शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

... तर कबड्डीचे सुवर्ण भारतालाच

By admin | Updated: August 26, 2016 01:43 IST

भारतात सध्या अतिशय चांगले दिवस आलेल्या कबड्डीची लोकप्रियता वाढत आहे.

भोसरी : भारतात सध्या अतिशय चांगले दिवस आलेल्या कबड्डीची लोकप्रियता वाढत आहे. मात्र, आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेत कबड्डीचा समावेश नाही. भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या कबड्डीचा आॅलिम्पिकमध्ये समावेश केल्यास भारताला सुवर्णपदक मिळेल, असा विश्वास अर्जुन पुरस्कारविजेते व यू मुंबा संघाचा खेळाडू राकेशकुमार यांनी व्यक्त केला. राकेशकुमार भैरवनाथ कबड्डी संघ आयोजित दहीहंडी उत्सवासाठी भोसरीत आले होते. तेव्हा ते ‘लोकमत’शी बोलत होते. कबड्डीला राजमान्यता प्राप्त होत आहे. प्रो कबड्डीमुळे खेळाची लोकप्रियता वाढू लागली आहे. मात्र, इतर खेळांचा समावेश होत असताना आॅलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश होत नाही. त्यामुळे दु:ख वाटते. रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी कुस्ती व बॅडमिंटनमध्ये पदकांची कमाई केली. भारतीय खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर आणखी पदके मिळू शकतील. कबड्डीचा समावेश केल्यास प्रत्येक आॅलिम्पिकमध्ये कबड्डी संघ पदक मिळवू शकेल. केंद्र सरकार खेळाडूंसाठी चांगल्या सोयी-सवलती देऊ लागले आहे. खेळाडू व स्पर्धांसाठी चांगले दिवस सुरू झाले आहेत. कबड्डीला क्रिकेटपेक्षा जास्त लोकप्रियता मिळू शकेल. सर्वांनी कबड्डीचा आॅलिम्पिकमध्ये समावेश होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे राकेशकुमार म्हणाले.त्यांच्या समवेत पै. योगेश लांडगे, नितीन लांडगे व भैरवनाथ कबड्डी संघाचे खेळाडू उपस्थित होते. राकेशकुमार मूळचे दक्षिण दिल्लीमधील खेळाडू. १९९७पासून शालेय कबड्डी खेळायला सुरुवात केली. २००३पासून भारतीय संघात खेळत असताना २००४ व २००७मध्ये वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्यांनी मोठी कामगिरी होती. एशियन गेममध्ये २००६, २०१० व २०१४ला सुवर्णपदक मिळाले. प्रो कबड्डीमध्ये पटना पायरेट्स व यू मुंबाकडून अतिशय चांगली कामगिरी केली. भारतीय कबड्डीमध्ये दिलेल्या योगदानामुळे अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. (वार्ताहर)चांगल्या स्पर्धा : नवीन खेळाडूंना संधीभारतात क्रिकेटनंतर कबड्डी खेळाला लोकप्रियता मिळत आहे. चांगल्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. प्रो कबड्डीमुळे चांगली दिशा खेळाडूंना मिळू लागली आहे. त्यातून नवनवीन खेळाडू उदयास येत आहेत. सर्वांत जास्त व उत्कृष्ट खेळाडू भारतात निर्माण होत आहेत. चांगल्या संस्था व व्यक्ती प्रायोजक म्हणून पुढे येत असल्याने खेळाडूंचा आर्थिक स्तर उंचावत आहेत, असे राकेशकुमार म्हणाले.