शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

...तर भारताने सामन्यासह मालिकाही गमावली असती

By admin | Updated: March 28, 2017 23:39 IST

धरमशाला येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव केला,पण या सामन्याचाआणि पर्यायाने मालिकेचाही निकाल वेगळा लागला असता.

ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 - धरमशाला येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारताने  2-1 अशी मालिकाही खिशात टाकली. पण या सामन्याचा आणि पर्यायाने मालिकेचाही निकाल वेगळा लागला असता. 
कसोटीच्या तिस-या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली तेव्हा भारताची धावसंख्या 248 वर 6 गडी बाद अशी होती. त्यावेळी भारत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा 52 धावांनी पिछाडीवर होता. भारताकडून रविंद्र जाडेजा (16) आणि वृद्धिमान साहा (10) मैदानावर होते. कांगारूंकडून पहिलं षटक पॅट कमिन्सनं टाकलं. कमिन्सच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जाडेजाला पंच इयान गोल्ड यांनी बाद दिलं. त्याच्या बॅटला कडा लागूनच चेंडू यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने झेलला असल्याचा त्यांना विश्वास होता. म्हणून क्षणाचाही विलंब न करता पंचांनी त्याला बाद ठरवलं. पण चेंडू आपल्या बॅटवर लागला नसल्याचा विश्वास जाडेजाला होता त्यामुळे तात्काळ त्यानेही डीआरएसचा वापर करत रिव्ह्यू मागितला.
रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला नाही तर बॅट खेळपट्टीवर आदळल्याचं स्पष्ट झालं आणि जाडेजाला जीवदान मिळालं. बॅट खेळपट्टीवर आदळल्याचा आवाज झाल्याने चेंडू बॅटला लागल्याचं पंचांना वाटलं आणि त्यांनी जाडेजाला आऊट ठरवलं होतं.  
त्यानंतर जाडेजाने 63 धावांची खेळी केली. त्याच्या याच खेळीच्या बळावर भारताने कांगारूंवर अत्यंत महत्वपूर्ण 32 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या 317 धावा झाल्या असताना जाडेजा बाद झाला आणि त्यानंतर अवघ्या 15 धावांमध्ये भारताचा डाव आटोपला. 
जर डीआरएसची सुविधा नसती तर जाडेजा पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता आणि भारताने सामना आणि मालिकाही गमावली असती हे नक्की.