शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

विराट म्हणतो, इंग्लंडसोबत व्हावी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल

By admin | Updated: June 13, 2017 16:44 IST

भारतापाठोपाठ पाकिस्तानचा संघही उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींना अंतिम फेरीत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीचा थरार अनुभवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र

 ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 13 - इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी चॅंम्पियन्स  ट्रॉफीमधील उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत.  त्यातच भारतापाठोपाठ पाकिस्तानचा संघही उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींना अंतिम फेरीत पुन्हा एकदा  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीचा थरार अनुभवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीला मात्र पाकिस्तान नव्हे तर इंग्लंडबरोबर अंतिम लढत व्हावी, असे वाटते. 
भारतीय दूतावासाकडून लॉर्डसवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना विराट म्हणाला, "उपांत्य फेरीत तुमचा विरोधी संघ कोण आहे याला आम्ही फार महत्त्व देणार नाही. या स्पर्धेची साखळी फेरी आव्हानात्मक होती. आता आम्ही अंतिम फेरीपासून केवळ एक विजय दूर आहोत. तसेच 18 तारखेला भारत आणि इंग्लंड यांच्यातच अंतिम लढत व्हावी, अशी सर्वांची इच्छा आहे. आता दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत चांगली कामगिरी केली तर क्रिकेटप्रेमींना ही लढत पाहायला मिळेल." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य लढतीत यजमान आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने येतील. तर  दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताची गाठ बांगलादेशशी पडणार आहे. 
लॉर्डसवर भारतीय दूतावासाने टीम इंडियासाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमासाठी कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे उपस्थित होते. " भारताच्या प्रत्येक सामन्याला क्रिकेटप्रेमींची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती पाहिली की बरे वाटते. वातावरण चांगले असेल तर क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडपेक्षा चांगली जागा दुसरी असू शकत नाही. सध्या येथे चेंडू नेहमीप्रमाणे स्विंग होत नाही आहे, पण ढगाळ वातावरण असले की फलंदाजी करणे कठीण होत आहे. इंग्लंडमध्ये फलंदाज म्हणून तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागतो," असेही विराटने यावेळी सांगितले.