शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

भारतीय फलंदाजी क्रमामध्ये काहीच चुकीचं नाही : पुजारा

By admin | Updated: March 5, 2017 19:29 IST

सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज आॅस्ट्रेलियन फिरकीपटूंविरुद्ध अपयशी ठरत असल्याचे चित्र असले तरी

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 5 - सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज आॅस्ट्रेलियन फिरकीपटूंविरुद्ध अपयशी ठरत असल्याचे चित्र असले तरी चेतेश्वर पुजाराने मात्र फलंदाजी क्रमामध्ये काहीच चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. 
पुणे कसोटी सामन्यात ३३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ येथे दुस-या कसोटी सामन्यात पहिल्या डावात १८९ धावांत गारद झाला. आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८ धावांची आघाडी घेतली आहे. तीन डावांमध्ये अपयशी ठरल्यामुळे भारतीय फलंदाजी खराब असल्याचा ठपका ठेवण्यात येऊ नये, असे पुजारा म्हणाला. 
 
दुस-या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पुजारा म्हणाला,‘आमच्याकडून एकही मोठी भागीदारी झाली नाही, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आम्ही नियमित अंतरात विकेट गमावल्या. भारतीय फलंदाजी क्रमामध्ये काहीच चुकीचे नाही. फिरकीपटूंविरुद्ध चांगले खेळतो, अशी आमची ओळख आहे. गेल्या तीन डावांमध्ये आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुस-या डावात आमच्याकडे चांगली रणनीती राहील. आम्ही चांगली कामगिरी करू, असा विश्वास आहे.’
पुजारा पुढे म्हणाला,‘आज गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे आमच्याकडे अद्याप संधी आहे. वेगवान गोलंदाजांसाठी सोपे काम नव्हते. काही चेंडू खाली राहत होते. त्यांनी अचूक मारा केला. फिरकीपटूंची कामगिरीही उल्लेखनीय ठरली.
 
आॅस्ट्रेलियाला आज अधिक धावा फटकावण्याची संधी दिली नाही यात आमचा विजय आहे. आम्ही अचूक मारा करीत सहा बळी घेतले. आम्ही आॅस्ट्रेलियाला ३०० धावांच्या आत रोखण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही आॅस्ट्रेलियाच्या उर्वरित फलंदाजांना ३०-४० धावांत माघारी परतवण्यात यशस्वी ठरलो तर आम्हाला वर्चस्वाची संधी राहील.’प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीवर असताना उभय संघातील खेळाडूंकडून शेरेबाजी होत होती, अशी कबुली पुजाराने दिली. 
 
पुजारा म्हणाला,‘आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना शेरेबाजी होत असते. नेमके काय म्हटल्या गेले हे मला माहीत नाही. पण, सर्वकाही खिलाडूवृत्तीला साजेसे होते. कुठल्याही खेळाडूवर वैयक्तिक शेरेबाजी झाली नाही.’डीआरएसच्या वापराबाबत बोललताना पुजारा म्हणाला, भारतीय संघासाठी हे नवे आहे. याचा अचूक वापर कसा करायचा, याचा अनुभव भारतीय संघ घेत आहे.