शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

टीम इंडियाच्या उंचावलेल्या क्षेत्ररक्षणाचे श्रेय विराटला : श्रीधर

By admin | Updated: December 17, 2015 01:30 IST

संघाच्या सराव सत्रामध्ये क्षेत्ररक्षण अनिवार्य करून दररोज खेळाडूंना मैदानात घाम गाळायला लावणाऱ्या टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारामुळे संघाचे क्षेत्ररक्षण उंचावले आहे. त्यामुळे

चेन्नई : संघाच्या सराव सत्रामध्ये क्षेत्ररक्षण अनिवार्य करून दररोज खेळाडूंना मैदानात घाम गाळायला लावणाऱ्या टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारामुळे संघाचे क्षेत्ररक्षण उंचावले आहे. त्यामुळे संघाच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे श्रेय कर्णधाराला द्यायलाच हवे, अशा शब्दांत टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी विराट कोहलीचे कौतुक केले. श्रीधर यांनी सांगितले, की श्रीलंका दौऱ्याआधी कोहलीने सर्वांना आदेश दिले होते, की नेहमीच्या सरावासह प्रत्येक खेळाडू दररोज किमान २० मिनिटे क्षेत्ररक्षणाचा सराव करेल. अचूक झेल टिपण्याचा सराव व्हावा हा त्यामागचा उद्देश होता. विशेष म्हणजे कोहलीची ही रणनीती सिद्ध झाली आणि आता प्रत्येक खेळाडू २० मिनिटांहून अधिक वेळ क्षेत्ररक्षणाचा सराव करतो.मागील काही महिन्यांपासून भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण कमालीचे उंचावले आहे. पूर्वीच्या तुलनेत आज भारतीय खेळाडू सूर मारून चेंडू सहजपणे झेलतात किंवा अडवतात. यामुळे भारतीय क्रिकेटसाठी हे सकारात्मक संकेत आहेत. श्रीलंका आणि नुकताच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले होते.(वृत्तसंस्था)