शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

धरमशालामध्ये वॉर्नरच्या कामगिरीबाबत उत्सुकता

By admin | Updated: March 24, 2017 23:40 IST

आॅस्ट्रेलियाचा विचार करता कसोटी मालिका संपण्यासाठी केवळ पाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. काही जाणकारांच्या मते वेगवान गोलंदाजांना अनुकूल

आॅस्ट्रेलियाचा विचार करता कसोटी मालिका संपण्यासाठी केवळ पाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. काही जाणकारांच्या मते वेगवान गोलंदाजांना अनुकूल धरमशाला येथील परिस्थितीमुळे सामन्याचा निकाल चार दिवसांत लागेल. वेगवान गोलंदाजांना सहायक असलेल्या वातावरणामुळे फिरकीपटूंना थोडी विश्रांती मिळेल, अशी आशा आहे. दोन तुल्यबळ संघांदरम्यानच्या वर्चस्वाच्या लढाईमुळे हिमालयालाही हादरे बसतील, असे मत व्यक्त होत आहे. या मालिकेत आॅस्ट्रेलियाने सर्वतोपरी चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला. त्यात मग फलंदाज असो, फिरकीपटू असो की वेगवान गोलंदाजा असो. मायदेशात खेळण्याचा विचार करता भारताला लाभ मिळण्याची शक्यता आहे, पण तरी यजमान संघ दावेदार नाही. मायदेशात खेळतानाही भारतीय संघ दडपणाखाली असल्याचे दिसले. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आॅस्ट्रेलिया संघ या मालिकेत स्वत:चा स्तर उंचावण्यात यशस्वी ठरला. आॅस्ट्रेलिया या मालिकेत विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर असेल तर त्याचे सर्व श्रेय त्यांच्या फलंदाजांना जाते. आघाडीच्या व तळाच्या फलंदाजांदरम्यान रेनशॉ व हँडसकोंब यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. जीवनात केवळ फिरकीपटूंनाच खेळत असल्याप्रमाणे ते या मालिकेत फिरकी गोलंदाजी सहजपणे खेळत आहेत. वळणाऱ्या चेंडूवर प्रतीक्षा करीत ते सहजपणे खेळण्यात यशस्वी ठरले आहेत. स्टीव्ह स्मिथ व शॉन मार्श चांगले खेळाडू आहेत, पण या खेळपट्टीवर डेव्हिड वॉर्नरच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहणार आहे. त्याला या दौऱ्यात अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारताला या लढतीत सुरुवातीपासून आक्रमक खेळ करावा लागेल. विशेषत: वेगवान गोलंदाजांना आपल्या वेगाने आॅस्ट्रेलियन फलंदाजांना चकित करावे लागेल. कुठलेही दडपण न बाळगता त्यांना खेळावे लागेल. परिस्थिती शमी व भुवीसाठी उपयुक्त असेल तर भारतीय संघात पाच गोलंदाजांचाही समावेश राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रीडा पानावर विराट कोहलीला खेळातील डोनाल्ड ट्रम्प असल्याचे संबोधणारे वृत्त मला पचनी पडले नाही. अशा वृत्तामुळे आॅस्ट्रेलियाच्या कृष्णकृत्यांना आणखी नवे व्यासपीठ मिळणार आहे. (पीएमजी)क्रिकेट आॅस्ट्रेलिया आणि क्रिकेट जगतही या बाबीचे हकदार नाही, हे मात्र खरे. (टीसीएम) - रवी शास्त्री