शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
3
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
4
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
5
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
6
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
7
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
8
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
9
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
10
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
11
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
12
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
13
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
14
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
15
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
16
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
17
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
18
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
19
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
20
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
Daily Top 2Weekly Top 5

विजयसोबत मोठ्या भागीदाऱ्या पहायला मिळतील

By admin | Updated: June 14, 2015 01:52 IST

सलामीचा सहकारी मुरली विजयसोबत भविष्यात मोठ्या भागीदारी बघायला मिळतील, असा विश्वास भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने व्यक्त केला.

फतुल्लाह : सलामीचा सहकारी मुरली विजयसोबत भविष्यात मोठ्या भागीदारी बघायला मिळतील, असा विश्वास भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने व्यक्त केला. धवनने बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात १७३ धावांची खेळी केली. धवनने विजयसोबत (१५०) सलामीला २८३ धावांची भागीदारी केली. भारताने पहिला डाव ६ बाद ४६२ धावसंख्येवर घोषित केला. प्रत्युत्तरात खेळताना चौथ्या दिवसअखेर बांगलादेशने ३ बाद १११ धावांची मजल मारली. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना धवन म्हणाला, ‘‘हा माझा १४ वा कसोटी सामना आहे. गेल्या दौऱ्यात बरेच काही शिकायला मिळाले. भविष्यात माझ्यात व विजयमध्ये मोठ्या भागीदारी बघायला मिळतील.’’धवनने त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. धवन म्हणाला, ‘‘विराट चांगला कर्णधार आहे. त्याचा सहकाऱ्यांवर विश्वास आहे. नेहमी विजयासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे शेवटी निकाल काय मिळतो, याचा विचार करीत नाही. त्याचे आमच्यासोबत मित्रत्वाचे नाते आहे.’’पावसाच्या व्यत्ययामुळे या लढतीत २०० षटकांचा खेळ वाया गेला. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चांगली कामगिरी करताना बांगलादेशचा पहिला गडी झटपट बाद केला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली. खान साहेब उस्मान अली स्टेडियममधील पाटा खेळपट्टीबाबत बोलताना धवन म्हणाला, ‘‘ही फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी असून, आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. आम्ही तीन बळी घेतले आहेत. विश्वकप स्पर्धेसाठी असलेल्या खेळपट्ट्यांवर चेंडूला उसळी मिळत होती व स्विंगही मिळत होता. पण, येथे दोन-तीन षटकांनंतरच फटके खेळता येईल, याचा मला अंदाज आला. यानंतर सर्व काही अनुकूल घडले.’’धवन म्हणाला, ‘‘या लढतीपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये माझी कामगिरी निराशाजनक होती. मी संघसंचालक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफचा आभारी आहे. रवी शास्त्री यांचा संघावर विशेष प्रभाव आहे. ज्या वेळी मी आॅस्ट्रेलियात निराशाजनक कालखंडातून मार्गक्रमण करीत होतो त्या वेळी सर्व सपोर्ट स्टाफने माझी पाठराखण केली. त्यामुळे मला धावा फटकावण्यात यश आले.’’धवन पुढे म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेटमध्ये माझी कामगिरी चांगली ठरत नव्हती; पण या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरल्यामुळे समाधानी आहे. (वृत्तसंस्था)