शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

विराटचा धोनीवर ‘छुपा हल्ला’

By admin | Updated: June 26, 2015 01:20 IST

टीम इंडियाच्या निर्णयक्षमतेतील विश्वासाचा अभाव तसेच स्पष्टपणाची उणीव आणि मैदानावर खेळाडू मनमोकळेपणाने व आत्मविश्वासाने खेळताना दिसत नव्हते,

मिरपूर : टीम इंडियाच्या निर्णयक्षमतेतील विश्वासाचा अभाव तसेच स्पष्टपणाची उणीव आणि मैदानावर खेळाडू मनमोकळेपणाने व आत्मविश्वासाने खेळताना दिसत नव्हते, असा आरोप करून भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने सनसनाटी निर्माण केली आहे. त्याचा हा आरोप म्हणजे संकटात सापडलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर छुपा हल्ला मानला जातो.महेंद्रसिंह धोनी याने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर कसोटी कर्णधार बनविण्यात आलेल्या कोहलीने कुणाचेही नाव न घेता हा आरोप केला. निर्णय घेण्यासंबंधी उच्चारलेल्या आपल्या वक्तव्याचाही त्याने सविस्तर उलगडा केला नाही. काल उशिरा रात्री तो म्हणाला, ‘‘बांगलादेशाने खरे तर फार सुरेख खेळ केला. प्रामाणिकपणे सांगायचे तर मैदानावर निर्णय घेण्यात आमच्यात विश्वासाचा अभाव जाणवला. पहिल्या दोन्ही सामन्यांत विजयाच्या मानसिकतेसह आम्ही खेळलोच नाही. मला एका मुलाखतीत या गोष्टी सांगायची गरज नाहीच. क्रिकेट जाणणारे आणि तज्ज्ञ या बाबी समजू शकतात. खेळाडू आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करण्यास पूर्णपणे सज्ज नव्हते.’’कोहलीचे हे वक्तव्य आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनच्या वक्तव्याच्या एक दिवसानंतर आले. आश्विनने कर्णधारासाठी जीव देण्याचीही तयारी दर्शविली होती. अन्य एक ज्येष्ठ खेळाडू सुरेश रैना याने धोनीला पाठिंबा दिला. कोहलीच्या वक्तव्याने वन डे संघात फुटीची ठिणगी पाडल्याचे मानले जात आहे. चेन्नई सुपरकिंग्सचे खेळाडू धोनीला पाठिंबा दर्शवीत आहेत. तथापि, कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडल्याचा इन्कार केला. तो म्हणाला, ‘‘ड्रेसिंग रूमचा माहोल आधीसारखाच आहे. आम्ही काही सामने गमावले खरे; पण अधिकाधिक सामने जिंकलेदेखील आहेत.’’ (वृत्तसंस्था)