शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

फायनलआधी चिंता करण्याची गरज नाही : विराट कोहली

By admin | Updated: June 17, 2017 02:58 IST

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाकिस्तानच्या शानदार पुनरागमनाविषयी प्रभावित असला, तरी त्याने या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध रविवारी होणाऱ्या

बर्मिंघम : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाकिस्तानच्या शानदार पुनरागमनाविषयी प्रभावित असला, तरी त्याने या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध रविवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलआधी त्याच्या संघाला जास्त चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.भारताने बांगलादेशला नमवून अंतिम फेरीत धडक मारली, तर पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रबळ दावेदार इंग्लंडला पराभूत केले होते. भारताने याआधी साखळी फेरीत पाकिस्तानला धूळ चारली आहे.दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यान होणाऱ्या लढतीविषयी विराट म्हणाला, ‘‘त्यांच्या मजबूत आणि कमजोर बाजू लक्षात घेऊन आम्ही याआधी जसे खेळलो तसेच खेळण्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला योजना आखावी लागेल. आम्ही संघ म्हणून जे करीत आहोत त्यात काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे, असे आपल्याला वाटत नाही. एखाद्या निश्चित दिवशी आपले कौशल्य व क्षमतेवर लक्ष देणे आणि स्वत:वर विश्वास ठेवल्याने आम्ही स्वत:ला एक चांगली संधी देऊ. संघ म्हणून काही चांगले करू शकू. सामन्याआधी कोणी विजेता नसतो आणि या खेळात तुम्ही भविष्यवाणी करू शकत नाही. आम्ही काही धक्कादायक निकाल पाहिले आहेत आणि प्रेक्षक ते पाहणे आणि खेळाडूंसाठी याचा एक भाग असणे शानदार आहे. आम्ही फक्त फायनलचा आनंद लुटू इच्छितो.’’स्पर्धेत पाकिस्तान संघाने जोरदार मुसंडी मारल्याने कोहली खूप प्रभावित आहे. तो म्हणाला, ‘‘हो, मी खूप प्रभावित आहे. त्यांचे पुनरागमन शानदार राहिले. निश्चितच तुम्ही फायनलमध्ये पोहोचता तेव्हा तुम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागते आणि त्यांना त्याचे श्रेय जाते. त्यांनी चांगले पुनरागमन केले.’’ (वृत्तसंस्था)सध्या किती धावा करतो हे महत्त्वाचे नाही बर्मिंघम : आपण किती धावा करतोय हे सध्या महत्त्वाचे नसल्याचे मत बांगलादेशविरुद्ध नाबाद ९६ धावांची खेळी करून भारताला अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विराट कोहलीने व्यक्त केले. कोहलीने बांगलादेशविरुद्ध उपांत्य फेरीदरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात आठ हजार धावांचा पल्ला गाठणारा फलंदाज बनण्याचा बहुमान मिळवला. या दिग्गज फलंदाजाने स्पर्धेत अन्य फलंदाजांना मोकळे खेळण्याची संधी दिली आणि आवश्यकता पडल्यास स्वत: जबाबदारी पार पाडली. कोहली म्हणाला, ‘‘मी ज्याप्रकारे फलंदाजी करीत आहे त्याचा पूर्ण आनंद लुटत आहे. माझ्यासाठी सध्या धावांच्या संख्येला महत्त्व नाही. मी प्रक्रियेचा आनंद घेत आहे आणि आयपीएलनंतर जी तयारी केली व जो सराव केला त्याचा या स्पर्धेत फायदा होत असल्याने मी खूश आहे. प्रामाणिकपणे सांगायचे म्हटल्यास मी संघाला पुढे घेऊन चाललो असल्याने मी आनंदित आहे.’’ विभिन्न परिस्थितीत कसे खेळतो, हे महत्त्वाचे नसल्याचे कोहलीचे म्हणणे आहे. तो म्हणाला, ‘‘तीन विकेट पडल्या अथवा दोन किंवा एक हे जास्त महत्त्वाचे नाही.’’ (वृत्तसंस्था)