शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

दिग्गजांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाने जबरदस्त प्रगती केली

By admin | Updated: September 20, 2016 05:23 IST

दिग्गज खेळाडूंनी घेतलेल्या निवृत्तीनंतरदेखील टीम इंडियाने ज्या प्रकारे प्रगती केली आहे, ते पाहून मी प्रभावित झालो,’’ असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : ‘‘गेल्या काही वर्षांत संघातील दिग्गज खेळाडूंनी घेतलेल्या निवृत्तीनंतरदेखील टीम इंडियाने ज्या प्रकारे प्रगती केली आहे, ते पाहून मी प्रभावित झालो,’’ असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले.कपिल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, जगातील कोणत्याही संघाने आपल्या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर अशा प्रकारे शानदार पुनरागमन केलेले नाही. हे केवळ टीम इंडियानेच साध्य केले आहे. जर का एकाच वेळी संघातील दिग्गज खेळाडू निवृत्ती घेत असतील, तर त्या संघाला पुनरागमनासाठी किमान पाच ते सात वर्षांचा कालावधी जातो. मात्र, सध्याच्या टीम इंडियाने केलेली प्रगती लक्षवेधी असून मी असे कधीही कोणत्याही संघाबाबत पाहिलेले नाही.’’‘‘सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, हरभजनसिंग, झहीर खान, महेंद्रसिंह धोनी यांनी एकामागोमाग निवृत्ती घेतली. यामध्ये धोनी सर्वाधिक महत्त्वाचा ठरला. सध्या संघाचे नेतृत्व सांभळलेला कोहली एक सुपरस्टार असून तो आदर्श आहे,’’ असेही कपिल यांनी या वेळी सांगितले. (वृत्तसंस्था)>कोहली धोनीच्या तुलनेत एकदम वेगळा असून, तो खूप आक्रमक आहे. प्रत्येक कर्णधार आपल्या वेगळ्या विचारसरणीने येतो. कोहली असा खेळाडू आहे, जो प्रत्येक सामना जिंकू इच्छितो. त्याचे विचार सकारात्मक असून हे भारतीय क्रिकेटसाठी चांगले आहे.- कपिल देव