शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

तिसरी कसोटी अनिर्णीत, भारताने मालिका गमावली

By admin | Updated: December 30, 2014 13:17 IST

भारत वि. ऑस्ट्रेलियादरम्यानची तिसरी कसोटी अनिर्णीत राहिली असून चार कसोटी सामन्यांची मालिका भारताने गमावली आहे.

ऑनलाइन लोकमत

मेलबर्न, दि. ३० - ऑस्ट्रेलियाच्या ३८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्याने ही कसोटी अनिर्णीत राहिली असून भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका गमावल्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. दुस-या डावात विराट कोहली ( ५४) आणि अजिंक्य रहाणे (४८) यांनी चांगली खेळी करत भारताचा डाव सावरायचा प्रयत्न केला खरा मात्र इतर फलंदाजांची पुरेशी साथ न मिळाल्याने ही कसोटी अनिर्णित राहिली. ऑस्ट्रेलियातर्फे जॉन्सन, हॅरिस व हेझलवूडने प्रत्येकी २ बळी टिपले. 
पहिले दोन कसोटी सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. तिसरा सामना जिंकून मालिकेत आव्हान कायम राखण्याची संधी भारताकडे होती, मात्र त्यांनी ती गमावली. ऑस्ट्रेलियाच्या ३८४ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीचे फलंदाज  विजय (११), शिखर धवन (०) , के.एल.राहुल (१ ) पटापट तंबूत परतले. त्यानंतर कोहलीने रहाणेच्या साथीने चांगला खेळ केला. मात्र ते दोघे बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी मंदावली. भरवशाचा पुजाराही २१ धावांवर बाद झाल्याने भारताच्या विजयाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. पाचव्या दिवसाचा खेळ संपायला अवघा काही वेळ उरलेला असताना कर्णधार धोनी (नाबाद २४) फलंदाजीस आला, मात्र तो भारताला विजयाच्या समीप नेऊ शकला नाही. अखेर खेळ संपताना भारताने ६ गडी गमावत १७४ केल्या आणि कसोटी अनिर्णीत राहिली.
शॉन मार्श (९९) आणि रॉजर्सच्या (६९) खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर जिंकण्यासाठी ३८४ धावांचे आव्हान ठेवले. तळाच्या फलंदाजांची चिवट खेळी व भारतीय गोलंदाजांचे अपयश यामुळे ऑस्ट्रेलियाने दुस-या डावातही मोठी धावसंख्या उभारली. 
तिस-या कसोटीत एकूण ६ बळी टिपणा-या हॅरिसला 'मॅन ऑफ दि मॅच'चा पुरस्कार देण्यात आला.