शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

‘काँटे की टक्कर’ होणार

By admin | Updated: March 23, 2017 23:34 IST

धरमशाळा येथे होणारा भारत - आॅस्टे्रलियादरम्यानचा चौथा कसोटी सामना निर्णायक ठरणार

धरमशाळा येथे होणारा भारत - आॅस्टे्रलियादरम्यानचा चौथा कसोटी सामना निर्णायक ठरणार असून, हा सामना नव्या मैदानावर खेळवला जात असल्याने खेळपट्टी कशी असेल, याचा अंदाज कोणालाही लावता येणार नाही. तरी, सर्वांच्या मते येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देईल. येथील वातावरणही वेगवान गोलंदाजांना पूरक आहे; तसेच आतापर्यंत ज्यांनी ही खेळपट्टी पाहिली त्यांचे म्हणणे आहे की, येथे अजून गवत आहे. तसेच, जरी गवत कमी केले, तरी कमीत कमी पहिले एक - दोनतास ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल. त्यामुळे एकूणच थोडीफार का होईना; पण या सामन्याची स्थिती आॅस्टे्रलियाच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज आहे. कदाचित यामुळेच भारतीय चमूमध्ये मोहम्मद शमीची वर्णी लागली आहे. तो खेळेल की नाही ही नंतरची बातमी असेल; परंतु भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज खेळवेल असेच चित्र आहे. शिवाय, मोठी कसोटी असल्याने एका फलंदाजाला बसवून एक अतिरिक्त गोलंदाज खेळविण्यात येऊ शकतो. त्याचवेळी, एका फलंदाजाला बसवण्याचा अर्थ म्हणजे, संघाची फलंदाजी काहीप्रमाणात कमजोर होईल. त्यामुळेच, या मालिकेत आतापर्यंत लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली फलंदाजी करणे आवश्यक ठरणार आहे. दुसरीकडे, आॅस्टे्रलियाचा विचार करता त्यांना विजय मिळवण्याचा आत्मविश्वास असेल. त्यांनी ज्याप्रकारे रांची सामना अनिर्णीत राखला, ते पाहता त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असणार. त्यांची फलंदाजी खास करून स्टीव्ह स्मिथ चांगले फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजांनीदेखील मिशेल स्टार्कची कमतरता भासू दिलेली नाही. त्याचवेळी वेगात मारा करण्याची आणि उसळी देण्याची क्षमता असलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स भारतीयांची डोकेदुखी ठरू शकतो. त्यामुळे माझ्यामते, आॅस्टे्रलियादेखील आणखी एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवू शकतो, असे दिसत आहे. दोन फिरकी गोलंदाजांपैकी एकाला बसवून बर्डला अंतिम संघात स्थान मिळू शकते. पण, मला वाटते की मालिकेत आॅस्टे्रलिया अंडरडॉग राहिले आहेत आणि खेळदेखील तोडीस तोड झालेला आहे. याकडे पाहता निर्णायक सामन्यात कांगारू आपल्याला संभाव्य विजेता बघत असेल. कारण, भारतीय संघावर दडपण असेल. शिवाय, मालिकेतील कोहली - स्मिथ प्रकरण व इतर वादाकडे पाहता, सामना एकप्रकारे वेगळ्या स्तरावर जातो. यामुळे खेळाडू चांगली कामगिरी करतातच, त्याचबरोबर त्यांच्यावर अतिरिक्त दबावही येतो. त्यामुळे, या कसोटीत भारताला काहीसे सावधपणे खेळावे लागेल. त्यामुळे या सामन्यात निश्चितच ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल.