शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

काहीच बदल झालेला नाही...

By admin | Updated: June 4, 2017 06:02 IST

भारताची पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत गाठ पडणार आहे. बर्मिंघममध्ये आज, रविवारी खेळल्या जाणाऱ्या या लढतीची जागतिक पातळीवर चर्चा आहे. गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी

- सौरभ गांगुली लिहितात...भारताची पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत गाठ पडणार आहे. बर्मिंघममध्ये आज, रविवारी खेळल्या जाणाऱ्या या लढतीची जागतिक पातळीवर चर्चा आहे. गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा विश्वकप स्पर्धेपासून माझ्यासाठी काहीच बदललेले नसून, भारतीय संघाचे पारडे वरचढ आहे. गतविजेता भारतीय संघ मजबूत असून, लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर त्यांना पराभूत करणे कठीण आहे.सराव सामन्यात भारतीय संघ फॉर्मात असल्याचे दिसून आले. कुणी ते केवळ सराव सामने होते असे मत व्यक्त करीत भारतीय संघाच्या कामगिरीची दखल घेणार नाही, पण भारतीय गोलंदाजी फॉर्मात असल्याचे दिसून आले. सामन्यासाठी कुठल्या वेगवान गोलंदाजांची निवड करायची ही कर्णधार कोहली व मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. ही त्यांच्यासाठी सकारात्मक डोकेदुखी आहे. तीन वेगवान गोलंदाजांची निवड करायची झाल्यास माझी पसंती उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना राहील. जसप्रीत बुमराहमध्ये डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा करण्याची क्षमता असल्यामुळे माझी त्याला पसंती आहे. टी-२० क्रिकेटमुळे त्याने डेथ ओव्हर्समध्ये मारा करण्याचे कौशल्य विकसित केले आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरते. बर्मिंघमची खेळपट्टी चांगली आहे. न्यूझीलंड-आॅस्ट्रेलिया लढतीत मोठी धावसंख्या उभारल्या गेली. इंग्लंडमध्ये अशी खेळपट्टी अपवादानेच बघायला मिळते. या खेळपट्टीवर चेंडू सिम होत नव्हता. भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी फिरकीपटूंची कामगिरी महत्त्वाची ठरेल. त्यामुळे माझ्या मते भारताने रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या दोन्ही फिरकीपटूंना संधी द्यायला हवी. खेळपट्टी कोरडी असल्यामुळे मधल्या षटकातील कामगिरीला महत्त्व राहणार आहे. भूतकाळातील लढतीच्या तुलनेत आता भारत-पाक लढतीमध्ये काय फरक आहे ? माझ्या मते यात काहीच बदल झालेला नाही. लढतीबाबत हाईप करण्यात येत असली तरी ही केवळ क्रिकेटची एक लढत आहे. गेल्या १० वर्षांत मानसिकदृष्ट्या भारतीय संघ पाकिस्तानच्या तुलनेत वरचढ असून, आज, रविवारीही यात बदल होणार नाही. (गेमप्लान)