निराशजनक कामगिरी केली. टी 20 च्या बदल्या प्रारुपामध्ये अनेक वाईट दिवसाला सामोरं जावं लागू शकतं. वेस्ट इंडिज टी 20 चा चांगला संघ आहे. सध्या आपला संघ परिवर्तनाच्या दारात उभा आहे. संघात अनेक बदल होतं आहेत. त्यामुळे विजय-पराजयाचा सामना आपल्याला कारावा लागेल. 
आणखी वाचा -
"लंकादहन"साठी विराटसेनेची घोषणा
कोचपदाच्या शर्यतीत शास्त्री आघाडीवर
काल झालेल्या एकमेव टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रीत केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 190 धावा केल्या होत्या. 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एव्हिन लेव्हिसची (नाबाद १२५ धावा, ६२ चेंडू, ६ चौकार, १२ षटकार) शतकी खेळी व त्याने मार्लोन सॅम्युअल्ससह (नाबाद ३६) दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ११२ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताचा ९ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला