शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

अखेर उपविजेतेपद ...

By admin | Updated: February 15, 2016 03:28 IST

संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या बलाढ्य भारतीय संघावर अंतिम सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे अखेर १९ वर्षांखालील विश्वचषक गमवावा लागल्याची नामुष्की ओढावली

१९ वर्षांखालील विश्वचषक : विंडीजविरुद्ध भारताचा धक्कादायक पराभव

मीरपूर : संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या बलाढ्य भारतीय संघावर अंतिम सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे अखेर १९ वर्षांखालील विश्वचषक गमवावा लागल्याची नामुष्की ओढावली. वेस्ट इंडीजने टिच्चून मारा करताना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाला केवळ १४५ धावांत गारद केले. यानंतर आवश्यक धाव ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार करून वेस्ट इंडीजने पहिल्यांदाच युवा विश्वचषकावर शिक्कामोर्तब केले. शेर-ए -बांगला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीची संधी दिली. सकाळच्या गोलंदाजीला पोषक वातावरणाचा फायदा घेत वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी अचूक मारा करताना भारताचा डाव १४५ धावांत संपुष्टात आणून अर्धी लढाई जिंकली. भारताकडून सरफराजने एकाकी झुंज देताना संयमी ५१ धावांची खेळी केली. अलझारी जोसेफ आणि रायन जॉन यांनी भेदक मारा करताना प्रत्येकी ३ बळी घेत भारतीयांना रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.यानंतर धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची आघाडीची फळीही ढेपाळली. भारतीयांनी सहजा सहजी हार न पत्करता सामना अखेरच्या षटकांपर्यंत नेला; मात्र ३ चेंडू शिल्लक राखून विंडीजने बाजी मारली. मयांक डागरने ३ बळी घेत विंडीजला जखडवून ठेवले, तर अवेश खान व खलील अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन त्याला चांगली साथ दिली. वेस्ट इंडीजने आपला अर्धा संघ ७७ धावांवर गमावला होता. यावेळी सामना भारतीयांच्या हातात होता. मात्र, केसी कर्टी (१२५ चेंडंूत नाबाद ५२) आणि किमो पॉल (६८ चेंडंूत नाबाद ४०) यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ६९ धावांची निर्णयाक भागीदारी करून भारतीयांच्या हातातील विजेतेपद हिसकावून घेतले. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताचे सर्वच प्रमुख फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ॠषभ पंत, कर्णधार इशान किशन, अनमोलप्रीत सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि अरमान जाफर हे सर्वच प्रमुख फलंदाज एकेरी धावसंख्येत बाद झाले; मात्र सर्फराझने एकाकी झुंज देताना ८९ चेंडंूत ५ चौकार व एका षटकारासह ५१ धावांची खेळी केली. महिपाल लोमरोर (१९) आणि राहुल बाथम (२१) यांनी केलेल्या उपयुक्त खेळीमुळे भारताला शंभरी पार करता आली. संक्षिप्त धावफलक :भारत : ५० षटकांत सर्वबाद १४५ धावा (सरफराझ खान ५१, राहुल बाथम २१; रायन जॉन ३/३८; अलझारी जोसेफ ३/३९) पराभूत वि. वेस्ट इंडीज (केसी कर्टी नाबाद ५२, किमो पॉल नाबाद ४०; मयांक डागर ३/२५)