शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

काहीच बदल झालेला नाही...

By admin | Updated: June 4, 2017 06:02 IST

भारताची पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत गाठ पडणार आहे. बर्मिंघममध्ये आज, रविवारी खेळल्या जाणाऱ्या या लढतीची जागतिक पातळीवर चर्चा आहे. गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी

- सौरभ गांगुली लिहितात...भारताची पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत गाठ पडणार आहे. बर्मिंघममध्ये आज, रविवारी खेळल्या जाणाऱ्या या लढतीची जागतिक पातळीवर चर्चा आहे. गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा विश्वकप स्पर्धेपासून माझ्यासाठी काहीच बदललेले नसून, भारतीय संघाचे पारडे वरचढ आहे. गतविजेता भारतीय संघ मजबूत असून, लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर त्यांना पराभूत करणे कठीण आहे.सराव सामन्यात भारतीय संघ फॉर्मात असल्याचे दिसून आले. कुणी ते केवळ सराव सामने होते असे मत व्यक्त करीत भारतीय संघाच्या कामगिरीची दखल घेणार नाही, पण भारतीय गोलंदाजी फॉर्मात असल्याचे दिसून आले. सामन्यासाठी कुठल्या वेगवान गोलंदाजांची निवड करायची ही कर्णधार कोहली व मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. ही त्यांच्यासाठी सकारात्मक डोकेदुखी आहे. तीन वेगवान गोलंदाजांची निवड करायची झाल्यास माझी पसंती उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना राहील. जसप्रीत बुमराहमध्ये डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा करण्याची क्षमता असल्यामुळे माझी त्याला पसंती आहे. टी-२० क्रिकेटमुळे त्याने डेथ ओव्हर्समध्ये मारा करण्याचे कौशल्य विकसित केले आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरते. बर्मिंघमची खेळपट्टी चांगली आहे. न्यूझीलंड-आॅस्ट्रेलिया लढतीत मोठी धावसंख्या उभारल्या गेली. इंग्लंडमध्ये अशी खेळपट्टी अपवादानेच बघायला मिळते. या खेळपट्टीवर चेंडू सिम होत नव्हता. भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी फिरकीपटूंची कामगिरी महत्त्वाची ठरेल. त्यामुळे माझ्या मते भारताने रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या दोन्ही फिरकीपटूंना संधी द्यायला हवी. खेळपट्टी कोरडी असल्यामुळे मधल्या षटकातील कामगिरीला महत्त्व राहणार आहे. भूतकाळातील लढतीच्या तुलनेत आता भारत-पाक लढतीमध्ये काय फरक आहे ? माझ्या मते यात काहीच बदल झालेला नाही. लढतीबाबत हाईप करण्यात येत असली तरी ही केवळ क्रिकेटची एक लढत आहे. गेल्या १० वर्षांत मानसिकदृष्ट्या भारतीय संघ पाकिस्तानच्या तुलनेत वरचढ असून, आज, रविवारीही यात बदल होणार नाही. (गेमप्लान)