शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

VIDEO - लोकांच्या अपेक्षांची कल्पना आहे, मागचे रेकॉर्ड महत्वाचे नाहीत - विराट कोहली

By admin | Updated: June 17, 2017 18:44 IST

देशावासियांना आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचे ओझे कसे हाताळायचे ते आम्हाला चांगले ठाऊक आहे असे कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 17 - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या पाकिस्तान विरुद्ध होणा-या फायनलसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून, देशावासियांना आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचे ओझे कसे हाताळायचे ते आम्हाला चांगले ठाऊक आहे असे कर्णधार विराट कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या काहीवर्षांपासून मी या परिस्थितीतून जातोय. जेव्हा तुम्ही मैदानावर उतरता तेव्हा या गोष्टी तुमच्या डोक्यात नसतात असे कोहलीने सांगितले. 
 
लोकांना आमच्याकडून अपेक्षा असणार. आम्ही प्रत्येकवेळी चांगली कामगिरी करावी अशी लोकांची अपेक्षा असते. पण प्रत्येकवेळी हे शक्य नाही हे खेळाडू म्हणून मला समजते. मैदानावर काही गोष्टी घडतात काही घडत नाहीत हे समजून घेतले पाहिजे. मैदानावर जी कामगिरी करायचीय त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे विराट म्हणाला. 
 
लोकांच्या अपेक्षांचा कसा सामना करायचा त्यावर तुम्ही मार्ग शोधला पाहिजे. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत. तुम्हाला त्यात संतुलन राखता आले पाहिजे असे कोहली म्हणाला. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले असले तरी, मागची कामगिरी जास्त महत्वाची ठरत नाही असे विराट म्हणाला. 
 
काही संघ आत्मविश्वासाने सुरुवात करतात. काही संघ जोरदार पुनरागमन करतात. पाकिस्तानने अशीच जोरदाप पुनरागमनाची कामगिरी केली आहे असे विराट म्हणाला. त्यांचा दिवस असेल तर ते कोणालाही पराभूत करु शकतात. पण आमचा आमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. 
 
दोन्ही संघांना चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची आहे, उद्या सर्व खेळाडूंचा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. ठराविक एक विचार डोक्यात ठेऊन आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळतोय, आम्ही तशाच प्रकारचे क्रिकेट अंतिम सामन्यातही खेळू  असे विराट म्हणाला. पाकिस्तान विरुद्धच्या हॉकी सामन्यासाठी विराट कोहलीने भारतीय हॉकी संघाला दिल्या शुभेच्छा.