शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

फायनलआधी चिंता करण्याची गरज नाही : विराट कोहली

By admin | Updated: June 17, 2017 02:58 IST

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाकिस्तानच्या शानदार पुनरागमनाविषयी प्रभावित असला, तरी त्याने या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध रविवारी होणाऱ्या

बर्मिंघम : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाकिस्तानच्या शानदार पुनरागमनाविषयी प्रभावित असला, तरी त्याने या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध रविवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलआधी त्याच्या संघाला जास्त चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.भारताने बांगलादेशला नमवून अंतिम फेरीत धडक मारली, तर पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रबळ दावेदार इंग्लंडला पराभूत केले होते. भारताने याआधी साखळी फेरीत पाकिस्तानला धूळ चारली आहे.दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यान होणाऱ्या लढतीविषयी विराट म्हणाला, ‘‘त्यांच्या मजबूत आणि कमजोर बाजू लक्षात घेऊन आम्ही याआधी जसे खेळलो तसेच खेळण्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला योजना आखावी लागेल. आम्ही संघ म्हणून जे करीत आहोत त्यात काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे, असे आपल्याला वाटत नाही. एखाद्या निश्चित दिवशी आपले कौशल्य व क्षमतेवर लक्ष देणे आणि स्वत:वर विश्वास ठेवल्याने आम्ही स्वत:ला एक चांगली संधी देऊ. संघ म्हणून काही चांगले करू शकू. सामन्याआधी कोणी विजेता नसतो आणि या खेळात तुम्ही भविष्यवाणी करू शकत नाही. आम्ही काही धक्कादायक निकाल पाहिले आहेत आणि प्रेक्षक ते पाहणे आणि खेळाडूंसाठी याचा एक भाग असणे शानदार आहे. आम्ही फक्त फायनलचा आनंद लुटू इच्छितो.’’स्पर्धेत पाकिस्तान संघाने जोरदार मुसंडी मारल्याने कोहली खूप प्रभावित आहे. तो म्हणाला, ‘‘हो, मी खूप प्रभावित आहे. त्यांचे पुनरागमन शानदार राहिले. निश्चितच तुम्ही फायनलमध्ये पोहोचता तेव्हा तुम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागते आणि त्यांना त्याचे श्रेय जाते. त्यांनी चांगले पुनरागमन केले.’’ (वृत्तसंस्था)सध्या किती धावा करतो हे महत्त्वाचे नाही बर्मिंघम : आपण किती धावा करतोय हे सध्या महत्त्वाचे नसल्याचे मत बांगलादेशविरुद्ध नाबाद ९६ धावांची खेळी करून भारताला अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विराट कोहलीने व्यक्त केले. कोहलीने बांगलादेशविरुद्ध उपांत्य फेरीदरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात आठ हजार धावांचा पल्ला गाठणारा फलंदाज बनण्याचा बहुमान मिळवला. या दिग्गज फलंदाजाने स्पर्धेत अन्य फलंदाजांना मोकळे खेळण्याची संधी दिली आणि आवश्यकता पडल्यास स्वत: जबाबदारी पार पाडली. कोहली म्हणाला, ‘‘मी ज्याप्रकारे फलंदाजी करीत आहे त्याचा पूर्ण आनंद लुटत आहे. माझ्यासाठी सध्या धावांच्या संख्येला महत्त्व नाही. मी प्रक्रियेचा आनंद घेत आहे आणि आयपीएलनंतर जी तयारी केली व जो सराव केला त्याचा या स्पर्धेत फायदा होत असल्याने मी खूश आहे. प्रामाणिकपणे सांगायचे म्हटल्यास मी संघाला पुढे घेऊन चाललो असल्याने मी आनंदित आहे.’’ विभिन्न परिस्थितीत कसे खेळतो, हे महत्त्वाचे नसल्याचे कोहलीचे म्हणणे आहे. तो म्हणाला, ‘‘तीन विकेट पडल्या अथवा दोन किंवा एक हे जास्त महत्त्वाचे नाही.’’ (वृत्तसंस्था)