शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
4
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
5
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
6
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
7
पति निक जोनाससोबत प्रियंका चोप्राचं लिप-लॉक, समुद्र किनाऱ्यावर दिसला रोमॅन्टिक अंदाज; बघा लेटेस्ट VIDEO
8
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
9
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
10
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
11
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
12
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
13
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
14
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
15
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
16
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
17
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
18
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
19
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
20
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...

टीम इंडिया ‘फ्रंट फुटवर’

By admin | Updated: June 4, 2017 06:07 IST

चॅम्पियन्स चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. पाकिस्तानचा संघ ‘रिबिल्ड’ होत आहे. काही नवे खेळाडू तर काहींच्या पुनरागमनामुळे

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)चॅम्पियन्स चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. पाकिस्तानचा संघ ‘रिबिल्ड’ होत आहे. काही नवे खेळाडू तर काहींच्या पुनरागमनामुळे हा संघ नव्या दमात दिसतोय. अझर अली, जुनेद खान, मोहम्मद आमिर यांच्यासारखे महत्त्वपूर्ण खेळाडू त्यांच्याकडे आहेत. परंतु, कागदावर तुलना केली तर भारतीय संघच वरचढ आहे. कर्णधार विराट कोहली चांगला खेळतोय. शिखर धवनही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यापूर्वी, मनात भीती असायची की, पाकचे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांना त्रस्त करतील. परंतु, आता भारताकडेही चांगले गोलंदाज आहेत. ते सुद्धा पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. एक समस्या असू शकते ती म्हणजे ‘ओपनिंग’ची. या जोडीतील कॉम्बिनेशन अजून जुळलेले नाही. त्यामुळे भारतीय संघापुढे सलामी जोडीचा प्रश्न असेल. असे असले तरी भारतीय फलंदाजी चांगली आहे. ‘आॅलराउंडर’ चांगले आहेत. इतिहासातील प्रदर्शन पाहिले तर भारतीय संघ वरचढ ठरलेला आहे. २०१५ च्या विश्वचषकात आणि टी-२० विश्वचषकातही भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे भारताला ‘अ‍ॅडव्हॉटेन्ज’ आहे असे मला वाटते. सुप्रसिद्ध इतिहासकार तसेच सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा देत ‘तहलका’ निर्माण केला. जी समिती सर्वाेच्च न्यायालयाने स्थापन केली होती. ५-६ पानांच्या पत्रात गुहा यांनी काही गोष्टी नमूद केल्या. त्यात बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचा भोंगळ कारभार, भारतीय क्रि केट हे दिग्गज खेळाडूंच्या प्रभावाखाली (सुपरस्टार संस्कृती) असून, कर्णधार विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांच्यावरही नाव न घेता तोफ डागली. हे सर्व प्रश्न २०-२५ वर्षांपासून गाजत आहेत. मात्र, यावेळी गुहा हे प्रशासकीय समितीचे सदस्य असल्याने या प्रश्नाकडे सर्वाेच्च न्यायालय गांभीर्याने घेईल. त्यामुळे पुढे काय घडते याकडे लक्ष असेल. त्यांची पूर्ण तक्रार बघितली तर प्रशासकीय समितीविरुद्ध आहे.दुसरीकडे, विराट-कुंबळे यांच्यातील वादाचा फटका चॅम्पियन्स चषकावर पडणार काय? भारत-पाक सामन्यावरही त्याचा परिणाम होईल काय, हे सुद्धा पाहावे लागेल. पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. त्यांनतर पुढे होणारे सामनेही महत्त्वाचे आहे. कारण एका सामन्यामुळे तुम्ही स्पर्धा जिंकू शकत नाही. प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. कुंबळे-विराट दोन्ही खेळाडू महान आहेत. त्यांच्यातील वाद बातचीत करून मिटायला हवा. तो मिटलेला नसावा, असे मला वाटते. पण त्याचा परिणाम प्रदर्शनावर होता कामा नये. कारण कुंबळे किंवा विराट हे संघाला एकटे जिंकून देऊ शकत नाहीत. आशा आहे, की भारतीय संघ चांगले प्रदर्शन करेन. निश्चितपणे, टीम इंडिया मजबूत आहे.