शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

टीम इंडियाच्या उंचावलेल्या क्षेत्ररक्षणाचे श्रेय विराटला : श्रीधर

By admin | Updated: December 17, 2015 01:30 IST

संघाच्या सराव सत्रामध्ये क्षेत्ररक्षण अनिवार्य करून दररोज खेळाडूंना मैदानात घाम गाळायला लावणाऱ्या टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारामुळे संघाचे क्षेत्ररक्षण उंचावले आहे. त्यामुळे

चेन्नई : संघाच्या सराव सत्रामध्ये क्षेत्ररक्षण अनिवार्य करून दररोज खेळाडूंना मैदानात घाम गाळायला लावणाऱ्या टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारामुळे संघाचे क्षेत्ररक्षण उंचावले आहे. त्यामुळे संघाच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे श्रेय कर्णधाराला द्यायलाच हवे, अशा शब्दांत टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी विराट कोहलीचे कौतुक केले. श्रीधर यांनी सांगितले, की श्रीलंका दौऱ्याआधी कोहलीने सर्वांना आदेश दिले होते, की नेहमीच्या सरावासह प्रत्येक खेळाडू दररोज किमान २० मिनिटे क्षेत्ररक्षणाचा सराव करेल. अचूक झेल टिपण्याचा सराव व्हावा हा त्यामागचा उद्देश होता. विशेष म्हणजे कोहलीची ही रणनीती सिद्ध झाली आणि आता प्रत्येक खेळाडू २० मिनिटांहून अधिक वेळ क्षेत्ररक्षणाचा सराव करतो.मागील काही महिन्यांपासून भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण कमालीचे उंचावले आहे. पूर्वीच्या तुलनेत आज भारतीय खेळाडू सूर मारून चेंडू सहजपणे झेलतात किंवा अडवतात. यामुळे भारतीय क्रिकेटसाठी हे सकारात्मक संकेत आहेत. श्रीलंका आणि नुकताच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले होते.(वृत्तसंस्था)