शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

विजयसोबत मोठ्या भागीदाऱ्या पहायला मिळतील

By admin | Updated: June 14, 2015 01:52 IST

सलामीचा सहकारी मुरली विजयसोबत भविष्यात मोठ्या भागीदारी बघायला मिळतील, असा विश्वास भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने व्यक्त केला.

फतुल्लाह : सलामीचा सहकारी मुरली विजयसोबत भविष्यात मोठ्या भागीदारी बघायला मिळतील, असा विश्वास भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने व्यक्त केला. धवनने बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात १७३ धावांची खेळी केली. धवनने विजयसोबत (१५०) सलामीला २८३ धावांची भागीदारी केली. भारताने पहिला डाव ६ बाद ४६२ धावसंख्येवर घोषित केला. प्रत्युत्तरात खेळताना चौथ्या दिवसअखेर बांगलादेशने ३ बाद १११ धावांची मजल मारली. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना धवन म्हणाला, ‘‘हा माझा १४ वा कसोटी सामना आहे. गेल्या दौऱ्यात बरेच काही शिकायला मिळाले. भविष्यात माझ्यात व विजयमध्ये मोठ्या भागीदारी बघायला मिळतील.’’धवनने त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. धवन म्हणाला, ‘‘विराट चांगला कर्णधार आहे. त्याचा सहकाऱ्यांवर विश्वास आहे. नेहमी विजयासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे शेवटी निकाल काय मिळतो, याचा विचार करीत नाही. त्याचे आमच्यासोबत मित्रत्वाचे नाते आहे.’’पावसाच्या व्यत्ययामुळे या लढतीत २०० षटकांचा खेळ वाया गेला. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चांगली कामगिरी करताना बांगलादेशचा पहिला गडी झटपट बाद केला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली. खान साहेब उस्मान अली स्टेडियममधील पाटा खेळपट्टीबाबत बोलताना धवन म्हणाला, ‘‘ही फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी असून, आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. आम्ही तीन बळी घेतले आहेत. विश्वकप स्पर्धेसाठी असलेल्या खेळपट्ट्यांवर चेंडूला उसळी मिळत होती व स्विंगही मिळत होता. पण, येथे दोन-तीन षटकांनंतरच फटके खेळता येईल, याचा मला अंदाज आला. यानंतर सर्व काही अनुकूल घडले.’’धवन म्हणाला, ‘‘या लढतीपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये माझी कामगिरी निराशाजनक होती. मी संघसंचालक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफचा आभारी आहे. रवी शास्त्री यांचा संघावर विशेष प्रभाव आहे. ज्या वेळी मी आॅस्ट्रेलियात निराशाजनक कालखंडातून मार्गक्रमण करीत होतो त्या वेळी सर्व सपोर्ट स्टाफने माझी पाठराखण केली. त्यामुळे मला धावा फटकावण्यात यश आले.’’धवन पुढे म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेटमध्ये माझी कामगिरी चांगली ठरत नव्हती; पण या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरल्यामुळे समाधानी आहे. (वृत्तसंस्था)