शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

...तर भारताने सामन्यासह मालिकाही गमावली असती

By admin | Updated: March 28, 2017 23:39 IST

धरमशाला येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव केला,पण या सामन्याचाआणि पर्यायाने मालिकेचाही निकाल वेगळा लागला असता.

ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 - धरमशाला येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारताने  2-1 अशी मालिकाही खिशात टाकली. पण या सामन्याचा आणि पर्यायाने मालिकेचाही निकाल वेगळा लागला असता. 
कसोटीच्या तिस-या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली तेव्हा भारताची धावसंख्या 248 वर 6 गडी बाद अशी होती. त्यावेळी भारत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा 52 धावांनी पिछाडीवर होता. भारताकडून रविंद्र जाडेजा (16) आणि वृद्धिमान साहा (10) मैदानावर होते. कांगारूंकडून पहिलं षटक पॅट कमिन्सनं टाकलं. कमिन्सच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जाडेजाला पंच इयान गोल्ड यांनी बाद दिलं. त्याच्या बॅटला कडा लागूनच चेंडू यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने झेलला असल्याचा त्यांना विश्वास होता. म्हणून क्षणाचाही विलंब न करता पंचांनी त्याला बाद ठरवलं. पण चेंडू आपल्या बॅटवर लागला नसल्याचा विश्वास जाडेजाला होता त्यामुळे तात्काळ त्यानेही डीआरएसचा वापर करत रिव्ह्यू मागितला.
रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला नाही तर बॅट खेळपट्टीवर आदळल्याचं स्पष्ट झालं आणि जाडेजाला जीवदान मिळालं. बॅट खेळपट्टीवर आदळल्याचा आवाज झाल्याने चेंडू बॅटला लागल्याचं पंचांना वाटलं आणि त्यांनी जाडेजाला आऊट ठरवलं होतं.  
त्यानंतर जाडेजाने 63 धावांची खेळी केली. त्याच्या याच खेळीच्या बळावर भारताने कांगारूंवर अत्यंत महत्वपूर्ण 32 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या 317 धावा झाल्या असताना जाडेजा बाद झाला आणि त्यानंतर अवघ्या 15 धावांमध्ये भारताचा डाव आटोपला. 
जर डीआरएसची सुविधा नसती तर जाडेजा पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता आणि भारताने सामना आणि मालिकाही गमावली असती हे नक्की.