शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

तिसरी कसोटी अनिर्णीत, भारताने मालिका गमावली

By admin | Updated: December 30, 2014 13:17 IST

भारत वि. ऑस्ट्रेलियादरम्यानची तिसरी कसोटी अनिर्णीत राहिली असून चार कसोटी सामन्यांची मालिका भारताने गमावली आहे.

ऑनलाइन लोकमत

मेलबर्न, दि. ३० - ऑस्ट्रेलियाच्या ३८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्याने ही कसोटी अनिर्णीत राहिली असून भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका गमावल्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. दुस-या डावात विराट कोहली ( ५४) आणि अजिंक्य रहाणे (४८) यांनी चांगली खेळी करत भारताचा डाव सावरायचा प्रयत्न केला खरा मात्र इतर फलंदाजांची पुरेशी साथ न मिळाल्याने ही कसोटी अनिर्णित राहिली. ऑस्ट्रेलियातर्फे जॉन्सन, हॅरिस व हेझलवूडने प्रत्येकी २ बळी टिपले. 
पहिले दोन कसोटी सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. तिसरा सामना जिंकून मालिकेत आव्हान कायम राखण्याची संधी भारताकडे होती, मात्र त्यांनी ती गमावली. ऑस्ट्रेलियाच्या ३८४ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीचे फलंदाज  विजय (११), शिखर धवन (०) , के.एल.राहुल (१ ) पटापट तंबूत परतले. त्यानंतर कोहलीने रहाणेच्या साथीने चांगला खेळ केला. मात्र ते दोघे बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी मंदावली. भरवशाचा पुजाराही २१ धावांवर बाद झाल्याने भारताच्या विजयाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. पाचव्या दिवसाचा खेळ संपायला अवघा काही वेळ उरलेला असताना कर्णधार धोनी (नाबाद २४) फलंदाजीस आला, मात्र तो भारताला विजयाच्या समीप नेऊ शकला नाही. अखेर खेळ संपताना भारताने ६ गडी गमावत १७४ केल्या आणि कसोटी अनिर्णीत राहिली.
शॉन मार्श (९९) आणि रॉजर्सच्या (६९) खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर जिंकण्यासाठी ३८४ धावांचे आव्हान ठेवले. तळाच्या फलंदाजांची चिवट खेळी व भारतीय गोलंदाजांचे अपयश यामुळे ऑस्ट्रेलियाने दुस-या डावातही मोठी धावसंख्या उभारली. 
तिस-या कसोटीत एकूण ६ बळी टिपणा-या हॅरिसला 'मॅन ऑफ दि मॅच'चा पुरस्कार देण्यात आला.