शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

विराटमुळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची निवड लांबणीवर

By admin | Updated: July 10, 2017 18:33 IST

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 -  भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची निवड पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सौरव गांगलीने दिली आहे. आज मुंबईत मुख्य प्रशिक्षकपदासाठी झालेल्या मुलाखतीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्याने ही माहिती दिली. यावेळी बोलताना गांगुली म्हणाला, प्रशिक्षकासंबंधी अजून कोणताही निर्णय झालेला नाही. 2019 चा वर्ल्डकप लक्षात घेऊन नव्या कोचची निवड करण्यात येणार आहे.  2019 च्या वर्ल्डकपपर्यंत कोचबरोबरचा करार असेल. त्यामुळे भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा तात्काळ करण्याची गरज नाही, कर्णधार विराट कोहलीसह आणखी काही जणांबरोबर चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. असे सौरव गांगुलीने स्पष्ट केले. 
आज मुंबईमध्ये झालेल्या तीन सदस्यांची क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी)च्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गांगुली आणि लक्ष्मण यांनी प्रशिक्षकपदासाठीच्या थेट मुलाखती घेतल्या. तर सचिन तेंडूलकरनं स्काईपद्वारे सहभाग नोंदवला.
प्रशिक्षकपदासाठी १० व्यक्तींनी बीसीसीआयकडे अर्ज सादर केले आहेत. त्यात शास्त्री यांच्याव्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा (ओमान राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक), फिल सिमन्स आणि उपेंद्रनाथ ब्रह्मचारी (इंजिनियर, क्रिकेटची कुठलीही पार्श्वभूमी नाही) यांचा समावेश आहे. सीएसी या १०पैकी ६ उमेदवारांची मुलाखत घेतल्याचे वृत्त आहे. 
 
अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्या वादानंतर वीरेंद्र सेहवाग याचे नाव सुरुवातीला आघाडीवर होते. मात्र, रवी शास्त्री यांच्या एन्ट्रीनंतर सध्याच्या घडीला सेहवागचे नाव मागे पडताना दिसते आहे. सचिन तेंडुलकरने देखील रवी शास्री यांच्या नावाला पसंती दिली होती. यापूर्वीच्या प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीवेळी सल्लागार समिती सदस्य सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यात वाद झाले होते. त्यात आता रवी शास्त्रींना सचिनचा पाठिंबा मिळाला आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
 
विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक व माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांनी विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त आहे. कुंबळे-कोहली वादानंतर सीएसीला आपल्या पसंतीबाबत सावधगिरी बाळगावी लागेल; कारण नव्या प्रशिक्षकाला दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे.  शास्त्रीने सुरुवातीला या पदासाठी अर्ज केला नव्हता. पण बीसीसीआयने अर्ज स्वीकारण्याची मुदत ९ जुलैपर्यंत वाढविली त्या वेळी माजी कर्णधार शास्त्रीने अर्ज केला. आता शास्त्री या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कोहलीसोबतच्या चांगल्या संबंधांमुळे शास्त्री या पदासाठी सर्वांत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. शास्त्री यांच्या संचालकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने ५० षटकांच्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. शास्त्री यांच्याबाबत सौरव गांगुली यांचे मत काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शास्त्री व सौरव यांनी यापूर्वी एकमेकांवर टीका केली होती.