शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

लंकेची भारताविरुद्ध दर्जेदार खेळी

By admin | Updated: June 10, 2017 04:57 IST

श्रीलंकेचा हा खूप मोठा विजय आहे. श्रीलंकेने ज्याप्रमाणे भारतावर मात केली त्याचा विचार देखील कुणी केला नव्हता. या दोन्ही संघाची तुलना केली असता दोन्ही संघांमध्ये मोठे अंतर होते.

श्रीलंकेचा हा खूप मोठा विजय आहे. श्रीलंकेने ज्याप्रमाणे भारतावर मात केली त्याचा विचार देखील कुणी केला नव्हता. या दोन्ही संघाची तुलना केली असता दोन्ही संघांमध्ये मोठे अंतर होते. भारताचा संघ बलाढ्य मानला जात होता. भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास देखील वाढला होता. खेळाडूंची कामगिरी देखील चांगली होती. श्रीलंकेचा विचार केला तर त्यांचा संघ पराभूत होऊन या सामन्यात खेळण्यासाठी आला होता. प्रमुख खेळाडूंची कामगिरी चांगली होत नव्हती. अँजेलो मॅथ्यूज्ने या सामन्यातून पुनरागमन केले. त्यामुळे कुठेही वाटले नव्हते की श्रीलंकेचा संघ या सामन्यात जिंकेल. मात्र क्रिकेट आणि खेळात काहीही होऊ शकते. श्रीलंकेच्या खेळाची दाद द्यावी लागेल. भारताने मोठी धावसंख्या उभारल्यानंतर देखील त्यांनी अजिबात दडपण घेतले नाही. त्यानंतरही त्यांनी या धावांचा पाठलाग केला. तो सर्वोत्तम होता. काही गोष्टी देखील त्यांच्या बाजूने घडल्या. टॉस जिंकणे तसेच पाऊस देखील आला नाही. त्यांचा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अगदी योग्य ठरला. पूर्ण सामन्यात त्यांनी पाठलाग करण्यासाठी जी रणनीती अवलंबली ती नक्कीच कौतुकास्पद आहे. मला त्यांच्या खेळात कोणतेही दडपण जाणवले नाही. जाणवला तो त्यांचा उत्साह, जोश, त्यांनी केलेले नियोजन आणि एक सर्वोत्तम प्रेरणा.श्रीलंकेच्या खेळाडूंनी एक प्रकारे धैर्य मिळवले. भारताच्या शिखर धवन याने केलेले शतक, रोहित शर्माची चांगली धावसंख्या या भारताच्या जमेच्या बाजू होत्या. फॉर्ममध्ये असलेले विराट कोहली आणि युवराज सिंह हे धावा करू शकले नाही. तरीही भारताने मोठी धावसंख्या उभारली त्याचे श्रेय शिखर आणि रोहित यांच्या भागीदारीला द्यायला हवे. त्यानंतर महेंद्र सिंह धोनी याने चांगला खेळ केला. त्यामुळेच श्रीलंकेला धैर्य मिळाले. त्यामुळे श्रीलंकेने ३०-३५ षटकांपर्यंत दोनपेक्षा गडी बाद होऊ न देण्याचे नियोजन केले. अशी परिस्थिती निर्माण केल्यास मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता येतो. वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगल्या धावा केल्यास मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता येतो. श्रीलंकेकडे देखील मोठे फटके खेळणारे खेळाडू आहेत. कुशाल परेरा, कुशाल मेंडिस, गुणथलिका यांची फलंदाजी अप्रतिम होती. मला अँजेलो मॅथ्यूज्चे विशेष कौतुक वाटते. त्याने कर्णधार म्हणून पुनरागमन केले. त्याने या सामन्यात अतिशय उत्तम नेतृत्व केले. त्याची फलंदाजी देखील उत्कृष्ट होती. त्याने संघाला कर्णधार आणि फलंदाज या दोन्ही भूमिकेतून अतिशय चांगले सांभाळले. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला असता गोलंदाजीत भारत मागे पडला. या सपाट खेळपट्टीवर धावांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे होते. मात्र तेच भारताला करता आले नाही. फिरकीत रवींद्र जाडेजाचा दिवस चांगला नव्हता. त्याने ६ षटकांतच ५२ धावा दिल्या आणि तेथूनच भारताच्या हातून सामना निसटला, असे मला वाटते.-अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)