शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

विराटचे शतक व्यर्थ, भारत ४८ धावांनी पराभूत

By admin | Updated: December 13, 2014 13:02 IST

मुरली विजय(९९) व विराट कोहलीच्या (१४१) झुंजार खेळीनंतरही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.

 ऑनलाइन लोकमत

अॅडलेड, दि. १३ - मुरली विजय (९९) व विराट कोहलीच्या (१४१) झुंजार खेळीनंतरही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. तळाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्याने भारताचा डाव ३१५ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाच्या लिऑनने ७ बळी टिपत भारताचा डाव गुंडाळला.

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर जिंकण्यासाठी ३६४ धावांचे आव्हान ठेवले होते. धवन (९) व पुजारा (२१) पटापट बाद झाल्यानंतर मुरली विजय (९९) व विराट कोहली (१४१) यांची जोडी जमली. त्यांनी शानदार खेळ करत भारताला विजयाच्या समीप नेले. कर्णधार म्हणून पदार्पण करणा-या कोहलीने या कसोटीत दोन्ही डावात शतके ठोकली. मुरली विजयही शतकाच्या अगदी जवळ होता. मात्र ९९ धावावंर असताना लिऑनच्या चेंडूवर तो पायचीत झाला. नंतर आलेला रहाणे शून्यावर तर रोहित शर्मा ६ धावांवर बाद झाला. भारतीय फलंदाज एका पाठोपाठ तंबूत परतत असताना विराटने कर्णधाराला साजेसा खेळ करत भारताची बाजू सावरून धरली होती. मात्र तो १४१ धावांवर असताना बाद झाला व त्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. शमी (५), अॅरॉन शर्मा (१) व इशांत शर्मा( १) हे खेळाडू फक्त हजेरी लावून तंबूत परतले. भारताला विजयासाठी अवघ्या ४८ धावांची गरज असताना भारताचे सर्व फलंदाज बाद झाले व चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने खिशात टाकत १-० अशी आघाडी मिळवली.

लिऑनने ७, जॉन्सनने २ तर हॅरीसने १ बळी टिपला.