शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

युवीची फटकेबाजी अन् पाकिस्तानचे सरेंडर!

By admin | Updated: June 5, 2017 06:21 IST

अखेर आयसीसी चँम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानला हरवले

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
अखेर आयसीसी चँम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानला हरवले. खरंतर पाकिस्तानचा संघ या लढतीत जिंकला नाही तरी भारताला कडवी टक्कर देईल, अशी अपेक्षा होती. पण विराटसेनेसमोर त्यांनी सरेंडर केले. सपशेल शरणागती पत्करली. 
या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आज भारताची फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानची गोलंदाजी अशी लढत होईल, अशी चर्चा होती. त्यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यावर सुरुवातीची दोनचार षटके तरी तसे वाटले. पण आधी धवन-रोहित आणि नंतर युवराज, कोहली आणि पांड्याने त्यांच्या गोलंदाजीचा पार पालापाचोळा केला.
खरंतर पावसामुळे ओलसर झालेली खेळपट्टी आणि ढगाळ वातावरण अशी वेगवान गोलंदाजीसाठी आदर्श परिस्थिती मैदानात होती. म्हणूनच की काय, शतकी सलामी दिली तरी धवन, रोहित आणि नंतर कोहली बराच काळ दबकून खेळले. धावगतीचा काटा काही केल्या साडेपाचच्या वर जात नव्हता. अशा परिस्थितीत भारताच्या डावाला कलाटणी दिली ती युवराज सिंगने. मिळालेल्या एका जिवदानाचा पूरेपूर फायदा उठवत त्याने पाकिस्तानी गोलंदाजीवर केलेला प्रतिहल्ला भारताच्या डावाला आणि सामन्याला कलाटणी देऊन गेला. युवीच्या फटकेबाजीमुळे भांबावलेल्या पाकिस्तानला हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीने पुरते दबावाखाली आणले.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग कळताना एकीकडे रिमझिम बरसणारा पाऊस आणि डकवर्थ/लुईसचे गणित यामुळे पाकिस्तानचा डाव कोलमडला. आघाडीची फळी कोसळल्यावर पाकिस्तानचे उर्वरित फलंदाज धावगतीच्या वाढत्या दबावाखाली दबून गेले. अखेर पावणे दोनशेच्या आतच त्यांचे काम तमाम झाले. आयसीसीच्या जागतिक स्पर्धेत भारतीय संघाच्या नावावर पाकिस्तानविरुद्धच्या अजून एका संस्मरणीय विजयाची नोंद झाली. आता आपल्या पुढच्या लढतीला चार दिवसांचा अवधी आहे. तोपर्यंत आपण पाकिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करूया.