शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय फलंदाजी क्रमामध्ये काहीच चुकीचं नाही : पुजारा

By admin | Updated: March 5, 2017 19:29 IST

सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज आॅस्ट्रेलियन फिरकीपटूंविरुद्ध अपयशी ठरत असल्याचे चित्र असले तरी

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 5 - सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज आॅस्ट्रेलियन फिरकीपटूंविरुद्ध अपयशी ठरत असल्याचे चित्र असले तरी चेतेश्वर पुजाराने मात्र फलंदाजी क्रमामध्ये काहीच चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. 
पुणे कसोटी सामन्यात ३३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ येथे दुस-या कसोटी सामन्यात पहिल्या डावात १८९ धावांत गारद झाला. आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८ धावांची आघाडी घेतली आहे. तीन डावांमध्ये अपयशी ठरल्यामुळे भारतीय फलंदाजी खराब असल्याचा ठपका ठेवण्यात येऊ नये, असे पुजारा म्हणाला. 
 
दुस-या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पुजारा म्हणाला,‘आमच्याकडून एकही मोठी भागीदारी झाली नाही, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आम्ही नियमित अंतरात विकेट गमावल्या. भारतीय फलंदाजी क्रमामध्ये काहीच चुकीचे नाही. फिरकीपटूंविरुद्ध चांगले खेळतो, अशी आमची ओळख आहे. गेल्या तीन डावांमध्ये आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुस-या डावात आमच्याकडे चांगली रणनीती राहील. आम्ही चांगली कामगिरी करू, असा विश्वास आहे.’
पुजारा पुढे म्हणाला,‘आज गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे आमच्याकडे अद्याप संधी आहे. वेगवान गोलंदाजांसाठी सोपे काम नव्हते. काही चेंडू खाली राहत होते. त्यांनी अचूक मारा केला. फिरकीपटूंची कामगिरीही उल्लेखनीय ठरली.
 
आॅस्ट्रेलियाला आज अधिक धावा फटकावण्याची संधी दिली नाही यात आमचा विजय आहे. आम्ही अचूक मारा करीत सहा बळी घेतले. आम्ही आॅस्ट्रेलियाला ३०० धावांच्या आत रोखण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही आॅस्ट्रेलियाच्या उर्वरित फलंदाजांना ३०-४० धावांत माघारी परतवण्यात यशस्वी ठरलो तर आम्हाला वर्चस्वाची संधी राहील.’प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीवर असताना उभय संघातील खेळाडूंकडून शेरेबाजी होत होती, अशी कबुली पुजाराने दिली. 
 
पुजारा म्हणाला,‘आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना शेरेबाजी होत असते. नेमके काय म्हटल्या गेले हे मला माहीत नाही. पण, सर्वकाही खिलाडूवृत्तीला साजेसे होते. कुठल्याही खेळाडूवर वैयक्तिक शेरेबाजी झाली नाही.’डीआरएसच्या वापराबाबत बोललताना पुजारा म्हणाला, भारतीय संघासाठी हे नवे आहे. याचा अचूक वापर कसा करायचा, याचा अनुभव भारतीय संघ घेत आहे.