शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

नमस्कारासाठी चमत्कार करावा लागतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 05:39 IST

भारतात नमस्कार हवा असल्यास काहीतरी चमत्कार करावा लागतो, असे प्रतिपादन दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी केले.

भुवनेश्वर : दीपा कर्माकर तसेच रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि कांस्यपदक विजेती साक्षी मलिक यांनी आॅलिम्पिकमध्ये धवल कामगिरी केल्यानंतर बक्षिसाचा वर्षाव झाला, हे स्वाभाविकच होते, कारण भारतात नमस्कार हवा असल्यास काहीतरी चमत्कार करावा लागतो, असे प्रतिपादन दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी केले. भारतीय क्रीडा पत्रकार संघाच्या ३९ व्या राष्ट्रीय अधिवेशनात दीपा आणि नंदी यांना सन्मानित करण्यात आले. दीपा आणि पदक विजेत्या साक्षी मलिक आणि पी. व्ही सिंधू यांना आॅलिम्पिक स्पर्धेनंतर कोट्यवधी रुपयांची बक्षिसे देण्यात आली, यावर काही लोकांनी खेळाडूंना हा पैसा खेळाडूंना आॅलिम्पिकच्या अगोदर मिळाला असता तर आणखी चांगली कामगिरी झाली असती असे म्हंटले असते. मात्र नंदी यांना हे म्हणणे मान्य नाही, हा मुद्दा खोडून काढताना ते म्हणाले, भारतात पहिल्यांदा चमत्कार करुन दाखवावा लागतो, नंतरच लोक नमस्कार करतात. काही तरी चमत्कार करुन दाखवल्यानंतरच समाजाकडून तुमची दखल घेतली जाते. सर्वोच्च स्तरावर खेळाडूने स्वत:ला सिध्द केल्यास प्रसारमाध्यमे त्या खेळाडूबद्दल लिहतात, त्यानंतरच त्याला बक्षिस मिळते, हे स्वाभाविक आहे. आॅलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर यांना स्पर्धेनंतर बीएम डब्ल्यू कार, फ्लॅटसह कोट्यवधींची रोख रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली होती. यावर माजी हॉकीपटू दिलीप तिर्कीसह अन्य खेळाडूंनी हा पैसा खेळाडूंना स्पर्धेपूर्वी मिळायला हवा होता असे म्हंटले होते. (वृत्तसंस्था)