शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

दोन अर्धशतकांमुळे आत्मविश्वास उंचावला

By admin | Updated: September 3, 2015 22:49 IST

श्रीलंका दौऱ्यात मोक्याच्या क्षणी सलग दोन अर्धशतके ठोकल्यानंतर आत्मविश्वासात भर पडली. याचा लाभ द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत निश्चितपणे होईल

नवी दिल्ली : श्रीलंका दौऱ्यात मोक्याच्या क्षणी सलग दोन अर्धशतके ठोकल्यानंतर आत्मविश्वासात भर पडली. याचा लाभ द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत निश्चितपणे होईल, असा विश्वास यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याने व्यक्त केला आहे.रिद्धिमान जखमी झाल्यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत नमन ओझाने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. रिद्धमान आता बरा झाला असून, आफ्रिकेविरुद्ध संघात स्थान मिळण्याची त्याला अपेक्षा आहे. तो म्हणाला, की आफ्रिकेविरुद्ध मालिकेस दोन महिन्यांचा अवधी आहे. त्याआधी बंगालकडून रणजी सामने खेळेन. फिजियोचा सल्ला घेताच खेळायला सुरुवात करणार आहे. गालेतील पी सारा स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या दोन्ही सामन्यांत रिद्धिमानने ६० आणि ५६ धावा ठोकल्या. या धावा त्याने विपरीत परिस्थितीत ठोकल्या हे विशेष.सिलिगुडी येथे वास्तव्य करणारा ३० वर्षांचा रिद्धिमान सात कसोटी सामने खेळला, त्यात त्याच्या २८४ धावा आहेत. आतापर्यंतच्या प्रवासात माझ्यामते रेयॉन हॅरिस हा मला सर्वांत चांगला गोलंदाज वाटल्याचे त्याने सांगितले. यष्टिरक्षणातील स्वत:च्या भूमिकेबद्दल आनंदी असलेला हा खेळाडू पुढे म्हणाला,‘‘लंकेत यष्टिरक्षण करताना मजा आली. चौथ्या आणि पाचव्या दिवशी तेथील खेळपट्ट्यांवर जो वेग पाहायला मिळाला त्यामुळे मी भारावून गेलो.’’अखेरच्या कसोटीत नमन ओझा खेळल्याने तुझ्यावर दडपण आहे काय, असा सवाल करताच रिद्धिमान म्हणाला,‘‘मी किंवा नमन दोघांनीही सर्वोत्तम योगदान दिले. भारताला विजय मिळाला. कोण खेळेल हे निश्चित करण्याची जबाबदारी आमच्या दोघांचीही नाही. चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी मात्र आमची आहे.’’ (वृत्तसंस्था)