शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पावसामुळे तिसरी लढत रद्द; भारताने मालिका जिंकली

By admin | Updated: June 20, 2014 01:17 IST

भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान गुरुवारी खेळली जाणारी तिसरी व अखेरची वन-डे पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आली.

मिरपूर : भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान गुरुवारी खेळली जाणारी तिसरी व अखेरची वन-डे पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आली. भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-क् ने सरशी साधली. पावसाच्या व्यत्ययामुळे ही लढत प्रत्येकी 4क् षटकांची खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताची 34.2 षटकांत 9 बाद 119 अशी अवस्था असताना पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर खेळ शक्य झाला नाही. पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिले 2 सामने जिंकत मालिकेत 2-क् अशी विजय आघाडी घेतली होती. 
भारतीय फलंदाजांना सलग दुस:या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुस:या वन-डेत भारताचा डाव 1क्5 धावांत संपुष्टात आला होता. आज भारताची स्थिती 9 बाद 119 अशी होती. भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने 63 चेंडूंना सामोरे जाताना 2 चौकारांच्या साहाय्याने सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. कर्णधार सुरेश रैनाने 25 चेंडूंमध्ये 25 धावा फटकाविल्या. त्यात 3 चौकारांचा समावेश आहे. स्टुअर्ट बिन्नीने अष्टपैलूत्व सिद्ध करताना आज 36 चेंडूंमध्ये 4 चौकारांच्या साहाय्याने नाबाद 25 धावा फटकाविल्या. भारतातर्फे आज दुहेरी धावसंख्या नोंदविणा:या अन्य फलंदाजात यष्टिरक्षक रिद्धिमान साहाचा (16) समावेश आहे. रॉबिन उथप्पा (5), अजिंक्य रहाणो (3), अंबाती रायडू (1) आणि मनोज तिवारी (2) यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.  बांगला देशचा माजी कर्णधार फिरकीपटू शाकिब अल-हसनने 7.2 षटकांत 27 धावांच्या मोबदल्यात 3 बळी घेतले. गेल्या लढतीत पदार्पणाच्या सामन्यात 5 बळी घेण्याची कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने आज 8 षटकांत 15 धावांच्या मोबदल्यात 2 फलंदाजांना माघारी परतवले. अल-अमिन हुसेनने 23 धावांत 2 बळी घेतले. (वृत्तसंस्था)