शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

‘काँटे की टक्कर’ होणार

By admin | Updated: March 23, 2017 23:34 IST

धरमशाळा येथे होणारा भारत - आॅस्टे्रलियादरम्यानचा चौथा कसोटी सामना निर्णायक ठरणार

धरमशाळा येथे होणारा भारत - आॅस्टे्रलियादरम्यानचा चौथा कसोटी सामना निर्णायक ठरणार असून, हा सामना नव्या मैदानावर खेळवला जात असल्याने खेळपट्टी कशी असेल, याचा अंदाज कोणालाही लावता येणार नाही. तरी, सर्वांच्या मते येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देईल. येथील वातावरणही वेगवान गोलंदाजांना पूरक आहे; तसेच आतापर्यंत ज्यांनी ही खेळपट्टी पाहिली त्यांचे म्हणणे आहे की, येथे अजून गवत आहे. तसेच, जरी गवत कमी केले, तरी कमीत कमी पहिले एक - दोनतास ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल. त्यामुळे एकूणच थोडीफार का होईना; पण या सामन्याची स्थिती आॅस्टे्रलियाच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज आहे. कदाचित यामुळेच भारतीय चमूमध्ये मोहम्मद शमीची वर्णी लागली आहे. तो खेळेल की नाही ही नंतरची बातमी असेल; परंतु भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज खेळवेल असेच चित्र आहे. शिवाय, मोठी कसोटी असल्याने एका फलंदाजाला बसवून एक अतिरिक्त गोलंदाज खेळविण्यात येऊ शकतो. त्याचवेळी, एका फलंदाजाला बसवण्याचा अर्थ म्हणजे, संघाची फलंदाजी काहीप्रमाणात कमजोर होईल. त्यामुळेच, या मालिकेत आतापर्यंत लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली फलंदाजी करणे आवश्यक ठरणार आहे. दुसरीकडे, आॅस्टे्रलियाचा विचार करता त्यांना विजय मिळवण्याचा आत्मविश्वास असेल. त्यांनी ज्याप्रकारे रांची सामना अनिर्णीत राखला, ते पाहता त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असणार. त्यांची फलंदाजी खास करून स्टीव्ह स्मिथ चांगले फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजांनीदेखील मिशेल स्टार्कची कमतरता भासू दिलेली नाही. त्याचवेळी वेगात मारा करण्याची आणि उसळी देण्याची क्षमता असलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स भारतीयांची डोकेदुखी ठरू शकतो. त्यामुळे माझ्यामते, आॅस्टे्रलियादेखील आणखी एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवू शकतो, असे दिसत आहे. दोन फिरकी गोलंदाजांपैकी एकाला बसवून बर्डला अंतिम संघात स्थान मिळू शकते. पण, मला वाटते की मालिकेत आॅस्टे्रलिया अंडरडॉग राहिले आहेत आणि खेळदेखील तोडीस तोड झालेला आहे. याकडे पाहता निर्णायक सामन्यात कांगारू आपल्याला संभाव्य विजेता बघत असेल. कारण, भारतीय संघावर दडपण असेल. शिवाय, मालिकेतील कोहली - स्मिथ प्रकरण व इतर वादाकडे पाहता, सामना एकप्रकारे वेगळ्या स्तरावर जातो. यामुळे खेळाडू चांगली कामगिरी करतातच, त्याचबरोबर त्यांच्यावर अतिरिक्त दबावही येतो. त्यामुळे, या कसोटीत भारताला काहीसे सावधपणे खेळावे लागेल. त्यामुळे या सामन्यात निश्चितच ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल.