शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

युवीची फटकेबाजी अन् पाकिस्तानचे सरेंडर!

By admin | Updated: June 5, 2017 06:21 IST

अखेर आयसीसी चँम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानला हरवले

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
अखेर आयसीसी चँम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानला हरवले. खरंतर पाकिस्तानचा संघ या लढतीत जिंकला नाही तरी भारताला कडवी टक्कर देईल, अशी अपेक्षा होती. पण विराटसेनेसमोर त्यांनी सरेंडर केले. सपशेल शरणागती पत्करली. 
या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आज भारताची फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानची गोलंदाजी अशी लढत होईल, अशी चर्चा होती. त्यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यावर सुरुवातीची दोनचार षटके तरी तसे वाटले. पण आधी धवन-रोहित आणि नंतर युवराज, कोहली आणि पांड्याने त्यांच्या गोलंदाजीचा पार पालापाचोळा केला.
खरंतर पावसामुळे ओलसर झालेली खेळपट्टी आणि ढगाळ वातावरण अशी वेगवान गोलंदाजीसाठी आदर्श परिस्थिती मैदानात होती. म्हणूनच की काय, शतकी सलामी दिली तरी धवन, रोहित आणि नंतर कोहली बराच काळ दबकून खेळले. धावगतीचा काटा काही केल्या साडेपाचच्या वर जात नव्हता. अशा परिस्थितीत भारताच्या डावाला कलाटणी दिली ती युवराज सिंगने. मिळालेल्या एका जिवदानाचा पूरेपूर फायदा उठवत त्याने पाकिस्तानी गोलंदाजीवर केलेला प्रतिहल्ला भारताच्या डावाला आणि सामन्याला कलाटणी देऊन गेला. युवीच्या फटकेबाजीमुळे भांबावलेल्या पाकिस्तानला हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीने पुरते दबावाखाली आणले.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग कळताना एकीकडे रिमझिम बरसणारा पाऊस आणि डकवर्थ/लुईसचे गणित यामुळे पाकिस्तानचा डाव कोलमडला. आघाडीची फळी कोसळल्यावर पाकिस्तानचे उर्वरित फलंदाज धावगतीच्या वाढत्या दबावाखाली दबून गेले. अखेर पावणे दोनशेच्या आतच त्यांचे काम तमाम झाले. आयसीसीच्या जागतिक स्पर्धेत भारतीय संघाच्या नावावर पाकिस्तानविरुद्धच्या अजून एका संस्मरणीय विजयाची नोंद झाली. आता आपल्या पुढच्या लढतीला चार दिवसांचा अवधी आहे. तोपर्यंत आपण पाकिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करूया.