शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारताने सामन्यासह मालिकाही गमावली असती

By admin | Updated: March 28, 2017 23:39 IST

धरमशाला येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव केला,पण या सामन्याचाआणि पर्यायाने मालिकेचाही निकाल वेगळा लागला असता.

ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 - धरमशाला येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारताने  2-1 अशी मालिकाही खिशात टाकली. पण या सामन्याचा आणि पर्यायाने मालिकेचाही निकाल वेगळा लागला असता. 
कसोटीच्या तिस-या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली तेव्हा भारताची धावसंख्या 248 वर 6 गडी बाद अशी होती. त्यावेळी भारत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा 52 धावांनी पिछाडीवर होता. भारताकडून रविंद्र जाडेजा (16) आणि वृद्धिमान साहा (10) मैदानावर होते. कांगारूंकडून पहिलं षटक पॅट कमिन्सनं टाकलं. कमिन्सच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जाडेजाला पंच इयान गोल्ड यांनी बाद दिलं. त्याच्या बॅटला कडा लागूनच चेंडू यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने झेलला असल्याचा त्यांना विश्वास होता. म्हणून क्षणाचाही विलंब न करता पंचांनी त्याला बाद ठरवलं. पण चेंडू आपल्या बॅटवर लागला नसल्याचा विश्वास जाडेजाला होता त्यामुळे तात्काळ त्यानेही डीआरएसचा वापर करत रिव्ह्यू मागितला.
रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला नाही तर बॅट खेळपट्टीवर आदळल्याचं स्पष्ट झालं आणि जाडेजाला जीवदान मिळालं. बॅट खेळपट्टीवर आदळल्याचा आवाज झाल्याने चेंडू बॅटला लागल्याचं पंचांना वाटलं आणि त्यांनी जाडेजाला आऊट ठरवलं होतं.  
त्यानंतर जाडेजाने 63 धावांची खेळी केली. त्याच्या याच खेळीच्या बळावर भारताने कांगारूंवर अत्यंत महत्वपूर्ण 32 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या 317 धावा झाल्या असताना जाडेजा बाद झाला आणि त्यानंतर अवघ्या 15 धावांमध्ये भारताचा डाव आटोपला. 
जर डीआरएसची सुविधा नसती तर जाडेजा पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता आणि भारताने सामना आणि मालिकाही गमावली असती हे नक्की.