मिरपूर : भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान गुरुवारी खेळली जाणारी तिसरी व अखेरची वन-डे पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आली. भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-क् ने सरशी साधली. पावसाच्या व्यत्ययामुळे ही लढत प्रत्येकी 4क् षटकांची खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताची 34.2 षटकांत 9 बाद 119 अशी अवस्था असताना पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर खेळ शक्य झाला नाही. पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिले 2 सामने जिंकत मालिकेत 2-क् अशी विजय आघाडी घेतली होती.
भारतीय फलंदाजांना सलग दुस:या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुस:या वन-डेत भारताचा डाव 1क्5 धावांत संपुष्टात आला होता. आज भारताची स्थिती 9 बाद 119 अशी होती. भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने 63 चेंडूंना सामोरे जाताना 2 चौकारांच्या साहाय्याने सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. कर्णधार सुरेश रैनाने 25 चेंडूंमध्ये 25 धावा फटकाविल्या. त्यात 3 चौकारांचा समावेश आहे. स्टुअर्ट बिन्नीने अष्टपैलूत्व सिद्ध करताना आज 36 चेंडूंमध्ये 4 चौकारांच्या साहाय्याने नाबाद 25 धावा फटकाविल्या. भारतातर्फे आज दुहेरी धावसंख्या नोंदविणा:या अन्य फलंदाजात यष्टिरक्षक रिद्धिमान साहाचा (16) समावेश आहे. रॉबिन उथप्पा (5), अजिंक्य रहाणो (3), अंबाती रायडू (1) आणि मनोज तिवारी (2) यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. बांगला देशचा माजी कर्णधार फिरकीपटू शाकिब अल-हसनने 7.2 षटकांत 27 धावांच्या मोबदल्यात 3 बळी घेतले. गेल्या लढतीत पदार्पणाच्या सामन्यात 5 बळी घेण्याची कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने आज 8 षटकांत 15 धावांच्या मोबदल्यात 2 फलंदाजांना माघारी परतवले. अल-अमिन हुसेनने 23 धावांत 2 बळी घेतले. (वृत्तसंस्था)