शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तमिळनाडूने जिंकला विजय हजारे करंडक

By admin | Updated: March 21, 2017 01:02 IST

सीनिअर फलंदाज दिनेश कार्तिकच्या शानदार शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर

नवी दिल्ली : सीनिअर फलंदाज दिनेश कार्तिकच्या शानदार शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर तमिळनाडूने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बंगालवर ३७ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत तमिळनाडूने बंगालवर अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा विजय मिळवला. याआधी तमिळनाडूने २00८-0९ आणि २00९-१0 मध्येदेखील बंगालवर मात केली होती.तमिळनाडूने ४७.२ षटकांत २१७ धावा केल्या. यात कार्तिकच्या सुरेख ११२ खेळींचा समावेश होता. दिनेश कार्तिकने त्याच्या शतकी खेळीत १४ चौकार मारले. बंगालकडून मोहम्मद शमीने २६ धावांत ४, तर अशोक दिंडाने ३६ धावांत ३ गडी बाद केले. त्यानंतर तमिळनाडूने बंगाल संघाला १८0 धावांत गुंडाळले. आॅफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर याला बळी मिळाला नाही; परंतु त्याने खूपच किफायती गोलंदाजी करताना फक्त १७ धावा दिल्या. श्रीवत्स गोस्वामी (२३) आणि अभिमन्यू ईश्वरन (१) स्वस्तात बाद झाले. कर्णधार मनोज तिवारी फक्त ३२ धावाच करू शकला. त्याला विजय शंकरने त्रिफळाबाद केले. सुदीप चॅटर्जी (५८) आणि अनुस्तुप मजुमदार (२४) यांनी पाचव्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी करीत झुंज देण्याचा प्रयत्न केला; परंतु ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही.संक्षिप्त धावफलक : तमिळनाडू : ४७.२ षटकांत सर्वबाद २१७. (दिनेश कार्तिक ११२, बाबा इंद्रजित ३२, वॉशिंग्टन सुंदर २२. मोहंमद शमी ४/२६, अशोक दिंडा ३/३६). बंगाल : ४५.५ षटकांत सर्वबाद १८0. (सुदीप चॅटर्जी ५८, मनोज तिवारी ३२, अनुस्तुप मजुमदार २४, ए. गनी २४. अश्विन क्रिस्ट २/२३, एम. मोहंमद २/३0, राहिल शहा २/३८).