शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

‘काँटे की टक्कर’ होणार

By admin | Updated: March 23, 2017 23:34 IST

धरमशाळा येथे होणारा भारत - आॅस्टे्रलियादरम्यानचा चौथा कसोटी सामना निर्णायक ठरणार

धरमशाळा येथे होणारा भारत - आॅस्टे्रलियादरम्यानचा चौथा कसोटी सामना निर्णायक ठरणार असून, हा सामना नव्या मैदानावर खेळवला जात असल्याने खेळपट्टी कशी असेल, याचा अंदाज कोणालाही लावता येणार नाही. तरी, सर्वांच्या मते येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देईल. येथील वातावरणही वेगवान गोलंदाजांना पूरक आहे; तसेच आतापर्यंत ज्यांनी ही खेळपट्टी पाहिली त्यांचे म्हणणे आहे की, येथे अजून गवत आहे. तसेच, जरी गवत कमी केले, तरी कमीत कमी पहिले एक - दोनतास ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल. त्यामुळे एकूणच थोडीफार का होईना; पण या सामन्याची स्थिती आॅस्टे्रलियाच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज आहे. कदाचित यामुळेच भारतीय चमूमध्ये मोहम्मद शमीची वर्णी लागली आहे. तो खेळेल की नाही ही नंतरची बातमी असेल; परंतु भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज खेळवेल असेच चित्र आहे. शिवाय, मोठी कसोटी असल्याने एका फलंदाजाला बसवून एक अतिरिक्त गोलंदाज खेळविण्यात येऊ शकतो. त्याचवेळी, एका फलंदाजाला बसवण्याचा अर्थ म्हणजे, संघाची फलंदाजी काहीप्रमाणात कमजोर होईल. त्यामुळेच, या मालिकेत आतापर्यंत लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली फलंदाजी करणे आवश्यक ठरणार आहे. दुसरीकडे, आॅस्टे्रलियाचा विचार करता त्यांना विजय मिळवण्याचा आत्मविश्वास असेल. त्यांनी ज्याप्रकारे रांची सामना अनिर्णीत राखला, ते पाहता त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असणार. त्यांची फलंदाजी खास करून स्टीव्ह स्मिथ चांगले फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजांनीदेखील मिशेल स्टार्कची कमतरता भासू दिलेली नाही. त्याचवेळी वेगात मारा करण्याची आणि उसळी देण्याची क्षमता असलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स भारतीयांची डोकेदुखी ठरू शकतो. त्यामुळे माझ्यामते, आॅस्टे्रलियादेखील आणखी एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवू शकतो, असे दिसत आहे. दोन फिरकी गोलंदाजांपैकी एकाला बसवून बर्डला अंतिम संघात स्थान मिळू शकते. पण, मला वाटते की मालिकेत आॅस्टे्रलिया अंडरडॉग राहिले आहेत आणि खेळदेखील तोडीस तोड झालेला आहे. याकडे पाहता निर्णायक सामन्यात कांगारू आपल्याला संभाव्य विजेता बघत असेल. कारण, भारतीय संघावर दडपण असेल. शिवाय, मालिकेतील कोहली - स्मिथ प्रकरण व इतर वादाकडे पाहता, सामना एकप्रकारे वेगळ्या स्तरावर जातो. यामुळे खेळाडू चांगली कामगिरी करतातच, त्याचबरोबर त्यांच्यावर अतिरिक्त दबावही येतो. त्यामुळे, या कसोटीत भारताला काहीसे सावधपणे खेळावे लागेल. त्यामुळे या सामन्यात निश्चितच ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल.