शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

तमिळनाडूने जिंकला विजय हजारे करंडक

By admin | Updated: March 21, 2017 01:02 IST

सीनिअर फलंदाज दिनेश कार्तिकच्या शानदार शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर

नवी दिल्ली : सीनिअर फलंदाज दिनेश कार्तिकच्या शानदार शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर तमिळनाडूने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बंगालवर ३७ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत तमिळनाडूने बंगालवर अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा विजय मिळवला. याआधी तमिळनाडूने २00८-0९ आणि २00९-१0 मध्येदेखील बंगालवर मात केली होती.तमिळनाडूने ४७.२ षटकांत २१७ धावा केल्या. यात कार्तिकच्या सुरेख ११२ खेळींचा समावेश होता. दिनेश कार्तिकने त्याच्या शतकी खेळीत १४ चौकार मारले. बंगालकडून मोहम्मद शमीने २६ धावांत ४, तर अशोक दिंडाने ३६ धावांत ३ गडी बाद केले. त्यानंतर तमिळनाडूने बंगाल संघाला १८0 धावांत गुंडाळले. आॅफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर याला बळी मिळाला नाही; परंतु त्याने खूपच किफायती गोलंदाजी करताना फक्त १७ धावा दिल्या. श्रीवत्स गोस्वामी (२३) आणि अभिमन्यू ईश्वरन (१) स्वस्तात बाद झाले. कर्णधार मनोज तिवारी फक्त ३२ धावाच करू शकला. त्याला विजय शंकरने त्रिफळाबाद केले. सुदीप चॅटर्जी (५८) आणि अनुस्तुप मजुमदार (२४) यांनी पाचव्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी करीत झुंज देण्याचा प्रयत्न केला; परंतु ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही.संक्षिप्त धावफलक : तमिळनाडू : ४७.२ षटकांत सर्वबाद २१७. (दिनेश कार्तिक ११२, बाबा इंद्रजित ३२, वॉशिंग्टन सुंदर २२. मोहंमद शमी ४/२६, अशोक दिंडा ३/३६). बंगाल : ४५.५ षटकांत सर्वबाद १८0. (सुदीप चॅटर्जी ५८, मनोज तिवारी ३२, अनुस्तुप मजुमदार २४, ए. गनी २४. अश्विन क्रिस्ट २/२३, एम. मोहंमद २/३0, राहिल शहा २/३८).