शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

विराटचा धोनीवर ‘छुपा हल्ला’

By admin | Updated: June 26, 2015 01:20 IST

टीम इंडियाच्या निर्णयक्षमतेतील विश्वासाचा अभाव तसेच स्पष्टपणाची उणीव आणि मैदानावर खेळाडू मनमोकळेपणाने व आत्मविश्वासाने खेळताना दिसत नव्हते,

मिरपूर : टीम इंडियाच्या निर्णयक्षमतेतील विश्वासाचा अभाव तसेच स्पष्टपणाची उणीव आणि मैदानावर खेळाडू मनमोकळेपणाने व आत्मविश्वासाने खेळताना दिसत नव्हते, असा आरोप करून भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने सनसनाटी निर्माण केली आहे. त्याचा हा आरोप म्हणजे संकटात सापडलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर छुपा हल्ला मानला जातो.महेंद्रसिंह धोनी याने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर कसोटी कर्णधार बनविण्यात आलेल्या कोहलीने कुणाचेही नाव न घेता हा आरोप केला. निर्णय घेण्यासंबंधी उच्चारलेल्या आपल्या वक्तव्याचाही त्याने सविस्तर उलगडा केला नाही. काल उशिरा रात्री तो म्हणाला, ‘‘बांगलादेशाने खरे तर फार सुरेख खेळ केला. प्रामाणिकपणे सांगायचे तर मैदानावर निर्णय घेण्यात आमच्यात विश्वासाचा अभाव जाणवला. पहिल्या दोन्ही सामन्यांत विजयाच्या मानसिकतेसह आम्ही खेळलोच नाही. मला एका मुलाखतीत या गोष्टी सांगायची गरज नाहीच. क्रिकेट जाणणारे आणि तज्ज्ञ या बाबी समजू शकतात. खेळाडू आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करण्यास पूर्णपणे सज्ज नव्हते.’’कोहलीचे हे वक्तव्य आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनच्या वक्तव्याच्या एक दिवसानंतर आले. आश्विनने कर्णधारासाठी जीव देण्याचीही तयारी दर्शविली होती. अन्य एक ज्येष्ठ खेळाडू सुरेश रैना याने धोनीला पाठिंबा दिला. कोहलीच्या वक्तव्याने वन डे संघात फुटीची ठिणगी पाडल्याचे मानले जात आहे. चेन्नई सुपरकिंग्सचे खेळाडू धोनीला पाठिंबा दर्शवीत आहेत. तथापि, कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडल्याचा इन्कार केला. तो म्हणाला, ‘‘ड्रेसिंग रूमचा माहोल आधीसारखाच आहे. आम्ही काही सामने गमावले खरे; पण अधिकाधिक सामने जिंकलेदेखील आहेत.’’ (वृत्तसंस्था)